शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
2
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
3
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
4
खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
5
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
6
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
7
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
8
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
9
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२१,३४१ चं फिक्स व्याज, गॅरंटीसह मिळणार परतावा
10
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
11
Video : हवेत टक्कर अन् काही सेकंदात जमिनीवर कोसळले हेलिकॉप्टर! अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
12
चांदी जैसा रंग है तेरा...! 'ही' छैल छबेली चांदी फक्त भाव खात चालली आहे...
13
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
14
रशियन सैन्यातील १० भारतीयांचा युद्धात मृत्यू; भावाचा शोध घेणाऱ्या तरुणाचा खळबळजनक दावा
15
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
16
१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
17
एआयच्या निमित्ताने अदानींसोबतच पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर; शरद पवार यांचे अदानींकडून कौतुक
18
मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग
19
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
20
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
Daily Top 2Weekly Top 5

शिवसैनिक रामदास कदम यांना भेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:02 IST

शिवसेना जिल्हा प्रमुख पदाचा वाद चव्हाट्यावर येण्यापूर्वी तालुका प्रमुखाच्या नियुक्तीवरुन तालुक्यातील

 शिवसेनेतील दुही : कळंब तालुक्यात नवख्यांना संधीने नाराजीचा सूर गजानन अक्कलवार । लोकमत न्यूज नेटवर्क कळंब : शिवसेना जिल्हा प्रमुख पदाचा वाद चव्हाट्यावर येण्यापूर्वी तालुका प्रमुखाच्या नियुक्तीवरुन तालुक्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला. दुसऱ्या पक्षातून येणाऱ्या एका कार्यकर्त्याला थेट तालुका प्रमुख म्हणून नियुक्ती दिली जाणार होती. जिल्हा प्रमुख नियुक्तीला स्थगनादेशामुळे तालुका प्रमुखाची नियुक्तीही रखडली. मात्र बाहेरून येणाऱ्यांना पदे देण्याचा विषय शिवसैनिक ना.रामदास कदम यांच्याकडे मांडणार आहेत. दुसऱ्या पक्षातून येणाऱ्या चांगल्या लोकांचे स्वागत झाले पाहिजे. पक्ष वाढीसाठी इनकमींगला कोणाचाही विरोध नाही. परंतु नव्याने आलेल्यांना मोक्याची पदे दिल्यास वर्षानुवर्षापासून सतरंज्या उचलणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. नवीन लोकांना त्यांच्या परफॉमर्सच्या आधारावर पदांचे वाटप व्हावे, अशी मागणी जुन्या पदाधिकाऱ्यांची आहे. अन्यथा सामूहिक राजीनाम्याचे अस्त्रही उपसले जाणार आहे. यासंबंधीची माहिती त्यांनी राज्यमंत्री संजय राठोड, भावना गवळी व जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांच्या कानावरही टाकली आहे. दरम्यान, जिल्हा प्रमुख निवडीचा तिढा सोडविण्यासाठी लवकरच पर्यावरण मंत्री रामदास कदम जिल्ह्यात येत आहे. या भेटीत कळंब तालुक्यातील सर्वच पदाधिकारी ना.कदम यांची भेट घेणार आहे. दिगांबर मस्के यांच्याकडे तालुका प्रमुखाची जबाबदारी आहे. ते कळंबचे नगराध्यक्ष आहे. एक व्यक्ती एक पद या न्यायाने त्यांचे तालुका प्रमुख पद काढण्यात येणार आहे. त्यांच्या जागेवर जुन्याच लोकांचाच विचार व्हावा, अशी मागणी रामदास कदम यांच्याकडे केली जाणार आहे. ‘भाऊ की ताईचा’ साठी चाचपणी भाऊ की ताईचा यासाठी नगरसेवक ते सर्व पदाधिकाऱ्यांची चाचपणीही केली गेली. परंतु आम्ही केवळ शिवसेनाप्रमुखांचे, असे मत अनेक शिवसैनिकांनी व्यक्त केले. कोण पदाधिकारी कोणाचा यासाठी पहिल्यादा फोनवरुन व नंतर प्रत्यक्ष बोलावून मते जाणून घेण्यात आली. स्वाक्षरी मोहिमेत सहभागी करून घेण्याचाही प्रयत्न झाला. पण उघडपणे कोणीही कोणाची बाजू घ्यायला तयार झाले नाही. महसूल राज्यमंत्री संजय राठोड आणि खासदार भावना गवळी यांच्या वर्चस्वाच्या लढाईपासून कळंब तालुक्यातील कट्टर शिवसैनिकांनी अलीप्तवादी धोरण स्वीकारले आहे. अशास्थितीत अनेकांनी बाळासाहेबांप्रती श्रध्दा व्यक्त करीत या वादातून तर सुटका करुन घेतली नाही ना, असाही काहींचा सूर आहे.