शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांची खासगी दुकानदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 06:00 IST

शेतमालाला योग्य भाव मिळावा, याकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मिती करण्यात आली. शेतमालाच्या खरेदी-विक्रीचे लिलाव पद्धतीने व्यवहार करून शेतकऱ्यांना जादा भाव मिळवून देण्याची जबाबदारी बाजार समितीची आहे. परंतु प्रशासकीय कारभार असलेल्या येथील बाजार समितीत यावर्षी खरेदी-विक्रीचे व्यवहार होताना दिसत नाही.

ठळक मुद्देदारव्हा तालुका : शेतकऱ्यांचे नुकसान, बाजार समितीत दाण्याचीही खरेदी नाही

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : शहरात शेतमालाच्या खरेदीसाठी व्यापाºयांनी खासगी दुकाने उघडली. ग्रामीण भागातसुद्धा खेडा खरेदी जोरात सुरू आहे. या दोन्ही ठिकाणी भाव व वजनात शेतकऱ्यांची अक्षरश: लूट सुरू असल्याच्या तक्रारी आहे. शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डमध्येच व्हायला पाहिजे. त्यामुळे लिलाव पद्धतीने मालाला योग्य भाव मिळेल. परंतु यावर्षी ११ ऑक्टोबरला मुहूर्ताला केवळ ५० क्विंटल सोयाबीन विक्रीस आले. त्यानंतर धान्याच्या दाण्याची अथवा कापसाच्या बोंडाचीही बाजार समितीत खरेदी झाली नाही.शेतमालाला योग्य भाव मिळावा, याकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मिती करण्यात आली. शेतमालाच्या खरेदी-विक्रीचे लिलाव पद्धतीने व्यवहार करून शेतकऱ्यांना जादा भाव मिळवून देण्याची जबाबदारी बाजार समितीची आहे. परंतु प्रशासकीय कारभार असलेल्या येथील बाजार समितीत यावर्षी खरेदी-विक्रीचे व्यवहार होताना दिसत नाही. व्यापाऱ्यांना यार्डमध्ये लिलाव पद्धतीने माल खरेदी करण्यात रस नाही. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी कापूस, धान्याच्या खरेदीसाठी आपाली दुकाने थाटली. तेथेच शेतमाल खरेदी केला जात आहे. बाजार समितीत लिलावच होत नसल्याने शेतकऱ्यांना नाईलाजास्तव आपला शेतमाल खुल्या बाजारात व्यापाऱ्यांना विकण्याशिवाय पर्याय नाही.या व्यवहारात कोणत्याही प्रकारची पावती मिळत नाही. त्यामुळे शेतमालाला योग्य भाव तर सोडाच, वजन काट्यातही लूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परतीच्या पावसाने तालुक्याला मोठा दणका दिल्याने सोयाबीन, कापूस व तुरीचे मोठ््या प्रमाणात नुकसान झाले. सोयाबीनच्या उतरीत घट आली. सोयाबीन गंजीवर पाऊस कोसळल्याने सोयाबीन सडले. वादळी पावसाने कापूस व तुरीला झोडपून काढले. तूर जमीनदोस्त झाली. त्यामुळे शेती पिकांची वाईट अवस्था असताना पदरात पडलेल्या पिकांचा लिलाव होऊन जास्तीत जास्त भाव मिळावा, ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. परंतु त्याकरिता बाजार समितीत व्यवहार होणे गरजेचे आहे. तथापि बाजार समितीकडून कोणत्याही प्रकारचे प्रयत्न होताना दिसत नाही.खुल्या बाजारात मोठ्या प्रमाणात कापूस, सोयाबीनची खरेदी केली जात आहे. शहरासह ग्रामीण भागात खेडा खरेदी सुरू आहे. दररोज हजारो क्विंटलचे व्यवहार होत आहे. व्यापाऱ्यांनी शेतमाल घेऊन ठेवला आहे. त्यांचे खासगी व इतर गोदाम हाऊसफुल आहे. मात्र खुल्या व्यवहारावर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे भाव व वजनात गडबड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे. शिवाय या व्यवहाराचे रेकॉर्ड राहत नसल्याने काळाबाजार होऊ शकतो.तरीही बाजार समिती हे व्यवहार रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारची ठोस पावले उचलत नाही. त्यामुळे यावर्षी बाजार समितीत लिलाव पद्धतीने शेतमालाचे व्यवहार होताना दिसत नाही.मार्केट यार्डमध्येच शेतमालाची खरेदी करावी. अन्यथा परवाना निलंबित करण्याचे पत्र व्यापाºयांना दिले. त्यांची प्रत्यक्ष भेटही घेतली. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. लवकरच दुसरे पत्र देऊन परवाना निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.- जी.एस. कुमरेप्रशासक, कृउबा समिती, दारव्हानिबंधक, प्रशासकाची भूमिका महत्त्वाचीयेथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक नेमण्यात आले. संचालक मंडळ नसल्याने शेतमाल खरेदीत प्रशासक आणि सहाय्यक निबंधकांची भूमिका महत्त्वाची आहे. खरेदीत इलेक्ट्रॉनिक काट्याचा वापर केला जातो. या काट्यावर अर्ध्या क्विंटलचे वजन करताना पोत्यांच्या वजनाच्या नावाखाली दहा ग्रॅमची कट्टी आधीच मारली जाते. त्यानंतर ४९ किलो ९९० ग्राम मध्ये ९०० ग्रॅमची दांडी मारली जाऊ शकते. कारण या काट्यावर नऊ व शून्य हे आकडे सारखेच दिसतात. यात हातचलाखी करण्यास वाव आहे. शेतकºयांना योग्य भाव मिळेल की नाही, याची खात्री नाही. अशा स्थितीत सहाय्यक निबंधक व प्रशासकांनी कडक भूमिका घेऊन शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार बाजार समितीतच बंधनकारक करून शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डagricultureशेती