शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

शिवसैनिक रामदास कदम यांना भेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:02 IST

शिवसेना जिल्हा प्रमुख पदाचा वाद चव्हाट्यावर येण्यापूर्वी तालुका प्रमुखाच्या नियुक्तीवरुन तालुक्यातील

 शिवसेनेतील दुही : कळंब तालुक्यात नवख्यांना संधीने नाराजीचा सूर गजानन अक्कलवार । लोकमत न्यूज नेटवर्क कळंब : शिवसेना जिल्हा प्रमुख पदाचा वाद चव्हाट्यावर येण्यापूर्वी तालुका प्रमुखाच्या नियुक्तीवरुन तालुक्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला. दुसऱ्या पक्षातून येणाऱ्या एका कार्यकर्त्याला थेट तालुका प्रमुख म्हणून नियुक्ती दिली जाणार होती. जिल्हा प्रमुख नियुक्तीला स्थगनादेशामुळे तालुका प्रमुखाची नियुक्तीही रखडली. मात्र बाहेरून येणाऱ्यांना पदे देण्याचा विषय शिवसैनिक ना.रामदास कदम यांच्याकडे मांडणार आहेत. दुसऱ्या पक्षातून येणाऱ्या चांगल्या लोकांचे स्वागत झाले पाहिजे. पक्ष वाढीसाठी इनकमींगला कोणाचाही विरोध नाही. परंतु नव्याने आलेल्यांना मोक्याची पदे दिल्यास वर्षानुवर्षापासून सतरंज्या उचलणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. नवीन लोकांना त्यांच्या परफॉमर्सच्या आधारावर पदांचे वाटप व्हावे, अशी मागणी जुन्या पदाधिकाऱ्यांची आहे. अन्यथा सामूहिक राजीनाम्याचे अस्त्रही उपसले जाणार आहे. यासंबंधीची माहिती त्यांनी राज्यमंत्री संजय राठोड, भावना गवळी व जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांच्या कानावरही टाकली आहे. दरम्यान, जिल्हा प्रमुख निवडीचा तिढा सोडविण्यासाठी लवकरच पर्यावरण मंत्री रामदास कदम जिल्ह्यात येत आहे. या भेटीत कळंब तालुक्यातील सर्वच पदाधिकारी ना.कदम यांची भेट घेणार आहे. दिगांबर मस्के यांच्याकडे तालुका प्रमुखाची जबाबदारी आहे. ते कळंबचे नगराध्यक्ष आहे. एक व्यक्ती एक पद या न्यायाने त्यांचे तालुका प्रमुख पद काढण्यात येणार आहे. त्यांच्या जागेवर जुन्याच लोकांचाच विचार व्हावा, अशी मागणी रामदास कदम यांच्याकडे केली जाणार आहे. ‘भाऊ की ताईचा’ साठी चाचपणी भाऊ की ताईचा यासाठी नगरसेवक ते सर्व पदाधिकाऱ्यांची चाचपणीही केली गेली. परंतु आम्ही केवळ शिवसेनाप्रमुखांचे, असे मत अनेक शिवसैनिकांनी व्यक्त केले. कोण पदाधिकारी कोणाचा यासाठी पहिल्यादा फोनवरुन व नंतर प्रत्यक्ष बोलावून मते जाणून घेण्यात आली. स्वाक्षरी मोहिमेत सहभागी करून घेण्याचाही प्रयत्न झाला. पण उघडपणे कोणीही कोणाची बाजू घ्यायला तयार झाले नाही. महसूल राज्यमंत्री संजय राठोड आणि खासदार भावना गवळी यांच्या वर्चस्वाच्या लढाईपासून कळंब तालुक्यातील कट्टर शिवसैनिकांनी अलीप्तवादी धोरण स्वीकारले आहे. अशास्थितीत अनेकांनी बाळासाहेबांप्रती श्रध्दा व्यक्त करीत या वादातून तर सुटका करुन घेतली नाही ना, असाही काहींचा सूर आहे.