शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या आश्वासनांची पूर्तता करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 05:00 IST

राज्यात प्रामुख्याने शेतकऱ्यासंदर्भात ज्या घोषणा केल्या, त्या किमान जाहीर केल्याप्रमाणे पूर्ण कराव्या, अशी मागणी करण्यात आली आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून त्यांना हेक्टरी २५ हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी, दोन लाखापर्यंत जाहीर केलेली कर्जमाफी त्वरित द्यावी,

ठळक मुद्देभाजपची पत्रपरिषद : उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून चांगल्या लोककल्याणकारी योजनांना स्थगीती दिली आहे. हे शासन केवळ पोकळ आश्वासन देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करित आहे, असा आरोप भाजपने घेतलेल्या पत्रकार परिषदेतून आमदारांनी केला. तत्पूर्वी विविध मागण्यांचे निवेदन एसडीओंमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.राज्यात प्रामुख्याने शेतकऱ्यासंदर्भात ज्या घोषणा केल्या, त्या किमान जाहीर केल्याप्रमाणे पूर्ण कराव्या, अशी मागणी करण्यात आली आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून त्यांना हेक्टरी २५ हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी, दोन लाखापर्यंत जाहीर केलेली कर्जमाफी त्वरित द्यावी, अवकाळी पावसामुळे तूर, कापूस व इतर पिकांचे नुकसान झाले असून नुकसान भरपाई देण्यात यावी, पांदण रस्त्याची कामे करण्यात यावी, नगरविकास विभाग आणि जिल्हा परिषदमध्ये बंद झालेल्या सर्व विकासाच्या योजना सुरू कराव्या, ज्या विकासकामांना सरकारने स्थगीती दिली आहे, ती त्वरित उठविण्यात यावी, उन्हाळ्याच्या दृष्टीने ग्रामीण राष्ट्रीय पेयजल योजना त्वरित सुरू करावी, अशी मागणी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, जिल्हा सरचिटणीस दिनकर पावडे, जिल्हा उपाध्यक्ष विजय पिदुरकर, सभापती संजय पिंपळशेंडे, माजी शहराध्यक्ष रवी बेलुरकर, शंकर लालसरे, अनिल पोटे, तालुकाध्यक्ष गजानन विधाते, शहराध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, ज्ञानेश्वर चिकटे, सतिश नाकले आदींनी केली.

टॅग्स :Socialसामाजिक