शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळच्या बेंबळामध्ये लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 13:16 IST

बेंबळा प्रकल्पाच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असून कळंब तालुक्यात शेकडो लीटर पाणी वाया जात आहे.

ठळक मुद्देनिकृष्ट कामाचा परिणाम लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचीही झाली घोर निराशा

गजानन अक्कलवार।आॅनलाईन लोकमतयवतमाळ : बेंबळा प्रकल्पाच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असून कळंब तालुक्यात शेकडो लीटर पाणी वाया जात आहे.यावर्षी प्रथमच बहुतेक शेतकऱ्यांना गुलाबी बोंडअळीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेकडो परिसरातील कपाशीच्या संपूर्ण पिकांची वाताहत झाली. खरीप हंगाम हातचा गेल्यानंतर आता पाण्याअभावी रबी हंगामालाही शेतकऱ्यांना मुकावे लागण्याची वेळ आहे. त्यामुळे कळंब तालुक्यातील शेतकºयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील माटेगाव, परसोडी, सावरगाव, दहेगाव, चिंचोली, उमरी, बोरजई आदी भागातील नाल्यावाटे बेंबळाच्या पाण्याचा अपव्यय होत आहे. अतिशय निकृष्ट कामामुळे शेतापर्यंत पाणीच पोहचत नाही. वितरीकेची स्थिती अतिशय नाजुक आहे. दरवर्षी शेतात पाणी घुसून नुकसान होण्याचे प्रमाण मोठे आहे. आता तर लाखो गॅलन लिटर पाणी नदी-नाल्यावाटे वाहून जात आहे. एकप्रकारे नाल्यांना पूर आल्याची स्थिती निर्माण झाली. यासाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांविरूध्द कारवाई, होणे अपेक्षित आहे, नागरिकांची तशी मागणीही आहे. एका तपापासूनचे शेतकऱ्यांचे स्वप्न असणाऱ्या बेंबळा प्रकल्पाचे पाणी अजुनही शेतापर्यंत पोहचलेच नाही.यापूर्वी अनेकदा कालव्याद्वारे पाणी वाटपाची चाचपणी घेण्यात आली़ चाचणीनंतर प्रकल्पाच्या कामाचे पार पितळ उघडे पडले़ अक्षम्य तांत्रिक चुकांमुळे शेतकऱ्यांना पाणी मिळण्याचे स्वप्न धुळीस मिळते की काय? अशी स्थिती आहे़ त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची या प्रकल्पामुळे घोर निराशा झाली आहे़ परिणामी बेंबळा कालव्याच्याच विरोधात यापूर्वी शेतकऱ्यांनी अनेकदा रस्त्यावर उतरून आंदोलन केलेले आहे.दोषींवर कारवाईची मागणीचुकीचा सर्व्हेमुळे अनेक शेतकऱ्यांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. दर्जाहीन कामांमुळे धरणाच्या बांधकामांना अनेक ठिकाणी तडे गेल्याचेही दिसून येते.बहुतांश ठिकाणी कालव्याचे पाणी खाली व शेत जमीन वर आहे़ अशा स्थितीत पाणी कसे घ्यावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे़ यासंबधी अधिकाऱ्यांपुढे शेतकऱ्यांनी वेळोवेळी अडचणी मांडल्या़ परंतु कोणीही याकडे लक्ष दिलेले नाही.यावर्षी बेंबळा धरणही केवळ २८ टक्केच भरले. धरणातील काही पाणी पिण्यासाठी राखिव ठेवण्यात आले. असे असताना हजारो गॅलन लिटर पाणी निरर्थक वाहत जाणे ही बाब अक्षम्य आहे. त्यामुळे या प्रकाराला दोषी असणाऱ्यांविरुद्ध कारवाईची गरज आहे. यासंदर्भात बेंबळाचे उपअभियंता प्रशांत पिंगळे यांचेशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, सावरगाव परिसर माझ्याकडे नाही. नगराळे साहेबांकडे हा परिसर येतो. त्यांना या प्रकाराची माहिती देऊन दखल घेण्यास सांगतो.

टॅग्स :Waterपाणी