शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
2
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
3
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
4
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
5
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
7
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
8
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
9
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
10
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
11
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
12
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
13
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
14
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
15
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
16
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
17
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
18
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
19
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
20
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन पिकावर लष्करी अळीचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 05:00 IST

गेल्या सप्ताहात सतत दहा दिवस पाऊस कोसळला. सततच्या पावसामुळे खरिपातील सोयाबीनसह मूग, उडीद आणि कापूस पिकाला फटका बसला. सोयाबीनवर लष्करी अळीचे आक्रमण झाले. ही अळी पानांवर बसून छिद्र पाडत आहे. सततच्या पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे खरीप पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे. सोयाबीनचे उभे पीक डोळ्यादेखत नष्ट होत असल्याने शेतकरी काळजीत पडले आहे.

ठळक मुद्देउमरखेड तालुका : शेतकरी चिंताग्रस्त, उभ्या पिकांचे नुकसान, पाने कुरतडली

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : तालुक्यात गेल्या सप्ताहात सतत पाऊस झाला. या पावसामुळे सोयाबीनवर लष्करी अळीने हल्ला केला. यामुळे सोयाबीनचे नुकसान होत असल्याने तालुक्यातील शेतकरी चिंताक्रांत झाले आहे.गेल्या सप्ताहात सतत दहा दिवस पाऊस कोसळला. सततच्या पावसामुळे खरिपातील सोयाबीनसह मूग, उडीद आणि कापूस पिकाला फटका बसला. सोयाबीनवर लष्करी अळीचे आक्रमण झाले. ही अळी पानांवर बसून छिद्र पाडत आहे. सततच्या पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे खरीप पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे. सोयाबीनचे उभे पीक डोळ्यादेखत नष्ट होत असल्याने शेतकरी काळजीत पडले आहे. तालुक्यात सोयाबीनसह कापूस, मूग, उडीद आणि हळदीचेही मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. यावर्षी कापूस आणि सोयाबीनची जादा लागवड करण्यात आली. मात्र आता पिकावर अळीने हल्ला केल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले आहे.सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. अनेकांच्या शेतात सोयाबीनचे बियाणे उगवले नाही. मात्र शेतकऱ्यांनी आर्थिक तजवीज करून दुबार पेरणी केली. आता पीक ऐन जोमात असताना अतिपावसाने दगा दिला. अनेक शेतांमध्ये सर्वत्र पाणी साचले. यामुळे कापूस व सोयाबीन उत्पादक संकटात सापडले आहे.तालुक्यात सर्वत्र दहा दिवस सतत पाऊस सुरू असल्याने लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. या अळीमुळे सोयाबीन पिवळे पडत आहे. तालुक्यातील लोकप्रतिनिधी व प्रशासनाने शेताच्या बांधावर जावून पिकांची पाहणी करावी आणि नुकसानग्रस्त शेतकºयांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे. शेतकºयांना लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून आर्थिक मदतीची अपेक्षा आहे.महागाव तालुक्यात शेंगा गळाल्यामहागाव : तालुक्यात घोनसरा परिसरात अनेक शेतांमधील सोयाबीन शेंगा गळत आहे. सततच्या पावसामुळे पीक अडचणीत आले आहे. जमिनीतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असल्याने कपाशीची मुळेही ढिली होत आहे. कपाशीवर पांढरी माशी व तुडतुडे आणि बुरशीचा प्रादुर्भाव वाढला आहे. जमीन चिबडल्याने सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद यांच्यासह भाजीपाला आणि फळवर्गीय पिकांवर विविध किटकांचा प्रादुर्भाव होत आहे. यामुळे महागाव तालुक्यातील शेतकरी संकटात सापडले आहे.

टॅग्स :agricultureशेती