शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

‘वसंत’साठी आज मुंबईत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 21:30 IST

गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेल्या वसंत सहकारी साखर कारखान्याला सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य मिळावे म्हणून देवरा समितीच्या निर्देशानुसार ३0 जुलै रोजी मुंबईत सहकार, मदत व पुनर्वसन विभागातर्फे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसहकार मंत्र्यांची उपस्थिती : तीन वर्षांपासून कामधेनू ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेल्या वसंत सहकारी साखर कारखान्याला सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य मिळावे म्हणून देवरा समितीच्या निर्देशानुसार ३0 जुलै रोजी मुंबईत सहकार, मदत व पुनर्वसन विभागातर्फे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.या बैठकीला सहकार मंत्री सुभाष देशमुख, राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार, आमदार राजेंद्र नजरधने, सहकार विभागाचे प्रधान सचिव, साखर आयुक्त, प्रादेशिक संचालक (साखर) अमरावती, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, वसंत सहकारी साखर कारखाना तथा विषयाशी सबंधित अधिकारी व पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. सहकार मंत्री देशमुख यांनीच याबाबतचे पत्र २५ जुलैला निर्गमीत केले. विदर्भातील सहकार क्षेत्रातील एकमेव पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखाना गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे. कारखान्याकडे १00 कोटींच्यावर कर्ज, कर्मचाऱ्यांचे वेतन, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे देणे बाकी आहे. अनेक वर्षांपूर्वीच कारखाना आर्थिकदृष्ट्या डबघाईस आला होता. गेल्या तीन वर्षात दोनदा कारखान्याचे अध्यक्षसुद्धा संचालक मंडळाने बदलले. तरीही कारखान्यास उर्जीतावस्था प्राप्त झाली नाही.कारखाना सुरु करण्यास प्रयत्न तोकडे पडल्याने शेतकरी, कर्मचारी, त्यांच्यावर अवलंबून असलेले कुटुंबीय यांचे हाल सुरू आहे. पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र आहे. शेतकरी, मजूर व कर्मचाºयांची कामधेनू पूर्ववत सुरु व्हावी, यासाठी, शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे डबघाईस येऊन बंद पडलेल्या कारखान्याचा अभ्यास करण्यासाठी शासनाने देवरा समितीची स्थापना केली.देवरा समितीच्या निर्देशानुसार कारखान्याला अर्थसहाय्य मिळावे म्हणून सहकार विभागाने ३० जुलै रोजी महत्त्वपूर्ण बैठक बोलाविली आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या मुंबईतील दालनात ही बैठक होणार आहे.पाच तालुक्यातील शेतकरी, मजूर संकटातगेलया तीन वर्षांपासून ‘वसंत’ बंद असल्याने पाच तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी, मजूर, कर्मचारी संकटात सापडले आहेत. त्यांचे कुटुंबीय हवालदिल झाले आहे. पाचही तालुक्यासाठी हा कारखाना कामधेनू ठरला होता. मात्र तीन वर्षांपासून बंद असल्याने आर्थिक संकट निर्माण झाले आहे. अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. त्यामुळे मुंबई होणाºया बैठकीकडे पाचही तालुक्यातील सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.