शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
4
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
5
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
6
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
7
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
8
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
9
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
10
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
11
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
12
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
13
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
14
Navi Mumbai: तीन मित्रांच्या जीवावर बेतली पावसाळी सहल 
15
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
16
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
17
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
18
IPO: 'स्वप्न विकणारे' आयपीओ ठरले फसवे, रिटर्न्समध्ये गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग !
19
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
20
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली

दिग्गज नेत्यांच्या सभाही ठरल्या निष्प्रभ

By admin | Updated: May 21, 2014 00:00 IST

यवतमाळ प्रचाराच्या रणधुमाळीत नेत्याची एक सभाही निवडणूक निकालाचे चित्र बदलवू शकते. अनेक दिग्गजांच्या सभांनी असा करिश्मा केल्याची अनेक उदाहरणे आहेत.

ज्ञानेश्वर मुंदे - यवतमाळ प्रचाराच्या रणधुमाळीत नेत्याची एक सभाही निवडणूक निकालाचे चित्र बदलवू शकते. अनेक दिग्गजांच्या सभांनी असा करिश्मा केल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र यवतमाळात झालेल्या दिग्गजांच्या सभांनीही उमेदवारांचा भ्रमनिरास केला. राहुल गांधी आणि राज ठाकरे यांची सभाही मतदारांचे मत परिवर्तन करण्यात अपयशी ठरल्याचेच दिसत आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे, भारिप बमसंचे प्रकाश आंबेडकर, आम आदमी पार्टीच्या मेधा पाटकर आदींच्या सभा झाल्या. मात्र उद्धव ठाकरे यांची सभा वगळता कुणाचाही फारसा प्रभाव मतदारांवर पडल्याचे निवडणूक निकालानंतर दिसले नाही. काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव मोघे यांच्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची ४ एप्रिलला सभा झाली. पोस्टल मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली. भर दुपारी सभा असल्याने अर्ध्या अधिक मैदानावर मंडपही टाकण्यात आला. मात्र ऐन वेळेपर्यंत गर्दी जमायलाच तयार नव्हती. विमानतळावर राहुल गांधींचे विमान आले. परंतु इकडे गर्दी नव्हती. त्यामुळे तब्बल तासभर त्यांना तेथेच चर्चेच्या नावाखाली थांबवून ठेवण्यात आले. त्यानंतर राहुल गांधींनी केलेल्या मार्गदर्शनाचाही मतदारांवर फारसा प्रभाव पडल्याचे दिसले नाही. ७ एप्रिल रोजी मनसेचे उमेदवार राजू पाटील राजे यांच्यासाठी राज ठाकरे यांची सभा झाली. स्वयंस्फूर्तीने पोस्टल मैदानावर राज ठाकरेंना ऐकण्यासाठी गर्दी झाली. राज ठाकरे काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष होते. परंतु राज ठाकरेंची सभाही राजू पाटील राजे यांची अनामत वाचवू शकली नाही. प्रकाश आंबेडकरांची पोस्टल मैदानावरील सभा जातीय मतांचे ध्रुवीकरण करेल, असे वाटत होते. परंतु मतदारांनी जात-पात बाजूला सारल्याचे भारिप बमसंच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांवरून सिद्ध होते. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची नेरमधील सभाही आपच्या नरेश राठोड यांना मते मिळवून देण्यात अपयशी ठरली. एकाच मैदानावर लागोपाट झालेल्या तीन दिग्गजांच्या सभेतील उद्धव ठाकरे यांचीच सभाच मतदारांना आकर्षित करू शकली, असे आता म्हणावे लागेल. त्यांच्या सभेला मोठी गर्दीही झाली होती. निवडणूक निकालानंतर भावना गवळींना मिळालेली मतांची आघाडी या सभेशी अनेकजण जोडतीलही. मात्र मोदी लाट आणि काँग्रेसबद्दलचा असंतोष मतदान यंत्रातून दिसून आला. तसे पाहता आता कुणा एका नेत्याच्या भाषणाने भुरळून जाण्याइतपत मतदार खुळे राहिले नाही. पूर्वी एखादी सभाही विजयाचे समीकरण बिघडवायची. मात्र आता तसे दिवस राहिले नाही. परंतु सभांची गर्दी आणि त्यातून होणारे मतपरिवर्तन हा नेहमी संशोधनाचच विषय राहिला आहे.