शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
2
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
3
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
4
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
5
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
6
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
7
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
8
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
9
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
10
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
11
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
12
Pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
13
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
14
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
15
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...
16
TATA Motors ला ₹२,३८,६१,६६,००,००० चं मोठं नुकसान! JLR वर सायबर हल्ला; उत्पादन थांबलं, शेअर्समध्ये मोठी घसरण
17
हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
18
मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
19
३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
20
GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, "आम्ही इकडेच थांबवणार नाही..."

व्यापाऱ्यांचा संप, बाजार समितीत शुकशुकाट

By admin | Updated: July 24, 2016 00:40 IST

शेतमाल विक्रीतील अडत थेट व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याच्या निर्णयाविरोधात बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी संप पुकारला आहे.

एक टक्का अडतीवर खल : शेतकऱ्यांपुढील अडचणी वाढल्या, अडत्यांना भीती कराची यवतमाळ : शेतमाल विक्रीतील अडत थेट व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याच्या निर्णयाविरोधात बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी संप पुकारला आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे तर, दुसरीकडे व्यापाऱ्यांनी एक टक्का अडत अडतदारांना देण्याचा निर्णय घेतला आहे. अडत्यांनी मात्र या वाटाघाटीस नकार दिला आहे. व्यापाऱ्यांच्या संपामुळे बाजार समितीत शुकशुकाट आहे. शेतकरी हित साधत असल्याचा कांगावा करणाऱ्या बाजार समित्या सध्यातरी शेतकऱ्यांशी विरोधकांप्रमाणेच वागत आहेत. आर्थिक अडचणीत सापडलेले शेतकरी बाजार समिती कधी सुरू होणार याची वाट पाहात आहे. मात्र गत अनेक दिवसांपासून मार्ग न निघाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. व्यापाऱ्यांकडून अडत वसुलीचा उल्लेख नवीन अध्यादेशात करण्यात आला आहे. यामुळे व्यापाऱ्यांकडून अडत वसूल झाल्याने अडत्यांच्या पैशावर टॅक्सचा बोझा पडणार आहे. पूर्वी शेतकऱ्यांकडून अडत कापली जात होती. यामुळे अडत्यांना टॅक्स भरावा लागत नव्हता. आता व्यापाऱ्यांंकडून अडत कापली जाणार आहे. यामुळे अडतदारांच्या अडतवर टॅक्स लागणार आहे. यामुळे पूर्वी लपविली जाणारी धान्याची उलाढाल आयकर विभागाच्या नजरेत येणार आहे. शासनाच्या तिजोरीतून चोरी जाणाऱ्या करालाही ब्रेक लागणार असून बाजार समितीमधील प्रत्यक्ष उलाढाल समोर येणार आहे. १३ लाख रुपयांपेक्षा अधिक उलाढाल झाल्यास अडत्यांना सेवा कर भरावा लागणार आहे. या प्रमुख कारणाने व्यापारी आणि अडत्यांनी खरेदी थांबविली आहे. अडत न देण्याचे कारण व्यापारी आणि अडते पुढे करत आहे. या सर्व प्रकारात शेतकऱ्यांची मात्र कोडी होत आहे. (शहर वार्ताहर) एक रुपयाच का ? शेतकऱ्यांकडून १.७५ पैसे अडत वसूल केली जात होती. आता ही अडत एक रुपयाच करण्यात यावी, असा प्रस्ताव व्यापाऱ्यांनी अडत्यांपुढे ठेवला आहे. यापूर्वी शेतकऱ्यांच्या बाबतीत मात्र असा निर्णय कधीही झाला नाही. दरात तफावत झाल्यास शेतमालाच्या एकूण किमतीत फरक पडेल. कमी अडत असलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांना जास्त भाव मिळेल. अधिक अडत घेणाऱ्या ठिकाणी कमी भाव मिळेल. यामुळे शेतमालास कमी दर मिळणाऱ्या बाजार समितीत येणारा शेतमाल थांबेल, असा धोका व्यापारी आणि अडत्यांना वाटत आहे. राज्यभरात सर्वच व्यापाऱ्यांनी एकच अडत ठेवावी. यामुळे शेतमालाच्या दरात कमी अधिक दराची तफावत निर्माण होण्याचा धोका आहे. सर्व बाजार समितीमधील व्यापारी आणि अडत्यांचा एकच निर्णय व्हावा म्हणून बैठका घेतल्या जात आहे.