शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
2
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
3
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
4
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
5
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
6
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
7
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
8
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका
9
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलावर गुन्हा दाखल; १५० हून अधिक लोकांना लाखोंचा फटका
10
Stock Market Today: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, निफ्टी ४० अंकांनी घसरला; Glenmark Pharma, Dixon Tech मध्ये तेजी
11
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
12
कुलदीप यादव सुसाट! जडेजा आणि मुरलीधरनचा रेकॉर्ड ब्रेक, मलिंगाचाही 'हा' विक्रम धोक्यात
13
पाकिस्तानची स्थिती बिकट होणार! भारतीय हवाई दलाला मिळणार ९७ तेजस विमाने
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार ७ नियम, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; ऑनलाइन गेमिंगपासून तिकिटापर्यंत आहे यादीत
15
Asia Cup 2025: हारिस रौफ आणि साहिबजादा फरहानवर बंदीची टांगती तलवार, मैदानातील गैरवर्तन महागात पडणार?
16
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
17
या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस, अख्खा महाराष्ट्र सोबत आहे; हताश शेतकरी घेतायेत मृत्यूशी गळाभेट
18
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
19
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
20
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?

सोयाबीन पिकावर लष्करी अळीचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 05:00 IST

गेल्या सप्ताहात सतत दहा दिवस पाऊस कोसळला. सततच्या पावसामुळे खरिपातील सोयाबीनसह मूग, उडीद आणि कापूस पिकाला फटका बसला. सोयाबीनवर लष्करी अळीचे आक्रमण झाले. ही अळी पानांवर बसून छिद्र पाडत आहे. सततच्या पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे खरीप पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे. सोयाबीनचे उभे पीक डोळ्यादेखत नष्ट होत असल्याने शेतकरी काळजीत पडले आहे.

ठळक मुद्देउमरखेड तालुका : शेतकरी चिंताग्रस्त, उभ्या पिकांचे नुकसान, पाने कुरतडली

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : तालुक्यात गेल्या सप्ताहात सतत पाऊस झाला. या पावसामुळे सोयाबीनवर लष्करी अळीने हल्ला केला. यामुळे सोयाबीनचे नुकसान होत असल्याने तालुक्यातील शेतकरी चिंताक्रांत झाले आहे.गेल्या सप्ताहात सतत दहा दिवस पाऊस कोसळला. सततच्या पावसामुळे खरिपातील सोयाबीनसह मूग, उडीद आणि कापूस पिकाला फटका बसला. सोयाबीनवर लष्करी अळीचे आक्रमण झाले. ही अळी पानांवर बसून छिद्र पाडत आहे. सततच्या पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे खरीप पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे. सोयाबीनचे उभे पीक डोळ्यादेखत नष्ट होत असल्याने शेतकरी काळजीत पडले आहे. तालुक्यात सोयाबीनसह कापूस, मूग, उडीद आणि हळदीचेही मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. यावर्षी कापूस आणि सोयाबीनची जादा लागवड करण्यात आली. मात्र आता पिकावर अळीने हल्ला केल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले आहे.सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. अनेकांच्या शेतात सोयाबीनचे बियाणे उगवले नाही. मात्र शेतकऱ्यांनी आर्थिक तजवीज करून दुबार पेरणी केली. आता पीक ऐन जोमात असताना अतिपावसाने दगा दिला. अनेक शेतांमध्ये सर्वत्र पाणी साचले. यामुळे कापूस व सोयाबीन उत्पादक संकटात सापडले आहे.तालुक्यात सर्वत्र दहा दिवस सतत पाऊस सुरू असल्याने लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. या अळीमुळे सोयाबीन पिवळे पडत आहे. तालुक्यातील लोकप्रतिनिधी व प्रशासनाने शेताच्या बांधावर जावून पिकांची पाहणी करावी आणि नुकसानग्रस्त शेतकºयांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे. शेतकºयांना लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून आर्थिक मदतीची अपेक्षा आहे.महागाव तालुक्यात शेंगा गळाल्यामहागाव : तालुक्यात घोनसरा परिसरात अनेक शेतांमधील सोयाबीन शेंगा गळत आहे. सततच्या पावसामुळे पीक अडचणीत आले आहे. जमिनीतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असल्याने कपाशीची मुळेही ढिली होत आहे. कपाशीवर पांढरी माशी व तुडतुडे आणि बुरशीचा प्रादुर्भाव वाढला आहे. जमीन चिबडल्याने सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद यांच्यासह भाजीपाला आणि फळवर्गीय पिकांवर विविध किटकांचा प्रादुर्भाव होत आहे. यामुळे महागाव तालुक्यातील शेतकरी संकटात सापडले आहे.

टॅग्स :agricultureशेती