शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
4
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
5
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
6
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
7
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
8
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
9
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
10
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
12
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
13
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
14
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
15
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
16
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
17
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
18
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
19
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
20
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?

शेतीचा खर्च लाखांमध्ये, उत्पन्न मात्र हजारोतही नाही

By admin | Updated: October 25, 2014 01:51 IST

यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या घरात काहीही येऊ शकले नाही. २० एकरातील २० पोते सोयाबीन तेही निकृष्ट दर्जाचे झाले आहे.

महागाव : यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या घरात काहीही येऊ शकले नाही. २० एकरातील २० पोते सोयाबीन तेही निकृष्ट दर्जाचे झाले आहे. २० एकर सोयाबीनचा खर्च २ लाख ४६ हजार रुपये व उत्पन्न मात्र ६० हजार रुपये अशी परिस्थिती बहुतांश शेतकऱ्यांची असल्याने यावर्षी दिवाळीत अपेक्षित विक्री झाली नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. बाजारात मंदीची लाट दिसून येत आहे. दरवर्षी महागाव तालुक्याला केवळ कापड व्यवसायात दोन कोटी रूपयांच्या घरात उलाढाल होते. परंतु यावर्षी मात्र कापड व्यवसायी चांगलेच अडचणीत सापडले. यावर्षी त्यांचा अनुभव काही वेगळा आहे. दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणात कापड विक्रीतून केवळ लाखो रूपयांची उलाढाल झाली आहे. किराणा व्यापाऱ्यांचीसुद्धा त्यापेक्षा वेगळी अवस्था नाही. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठेत मंदीची लाट असल्याचे दिसून येते. करंजखेड येथील शेतकऱ्यांनी सोयाबीन काढण्यापेक्षा त्यामध्ये जनावरे सोडने पसंत केले. उटी येथील शेतकरी आत्माराम गावंडे यांना २० एकरात, २० क्विंटल सोयाबीन झाल्याचे त्यांनी सांगितले. सोयाबीनला आलेला खर्च पाहता २८ रुपयांची एक याप्रमाणे ४० बॅग लागल्या १ लाख १२ हजार रुपयांच्या बियाण्यांची दोन वेळा पेरणी केली. तीन हजार रुपये किमतीच्या औषधांच्या दोन वेळा फवारणी केली. निंदणासाठी ४० हजार रुपये, राण तयार करायला आलेला खर्च वेगळा. अशा प्रकारे २० एकरला २ लाख ४६ हजार रुपये खर्च आला. उत्पन्न मात्र केवळ २० क्विंटल आजच्या भावाने ६० हजार रुपये या मालाच्या हाती आले आहे. हिच स्थिती सधन शेतकऱ्यांची आहे. इतरांची परिस्थिती याहीपेक्षा बिकट आहे. यासाठी सोयाबीनचे सामूहिक पंचनामे होणे गरजेचे आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य पंजाबराव खडकेकर यांनी त्याची सुरूवात केली आहे. हिवरा सर्कलच्या सर्व शेतकऱ्यांना जागरूक करून सोयाबीनचे पंचनामे तयार करायला सांगितले आहे. तरच शासनासमोर काहीतरी मागता येणार आहे. सोयाबीनचे पंचनामे नसतील तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई इतर कुठल्याही आधारावर मिळने अशक्य आहे. त्यासाठी नवनिर्वाचित आमदार राजेंद्र नजरधने यांनी तालुक्यातील सोयाबीनचा प्रश्न सोडविण्यासाठी तालुकास्तरावर प्रशासनाची बैठक घ्यावी आणि कृषी विभाग व महसूल विभागाला यामध्ये गांर्भीयाने लक्ष घालण्यास सांगून पंचनामे करण्यास भाग पाडावे. अशी तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)