शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

‘वसंत’साठी आज मुंबईत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 21:30 IST

गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेल्या वसंत सहकारी साखर कारखान्याला सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य मिळावे म्हणून देवरा समितीच्या निर्देशानुसार ३0 जुलै रोजी मुंबईत सहकार, मदत व पुनर्वसन विभागातर्फे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसहकार मंत्र्यांची उपस्थिती : तीन वर्षांपासून कामधेनू ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेल्या वसंत सहकारी साखर कारखान्याला सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य मिळावे म्हणून देवरा समितीच्या निर्देशानुसार ३0 जुलै रोजी मुंबईत सहकार, मदत व पुनर्वसन विभागातर्फे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.या बैठकीला सहकार मंत्री सुभाष देशमुख, राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार, आमदार राजेंद्र नजरधने, सहकार विभागाचे प्रधान सचिव, साखर आयुक्त, प्रादेशिक संचालक (साखर) अमरावती, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, वसंत सहकारी साखर कारखाना तथा विषयाशी सबंधित अधिकारी व पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. सहकार मंत्री देशमुख यांनीच याबाबतचे पत्र २५ जुलैला निर्गमीत केले. विदर्भातील सहकार क्षेत्रातील एकमेव पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखाना गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे. कारखान्याकडे १00 कोटींच्यावर कर्ज, कर्मचाऱ्यांचे वेतन, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे देणे बाकी आहे. अनेक वर्षांपूर्वीच कारखाना आर्थिकदृष्ट्या डबघाईस आला होता. गेल्या तीन वर्षात दोनदा कारखान्याचे अध्यक्षसुद्धा संचालक मंडळाने बदलले. तरीही कारखान्यास उर्जीतावस्था प्राप्त झाली नाही.कारखाना सुरु करण्यास प्रयत्न तोकडे पडल्याने शेतकरी, कर्मचारी, त्यांच्यावर अवलंबून असलेले कुटुंबीय यांचे हाल सुरू आहे. पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र आहे. शेतकरी, मजूर व कर्मचाºयांची कामधेनू पूर्ववत सुरु व्हावी, यासाठी, शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे डबघाईस येऊन बंद पडलेल्या कारखान्याचा अभ्यास करण्यासाठी शासनाने देवरा समितीची स्थापना केली.देवरा समितीच्या निर्देशानुसार कारखान्याला अर्थसहाय्य मिळावे म्हणून सहकार विभागाने ३० जुलै रोजी महत्त्वपूर्ण बैठक बोलाविली आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या मुंबईतील दालनात ही बैठक होणार आहे.पाच तालुक्यातील शेतकरी, मजूर संकटातगेलया तीन वर्षांपासून ‘वसंत’ बंद असल्याने पाच तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी, मजूर, कर्मचारी संकटात सापडले आहेत. त्यांचे कुटुंबीय हवालदिल झाले आहे. पाचही तालुक्यासाठी हा कारखाना कामधेनू ठरला होता. मात्र तीन वर्षांपासून बंद असल्याने आर्थिक संकट निर्माण झाले आहे. अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. त्यामुळे मुंबई होणाºया बैठकीकडे पाचही तालुक्यातील सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.