शहरं
Join us  
Trending Stories
1
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
2
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
3
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
4
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
5
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
6
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
7
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
8
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
9
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
10
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
11
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
13
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
14
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
15
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
16
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
17
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
18
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
19
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
20
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली

‘वसंत’साठी आज मुंबईत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 21:30 IST

गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेल्या वसंत सहकारी साखर कारखान्याला सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य मिळावे म्हणून देवरा समितीच्या निर्देशानुसार ३0 जुलै रोजी मुंबईत सहकार, मदत व पुनर्वसन विभागातर्फे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसहकार मंत्र्यांची उपस्थिती : तीन वर्षांपासून कामधेनू ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेल्या वसंत सहकारी साखर कारखान्याला सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य मिळावे म्हणून देवरा समितीच्या निर्देशानुसार ३0 जुलै रोजी मुंबईत सहकार, मदत व पुनर्वसन विभागातर्फे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.या बैठकीला सहकार मंत्री सुभाष देशमुख, राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार, आमदार राजेंद्र नजरधने, सहकार विभागाचे प्रधान सचिव, साखर आयुक्त, प्रादेशिक संचालक (साखर) अमरावती, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, वसंत सहकारी साखर कारखाना तथा विषयाशी सबंधित अधिकारी व पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. सहकार मंत्री देशमुख यांनीच याबाबतचे पत्र २५ जुलैला निर्गमीत केले. विदर्भातील सहकार क्षेत्रातील एकमेव पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखाना गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे. कारखान्याकडे १00 कोटींच्यावर कर्ज, कर्मचाऱ्यांचे वेतन, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे देणे बाकी आहे. अनेक वर्षांपूर्वीच कारखाना आर्थिकदृष्ट्या डबघाईस आला होता. गेल्या तीन वर्षात दोनदा कारखान्याचे अध्यक्षसुद्धा संचालक मंडळाने बदलले. तरीही कारखान्यास उर्जीतावस्था प्राप्त झाली नाही.कारखाना सुरु करण्यास प्रयत्न तोकडे पडल्याने शेतकरी, कर्मचारी, त्यांच्यावर अवलंबून असलेले कुटुंबीय यांचे हाल सुरू आहे. पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र आहे. शेतकरी, मजूर व कर्मचाºयांची कामधेनू पूर्ववत सुरु व्हावी, यासाठी, शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे डबघाईस येऊन बंद पडलेल्या कारखान्याचा अभ्यास करण्यासाठी शासनाने देवरा समितीची स्थापना केली.देवरा समितीच्या निर्देशानुसार कारखान्याला अर्थसहाय्य मिळावे म्हणून सहकार विभागाने ३० जुलै रोजी महत्त्वपूर्ण बैठक बोलाविली आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या मुंबईतील दालनात ही बैठक होणार आहे.पाच तालुक्यातील शेतकरी, मजूर संकटातगेलया तीन वर्षांपासून ‘वसंत’ बंद असल्याने पाच तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी, मजूर, कर्मचारी संकटात सापडले आहेत. त्यांचे कुटुंबीय हवालदिल झाले आहे. पाचही तालुक्यासाठी हा कारखाना कामधेनू ठरला होता. मात्र तीन वर्षांपासून बंद असल्याने आर्थिक संकट निर्माण झाले आहे. अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. त्यामुळे मुंबई होणाºया बैठकीकडे पाचही तालुक्यातील सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.