शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

कळंब येथील शहीद स्मारक दुर्लक्षित अवस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 22:15 IST

इंदिरा गांधी चौकात शहीदांचे स्मारक ४६ वर्षांपासून दुर्लक्षित अवस्थेत खितपत पडलेले आहे़ स्मारकाचे सौंदर्यीकरण करण्यात यावे,....

ठळक मुद्देइंदिरा गांधी चौकात शहीदांचे स्मारक ४६ वर्षांपासून दुर्लक्षित

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : इंदिरा गांधी चौकात शहीदांचे स्मारक ४६ वर्षांपासून दुर्लक्षित अवस्थेत खितपत पडलेले आहे़ स्मारकाचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, अशी स्मारक समिती व गावकºयांची अनेक वर्षांपासूनची आहे़ परंतु स्मारकावरुन राजकारण करण्यापलीकडे एकाही राजकीय पक्षाचे काम पुढे सरकले नाही.विद्यमान उपनगराध्यक्ष मनोज काळे व भारतीय जनता पक्षांच्या कार्यकर्त्यांनी हा विषय विरोधी पक्षात असताना जोरकसपणे मांडला. एवढेच नव्हे तर उपोषणाचेही हत्यार उपसण्यात आले होते. त्यामुळेच मागासक्षेत्र अनुदान विकास निधीतून निधीची तरतूद करण्यात आली़ परंतु मागील सात वर्षांपासून स्मारक बांधकामाला मुहूर्तच सापडलेला नाही़ दुसरीकडे स्मारक समिती नेमणाºयांनी समिती स्थापण्यातच धन्यता मानली. त्यापुढे त्यांचे पाऊल सरकलेच नाही. तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत होती. आता तर शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे. महत्वाचे म्हणजे ज्यांनी हा विषय सातत्याने उपस्थित केला तेच मनोज काळे आता उपनगराध्यक्ष आहे. बांधकाम सभापती आशिष धोबे हेही या समितीत आहे. त्यांच्याकडे मागील दोन वर्षांपासून सत्ता असनूही शहीद स्मारकाचा विषय बाजूला ठेवला आहे. विरोधी पक्षात असताना शहीद स्मारकासाठी रान उठवायचे आणि सत्तेत आल्यानंतर मूग गिळून बसायचे, ही कुठली कार्यपद्धती आहे, असा प्रश्न आता जनतेतून विचारला जातो.देश पारतंत्र्यात असताना तालुक्यातील वीरांनी स्वत:च्या घरावर तुळशीपत्र ठेऊन लढ्यात उडी घेतली़ यामध्ये रामभाऊ महादेव माळी़, वासूदेव दाजीबा आष्टीकर, महादेव शिवराम माळी व चंपत मराठा या चौघांना वीर मरण आले़ त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थच कळंब येथील इंदिरा गांधी चौकात १९७३ साली शहीद स्मारक उभारण्यात आले़ परंतु काळाच्या ओघात याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले़ परिणामी स्मारकाच्या सभोवताल अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमण केले़ त्यामुळे हे स्मारक दिसेनासे झाले आहे. वास्तविकपणे शहीद स्मारकांचे सौंदर्यीकरण व स्मृती जपण्याची जबाबदारी नगरपंचायतची आहे़ परंतु तेही आपली जबाबदारी निट पार पाडताना दिसून येत नाही. मागील ४६ वर्षात मंत्री, खासदार-आमदार व इतर लोकप्रतिनिधींनी स्मारकांच्या सौंदर्यीकरणासाठी अनेकदा आश्वासन दिले़ परंतु त्यांनी आपला शब्द पाळला नाही.