शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

एमबीबीएस डॉक्टरसह पित्याची प्रतीकात्मक धिंड: आदर्श विवाहाला पाच महिन्यातच गालबोट

By सुरेंद्र राऊत | Updated: November 3, 2022 19:32 IST

मुलीकडच्यांनी आपल्या मुलीची बदनामी केली म्हणत डॉक्टर जावई व त्याच्या वडिलांच्या प्रतीकात्मक धिंड काढली.

लाडखेड (यवतमाळ) : येथील एका एमबीबीएस युवकाचा ७ मे २०२२ रोजी अकोट येथील एका उच्च शिक्षित युवतीशी विवाह झाला होता. मात्र पाच महिन्यातच त्यांच्या आदर्श विवाहाला गालबोट लागले. मुलीकडच्यांनी आपल्या मुलीची बदनामी केली म्हणत चक्क डॉक्टर जावई व त्याच्या वडिलांच्या प्रतिमेसह गावातून प्रतीकात्मक धिंड काढली. ही घटना येथे बुधवारी सायंकाळी ५ वाजता घडली. 

येथील एक युवक एमबीबीएस डॉक्टर आहे. सध्या तो युवक दारव्हा तालुक्यात एका ठिकाणी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. पाच महिन्यांपूर्वी ७ मे रोजी अकोला जिल्ह्यातील अकोट येथील एका युवतीशी त्यांचा विवाह जुळला. साक्षगंधाच्या कार्यक्रमातच आदर्श पद्धतीने दोघांचा विवाह पार पडला. या विवाहाची त्यावेळी पंचक्रोशीत आदर्श विवाह म्हणून गणना झाली. मात्र साक्षगंधातच विवाह उरकण्यात आल्याने काही नातेवाईक नाराजही झाले होते. 

पाच महिन्यांच्या संसारादरम्यान डॉक्टर पती व उच्चविद्याविभूषित पत्नीमध्ये खटके उडायला लागले. त्यानंतर युवतीने आपल्या आई-वडिलांना लाडखेड येथे बोलावून घेतले. जवळपास १५ दिवसांपूर्वी ती त्यांच्यासोबत माहेरी निघून गेली. यादरम्यान तिच्या माहेरच्यांनी डॉक्टर व त्यांच्या वडिलांना समाजाच्या बैठकीत भेटण्यासाठी बोलावले. मात्र ते आलेच नाहीत. दुसरीकडे सासरचे कुटुंब आपल्या मुलीची बदनामी करीत असल्याचा आरोप युवतीच्या कुटुंबातील सदस्यांनी केला. मुलीची समाजात बदनामी झाली असून आमचीही फसवणूक झाल्याचा संताप मुलीच्या माहेरच्यांनी व्यक्त केला.

या संतापातूनच त्यांनी जाहीर निषेध पत्रक काढले. बुधवारी हे पत्रक दारव्हा आणि लाडखेड येथे वाटण्यात आले. त्यानंतर लाडखेड येथे सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मुलीकडच्यांनी डॉक्टर जावई व त्याच्या वडिलांच्या प्रतिमेसह गावातून त्यांची प्रतीकात्मक धिंड काढली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेची पंचक्रोशीत चर्चा सुरू आहे. मात्र या प्रकरणी पोलिसात कुणीही तक्रार दाखल केली नाही. 

एका मुलीच्या बापाची आत्मकथातरुणीच्या वडिलांनी चक्क जय शिवराय असे वर लिहीत ‘एका मुलीच्या बापाची आत्मकथा’ या शीषर्काखाली पत्रक काढले. या पत्रकाचे दारव्हा आणि लाडखेड येथे वाटप केले. पत्रात त्यांनी शिवरायांच्या स्त्री संरक्षण आणि स्त्रियांचा आदर करण्याचा  उल्लेख केला. मात्र याच आपल्या शिवस्वराज्यात काही बोटांवर मोजण्याइतके षडयंत्र काही समाजकंटक स्त्रियांचा सर्रास अवमान करताना दिसत असल्याचे म्हटले. अशाच षडयंत्राला आम्हीसुद्धा बळी पडल्याचे कथन केले. सासऱ्यांनी आपल्या मुलीची बदनामी केल्याचा पत्रकातून आरोपही केला. मुलीची काहीही चूक नसताना तिला व कुटुंबाला मनस्ताप सोसावा लागत आहे. त्यामुळे खरंच मुली सुरक्षित आहेत का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Yavatmalयवतमाळdocterडॉक्टर