शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
11
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
12
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
13
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
14
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
15
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
16
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
17
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
18
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
19
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
20
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...

घनकचरा, पाणी टंचाईवर उपाययोजना

By admin | Updated: April 1, 2015 02:10 IST

शहरातील घनकचरा व पाणी टंचाईची समस्या लक्षात घेऊन नगरपरिषदेने उपायोजना सुरू केल्या.

वणी : शहरातील घनकचरा व पाणी टंचाईची समस्या लक्षात घेऊन नगरपरिषदेने उपायोजना सुरू केल्या.उन्हाळ्यात दरवर्षी पाण्याची टंचाई जाणवते. चार वर्षांपूर्वी तर येथे भीषण दुष्काळात नागरिक पोळले होते. ही समस्या लक्षात घेऊन नगरपरिषदेने तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाच ट्युबवेलचा प्रस्ताव पाठविला होता. त्यातील दोन ट्युबवेल नामंजूर झाल्या, तर तीन मंजूर झाल्या आहेत. सोमवारी वामनघाट येथे या ट्युबवेल खोदण्याचे काम सुरू झाले. जॅकवेल परिसरात दोन व गणेशपूर घाटावर एक, अशा तीन नवीन ट्युबवेलला आता सुरूवात झाली आहे. शहराची जीवनदायीनी असलेली निर्गुडा नदी पूर्णत: आटली. त्यामुळे आत्तापर्यंत तिनदा नवरगाव धरणाचे पाणी नदीत सोडण्यात आले. आरक्षित पाणी व नवरगाव धरणाच्या पाण्याचा साठा बघता, हे पाणी फार काळ पुरणार नसल्याने वणीकरांची तहान भागविण्यासाठी नगरपरिषद विविध उपाययोजना करीत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासणार नाही, अशी ग्वाही नगराध्यक्ष प्रिया लभाने यांनी दिली आहे. सोबतच घनकचरा ही सर्वात मोठी समस्या आहे. त्यावर नगरपरिषदेने सन २0१0 मध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याचा संकल्प केला. मात्र काही नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे कलम ३०८ नुसार अपिल केल्याने हे काम रखडले होते. आता या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे आरोग्य सभापती धनंजय त्रिंबके, नगराध्यक्ष प्रिया लभाने, उपाध्यक्ष अशोक बुरडकर, बांधकाम सभापती इंदिरा पारखी, जलपूर्ती सभापती कीर्ती देशकर, मुख्याध्याधिकारी गोपिचंद पवार, अभियंता गायकवाड, देशमुख यांनी सोमवारी जागेची पाहणी केली. तेथे घनकचऱ्यापासून गांडूळ खताची निर्मिती व ओला-सुका कचऱ्याच्या व्यवस्थापनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. शहरातील घनकचऱ्याची समस्या सुटून नगरपरिषदेच्या तिजोरीतही रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. पाणी टंचाई व घनकचऱ्याच्या कामाला सुरूवात झाल्याने महत्वाच्या दोन समस्या सुटण्याची शक्यता बळावली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)