शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
4
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
5
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
6
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
7
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
8
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
9
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
10
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
11
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
12
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
13
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
14
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
15
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
16
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
17
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
19
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
20
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

घनकचरा, पाणी टंचाईवर उपाययोजना

By admin | Updated: April 1, 2015 02:10 IST

शहरातील घनकचरा व पाणी टंचाईची समस्या लक्षात घेऊन नगरपरिषदेने उपायोजना सुरू केल्या.

वणी : शहरातील घनकचरा व पाणी टंचाईची समस्या लक्षात घेऊन नगरपरिषदेने उपायोजना सुरू केल्या.उन्हाळ्यात दरवर्षी पाण्याची टंचाई जाणवते. चार वर्षांपूर्वी तर येथे भीषण दुष्काळात नागरिक पोळले होते. ही समस्या लक्षात घेऊन नगरपरिषदेने तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाच ट्युबवेलचा प्रस्ताव पाठविला होता. त्यातील दोन ट्युबवेल नामंजूर झाल्या, तर तीन मंजूर झाल्या आहेत. सोमवारी वामनघाट येथे या ट्युबवेल खोदण्याचे काम सुरू झाले. जॅकवेल परिसरात दोन व गणेशपूर घाटावर एक, अशा तीन नवीन ट्युबवेलला आता सुरूवात झाली आहे. शहराची जीवनदायीनी असलेली निर्गुडा नदी पूर्णत: आटली. त्यामुळे आत्तापर्यंत तिनदा नवरगाव धरणाचे पाणी नदीत सोडण्यात आले. आरक्षित पाणी व नवरगाव धरणाच्या पाण्याचा साठा बघता, हे पाणी फार काळ पुरणार नसल्याने वणीकरांची तहान भागविण्यासाठी नगरपरिषद विविध उपाययोजना करीत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासणार नाही, अशी ग्वाही नगराध्यक्ष प्रिया लभाने यांनी दिली आहे. सोबतच घनकचरा ही सर्वात मोठी समस्या आहे. त्यावर नगरपरिषदेने सन २0१0 मध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याचा संकल्प केला. मात्र काही नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे कलम ३०८ नुसार अपिल केल्याने हे काम रखडले होते. आता या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे आरोग्य सभापती धनंजय त्रिंबके, नगराध्यक्ष प्रिया लभाने, उपाध्यक्ष अशोक बुरडकर, बांधकाम सभापती इंदिरा पारखी, जलपूर्ती सभापती कीर्ती देशकर, मुख्याध्याधिकारी गोपिचंद पवार, अभियंता गायकवाड, देशमुख यांनी सोमवारी जागेची पाहणी केली. तेथे घनकचऱ्यापासून गांडूळ खताची निर्मिती व ओला-सुका कचऱ्याच्या व्यवस्थापनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. शहरातील घनकचऱ्याची समस्या सुटून नगरपरिषदेच्या तिजोरीतही रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. पाणी टंचाई व घनकचऱ्याच्या कामाला सुरूवात झाल्याने महत्वाच्या दोन समस्या सुटण्याची शक्यता बळावली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)