शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

ज्वारीवर लष्करी अळींचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 02:00 IST

पुसद तालुका व उपविभागात गेल्या पंधरवड्यात संततधार पावसाने खरीप पिकांची हानी झाली. सोयाबीन व कपाशी पिकाला मोठा फटका बसला. अनेक शेतात पाणी साचल्याने पिके पिवळी पडली. सोयाबीनवर विविध अळ्यांनी हल्ला चढविला. अळ्यांमुळे कपाशीची पातीगळ सुरू झाली. आता खरिपातील ज्वारीवरही लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. अळ्यांच्या हल्ल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.

ठळक मुद्देपुसद उपविभाग : शेतकरी चिंताग्रस्त, कृषी विभागासमोर उभे ठाकले आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : उपविभागात सोयाबीन आणि कपाशीवर विविध अळ्यांचा प्रादुर्भाव झाला. आता ज्वारी पिकावरही लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी चिंताक्रांत झाले आहे. कृषी विभागासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.पुसद तालुका व उपविभागात गेल्या पंधरवड्यात संततधार पावसाने खरीप पिकांची हानी झाली. सोयाबीन व कपाशी पिकाला मोठा फटका बसला. अनेक शेतात पाणी साचल्याने पिके पिवळी पडली. सोयाबीनवर विविध अळ्यांनी हल्ला चढविला. अळ्यांमुळे कपाशीची पातीगळ सुरू झाली. आता खरिपातील ज्वारीवरही लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. अळ्यांच्या हल्ल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. अळ्यांना परतून लावण्यासाठी विविध कीटकनाशकांची फवारणी केली जात आहे. तरीही ज्वारीचे पीक फस्त होत आहे.तालुक्यातील भडंगी तांडा, धनसिंगनगर, सांडवा, मांडवा आदी परिसरात ज्वारीवर मोठ्या प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसत आहे. यावर्षी अनेकांनी ज्वारी पिकाकडे मोर्चा वळविला होता. मात्र धनसिंगनगर येथील अनिल राठोड यांच्या शेतातील दोन हेक्टरवरील ज्वारीवर अळ्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे त्यांचे संपूर्ण पिकच नष्ट होत आहे. तालुका कृषी विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या ज्वारी पिकांचे तातडीने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.याच परिसिरातील मोतीराम राठोड, सुनील राठोड, मांगीलाल राठोड आदी शेतकऱ्यांच्या शेतातही हीच स्थिती दिसून येत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे.विमा काढणाऱ्यांना नुकसान भरपाईतालुक्यातील ज्वारी पिकांवर मोठ्या प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड यांनी कबूल केले. लष्करी अळ्यांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कृषी सहायकांमार्फत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या ज्वारी पिकांची पाहणी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्या शेतकऱ्यांनी ज्वारी पिकाचा विमा भरलेला आहे त्यांना नुकसान भरपाई देण्याची कारवाई केली जाईल, असेही बेरड यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती