शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

व्यापाऱ्यांचा संप, बाजार समितीत शुकशुकाट

By admin | Updated: July 24, 2016 00:40 IST

शेतमाल विक्रीतील अडत थेट व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याच्या निर्णयाविरोधात बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी संप पुकारला आहे.

एक टक्का अडतीवर खल : शेतकऱ्यांपुढील अडचणी वाढल्या, अडत्यांना भीती कराची यवतमाळ : शेतमाल विक्रीतील अडत थेट व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याच्या निर्णयाविरोधात बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी संप पुकारला आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे तर, दुसरीकडे व्यापाऱ्यांनी एक टक्का अडत अडतदारांना देण्याचा निर्णय घेतला आहे. अडत्यांनी मात्र या वाटाघाटीस नकार दिला आहे. व्यापाऱ्यांच्या संपामुळे बाजार समितीत शुकशुकाट आहे. शेतकरी हित साधत असल्याचा कांगावा करणाऱ्या बाजार समित्या सध्यातरी शेतकऱ्यांशी विरोधकांप्रमाणेच वागत आहेत. आर्थिक अडचणीत सापडलेले शेतकरी बाजार समिती कधी सुरू होणार याची वाट पाहात आहे. मात्र गत अनेक दिवसांपासून मार्ग न निघाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. व्यापाऱ्यांकडून अडत वसुलीचा उल्लेख नवीन अध्यादेशात करण्यात आला आहे. यामुळे व्यापाऱ्यांकडून अडत वसूल झाल्याने अडत्यांच्या पैशावर टॅक्सचा बोझा पडणार आहे. पूर्वी शेतकऱ्यांकडून अडत कापली जात होती. यामुळे अडत्यांना टॅक्स भरावा लागत नव्हता. आता व्यापाऱ्यांंकडून अडत कापली जाणार आहे. यामुळे अडतदारांच्या अडतवर टॅक्स लागणार आहे. यामुळे पूर्वी लपविली जाणारी धान्याची उलाढाल आयकर विभागाच्या नजरेत येणार आहे. शासनाच्या तिजोरीतून चोरी जाणाऱ्या करालाही ब्रेक लागणार असून बाजार समितीमधील प्रत्यक्ष उलाढाल समोर येणार आहे. १३ लाख रुपयांपेक्षा अधिक उलाढाल झाल्यास अडत्यांना सेवा कर भरावा लागणार आहे. या प्रमुख कारणाने व्यापारी आणि अडत्यांनी खरेदी थांबविली आहे. अडत न देण्याचे कारण व्यापारी आणि अडते पुढे करत आहे. या सर्व प्रकारात शेतकऱ्यांची मात्र कोडी होत आहे. (शहर वार्ताहर) एक रुपयाच का ? शेतकऱ्यांकडून १.७५ पैसे अडत वसूल केली जात होती. आता ही अडत एक रुपयाच करण्यात यावी, असा प्रस्ताव व्यापाऱ्यांनी अडत्यांपुढे ठेवला आहे. यापूर्वी शेतकऱ्यांच्या बाबतीत मात्र असा निर्णय कधीही झाला नाही. दरात तफावत झाल्यास शेतमालाच्या एकूण किमतीत फरक पडेल. कमी अडत असलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांना जास्त भाव मिळेल. अधिक अडत घेणाऱ्या ठिकाणी कमी भाव मिळेल. यामुळे शेतमालास कमी दर मिळणाऱ्या बाजार समितीत येणारा शेतमाल थांबेल, असा धोका व्यापारी आणि अडत्यांना वाटत आहे. राज्यभरात सर्वच व्यापाऱ्यांनी एकच अडत ठेवावी. यामुळे शेतमालाच्या दरात कमी अधिक दराची तफावत निर्माण होण्याचा धोका आहे. सर्व बाजार समितीमधील व्यापारी आणि अडत्यांचा एकच निर्णय व्हावा म्हणून बैठका घेतल्या जात आहे.