शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

सोयाबीन पिकावर लष्करी अळीचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 05:00 IST

गेल्या सप्ताहात सतत दहा दिवस पाऊस कोसळला. सततच्या पावसामुळे खरिपातील सोयाबीनसह मूग, उडीद आणि कापूस पिकाला फटका बसला. सोयाबीनवर लष्करी अळीचे आक्रमण झाले. ही अळी पानांवर बसून छिद्र पाडत आहे. सततच्या पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे खरीप पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे. सोयाबीनचे उभे पीक डोळ्यादेखत नष्ट होत असल्याने शेतकरी काळजीत पडले आहे.

ठळक मुद्देउमरखेड तालुका : शेतकरी चिंताग्रस्त, उभ्या पिकांचे नुकसान, पाने कुरतडली

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : तालुक्यात गेल्या सप्ताहात सतत पाऊस झाला. या पावसामुळे सोयाबीनवर लष्करी अळीने हल्ला केला. यामुळे सोयाबीनचे नुकसान होत असल्याने तालुक्यातील शेतकरी चिंताक्रांत झाले आहे.गेल्या सप्ताहात सतत दहा दिवस पाऊस कोसळला. सततच्या पावसामुळे खरिपातील सोयाबीनसह मूग, उडीद आणि कापूस पिकाला फटका बसला. सोयाबीनवर लष्करी अळीचे आक्रमण झाले. ही अळी पानांवर बसून छिद्र पाडत आहे. सततच्या पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे खरीप पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे. सोयाबीनचे उभे पीक डोळ्यादेखत नष्ट होत असल्याने शेतकरी काळजीत पडले आहे. तालुक्यात सोयाबीनसह कापूस, मूग, उडीद आणि हळदीचेही मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. यावर्षी कापूस आणि सोयाबीनची जादा लागवड करण्यात आली. मात्र आता पिकावर अळीने हल्ला केल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले आहे.सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. अनेकांच्या शेतात सोयाबीनचे बियाणे उगवले नाही. मात्र शेतकऱ्यांनी आर्थिक तजवीज करून दुबार पेरणी केली. आता पीक ऐन जोमात असताना अतिपावसाने दगा दिला. अनेक शेतांमध्ये सर्वत्र पाणी साचले. यामुळे कापूस व सोयाबीन उत्पादक संकटात सापडले आहे.तालुक्यात सर्वत्र दहा दिवस सतत पाऊस सुरू असल्याने लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. या अळीमुळे सोयाबीन पिवळे पडत आहे. तालुक्यातील लोकप्रतिनिधी व प्रशासनाने शेताच्या बांधावर जावून पिकांची पाहणी करावी आणि नुकसानग्रस्त शेतकºयांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे. शेतकºयांना लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून आर्थिक मदतीची अपेक्षा आहे.महागाव तालुक्यात शेंगा गळाल्यामहागाव : तालुक्यात घोनसरा परिसरात अनेक शेतांमधील सोयाबीन शेंगा गळत आहे. सततच्या पावसामुळे पीक अडचणीत आले आहे. जमिनीतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असल्याने कपाशीची मुळेही ढिली होत आहे. कपाशीवर पांढरी माशी व तुडतुडे आणि बुरशीचा प्रादुर्भाव वाढला आहे. जमीन चिबडल्याने सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद यांच्यासह भाजीपाला आणि फळवर्गीय पिकांवर विविध किटकांचा प्रादुर्भाव होत आहे. यामुळे महागाव तालुक्यातील शेतकरी संकटात सापडले आहे.

टॅग्स :agricultureशेती