शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

स्थानिक स्वराज्य संस्था सदस्यांनी लढा उभारावा

By admin | Updated: August 15, 2016 01:18 IST

स्थानिक स्वराज्य संस्था सदस्यांचे अधिकार गोठविल्याने या संस्थांचे सदस्य नामधारी राहण्याची भीती आहे.

श्रीहरी अणे : यवतमाळात विदर्भवाद्यांची बैठक यवतमाळ : स्थानिक स्वराज्य संस्था सदस्यांचे अधिकार गोठविल्याने या संस्थांचे सदस्य नामधारी राहण्याची भीती आहे. त्यामुळे यासाठी आता संघटनात्मक लढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी महाधिवक्ता आणि विदर्भवादी अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी येथे केले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या यवतमाळ मतदारसंघातून स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर उमेदवारी देण्यासंदर्भात येथील टिंबर भवनात रविवारी बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाभरातील शंभरावर नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. यासभेला दीपक निलावार, माजी आमदार विजयाताई धोटे, मंगलबाबू चिंडालिया, रफीक रंगरेज उपस्थित होते. अ‍ॅड. अणे म्हणाले, घटनेने पंचायतराज व्यवस्थेतून ग्रामपंचायतींना व स्थानिक स्वराज्य संस्थांंना मोठे अधिकार दिले आहे. मात्र गेल्या काही दिवसात या अधिकारांवर टाच आणली जात आहे. हा प्रकार घटनाविरोधी आहे. नगरसेवकांना जनाधिकार बजावता येत नसेल तर त्यांच्या पदाला किंमत राहणार नाही. त्यामुळे सर्वांनीच पक्षभेद विसरुन एकत्र येण्याची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेसाठी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांचा प्रतिनिधी पाठविला जातो. या प्रतिनिधीने सदस्यांच्या समस्या मांडणे अपेक्षित आहे. वेगळ्या विदर्भाच्या लढाईत आता नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्यांनीही सक्रिय होत विदर्भवादी विचारधारेच्या उमेदवारालाच पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. विदर्भाच्या मागणीसाठी सर्वच पक्षातील पदाधिकारी आमच्या सोबत आहे. हाच अजेंडा घेऊन ही निवडणूक लढवावी, यासाठी विदर्भवादी नेते मंगल चिंडालिया हे सक्षम उमेदवार असल्याचेही अ‍ॅड. अणे यांनी जाहीर केले. या सभेत जिल्ह्यातील दहा नगरपरिषदा, सहा नगरपंचायती आणि जिल्हा परिषदेचे सदस्य उपस्थित होते. प्रत्येकांनी यावेळी आपले मत मांडले. या समन्वय सभेतूनच स्थानिक स्वराज्य संस्था सदस्यांची स्वतंत्र संघटना असावी यावर सर्वांचे एकमत झाले. (कार्यालय प्रतिनिधी)