शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
3
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
4
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
5
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
6
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
7
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
8
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
9
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
10
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
12
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
13
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
14
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
15
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
16
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
17
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
18
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
19
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
20
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक

शेतकऱ्यांच्या आश्वासनांची पूर्तता करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 05:00 IST

राज्यात प्रामुख्याने शेतकऱ्यासंदर्भात ज्या घोषणा केल्या, त्या किमान जाहीर केल्याप्रमाणे पूर्ण कराव्या, अशी मागणी करण्यात आली आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून त्यांना हेक्टरी २५ हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी, दोन लाखापर्यंत जाहीर केलेली कर्जमाफी त्वरित द्यावी,

ठळक मुद्देभाजपची पत्रपरिषद : उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून चांगल्या लोककल्याणकारी योजनांना स्थगीती दिली आहे. हे शासन केवळ पोकळ आश्वासन देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करित आहे, असा आरोप भाजपने घेतलेल्या पत्रकार परिषदेतून आमदारांनी केला. तत्पूर्वी विविध मागण्यांचे निवेदन एसडीओंमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.राज्यात प्रामुख्याने शेतकऱ्यासंदर्भात ज्या घोषणा केल्या, त्या किमान जाहीर केल्याप्रमाणे पूर्ण कराव्या, अशी मागणी करण्यात आली आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून त्यांना हेक्टरी २५ हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी, दोन लाखापर्यंत जाहीर केलेली कर्जमाफी त्वरित द्यावी, अवकाळी पावसामुळे तूर, कापूस व इतर पिकांचे नुकसान झाले असून नुकसान भरपाई देण्यात यावी, पांदण रस्त्याची कामे करण्यात यावी, नगरविकास विभाग आणि जिल्हा परिषदमध्ये बंद झालेल्या सर्व विकासाच्या योजना सुरू कराव्या, ज्या विकासकामांना सरकारने स्थगीती दिली आहे, ती त्वरित उठविण्यात यावी, उन्हाळ्याच्या दृष्टीने ग्रामीण राष्ट्रीय पेयजल योजना त्वरित सुरू करावी, अशी मागणी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, जिल्हा सरचिटणीस दिनकर पावडे, जिल्हा उपाध्यक्ष विजय पिदुरकर, सभापती संजय पिंपळशेंडे, माजी शहराध्यक्ष रवी बेलुरकर, शंकर लालसरे, अनिल पोटे, तालुकाध्यक्ष गजानन विधाते, शहराध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, ज्ञानेश्वर चिकटे, सतिश नाकले आदींनी केली.

टॅग्स :Socialसामाजिक