शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

मास्तर म्हणजे समाजाची माय

By admin | Updated: February 1, 2016 02:18 IST

लोकांच्या मनाची नाळ आपल्याला कळली पाहिजे. मास्तर म्हणजे समाजाची माय असतो. म्हणूनच शिकविण्यासोबतच शिक्षकांनी ...

बाळकृष्ण सरकटे : राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचा समारोपयवतमाळ : लोकांच्या मनाची नाळ आपल्याला कळली पाहिजे. मास्तर म्हणजे समाजाची माय असतो. म्हणूनच शिकविण्यासोबतच शिक्षकांनी समाजाच्या व खास करून शेतकऱ्यांचे सुख-दु:ख समजून घेतले पाहिजे. त्यांच्या आयुष्यात परिवर्तनासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन डॉ. बाळकृष्ण सरकटे यांनी केले.जगद्गुरू तुकोबाराय साहित्यनगरीत (नेहरू स्टेडियम) आयोजित राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या समारोपीय सत्रात ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते. यावेळी शिक्षक साहित्य संघाचे संस्थापक अध्यक्ष जयदीप सोनखासकर, विनय मिरासे, जिल्हाध्यक्ष किशोर तळोकर, ताराचंद कंठाळे, अशोक राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ. बाळकृष्ण सरकटे म्हणाले की, महात्मा फुले यांनी सामूहिक शेतीची कल्पना मांडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतीच्या राष्ट्रीयीकरणाची मागणी केली होती. डॉ. पंजाबराव देशमुख यांनीही शेतीसुधारणेसाठी खूप प्रयत्न केले. मात्र, या महापुरुषांच्या शेतीविषयक विचारांचा शासनाने विचार केला नाही. त्यामुळेच आज शेतीची अवस्था वाईट झाली आहे. विपन्नावस्थेतील शेतकऱ्यांविषयी आज समाजात विकृत पद्धतीने बोलले जात आहे. पोरीच्या लग्नात अनाठायी खर्च केला, दारू पिण्याचे व्यसन आहे, म्हणूनच शेतकरी हलाखीत पोहोचले आहे, असे बोलले जाते. मात्र, ते खरे नाही. समाजातील ही चुकीची मानसिकता निट करण्याचे काम आपल्यालाच करायचे आहे. कारण आपण शिक्षक समाजाची माय आहोत. जो दुसऱ्यासाठी जगतो, तो कधीच मरत नाही. अन् जो स्वत:पुरताच जगतो, तो मेलेलाच असतो.शिक्षक साहित्य संघाचे अध्यक्ष जयदीप सोनखासकर म्हणाले की, शिक्षकांनी अधिकाऱ्यांच्या समोर-समोर फिरू नये. तर अधिकाऱ्यांनाच आपल्या मंचावर बोलवावे आणि आपले उत्तम काम पाहण्यासाठी त्यांना भाग पाडावे. आता सॅकद्वारे आपल्या शाळांचे मूल्यांकन होणार आहे. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांकडे उत्तम लक्ष पुरवून शाळा टिकविण्याचे आव्हानही आपल्याला पेलावे लागेल. पुढचे साहित्य संमेलनही विदर्भातच व्हावे. कारंजा, दर्यापूर, नागपूर येथून संमेलनासाठी प्रस्ताव आले आहेत. यापैकीच एका ठिकाणी पाचवे संमेलन होईल.पुणे येथील हरीश बुटले यांनी लिहिलेल्या ‘पालक’ या पुस्तकाचे यवतमाळात प्रकाशन करण्यात आले. यावेळी संमेलनासाठी सहकार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात मिलिंद इंगळे, महादेव निमकर, बन्सी कोठेकर, सुरेश चिमणकर, मोहम्मदभाई नूर, स्वप्नील वानखडे, अशोक राऊत, ताराचंद कंठाळे, किशोर तळोकार, प्रा. नंदकिशोर इंगळे, वैशाली गावंडे, विनय मिरासे, केतकर, वडतकर, मादेशवार, कुंभारे या शिक्षक-शिक्षिकांचा समावेश होता. शिवाय संमेलनात राबणाऱ्या स्वयंसेवकांचाही सत्कार करण्यात आला.दरम्यान, संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी कथाकथन कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांनी हजेरी लावली. खुल्या कविसंमेलनात विनय मिरासे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक कवींनी जवळपास तीन तास कवितांचा पाऊस पाडला. सुरेश गांजरे यांच्या सूत्रसंचालनाने रंगत वाढविली. (स्थानिक प्रतिनिधी)