शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमावर्ती राज्यांमध्ये उद्या होणारा मॉक ड्रिल पुढे ढकलला; 'ऑपरेशन शील्ड'ची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार
2
पुण्यात झाड कोसळून १ ठार; कोल्हापुरात जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी भूस्खलनाच्या घटना
3
एक वर्षानंतर 'कोविड पॉझिटिव्हिटी दर जास्त, NB.1.8.1 व्हेरिएंट वाढले'; WHO ने दिला इशारा
4
शस्त्र परवान्यासाठी गोळीबाराचा बनाव; शिंदे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांना अटक
5
Vaishnavi Hagawane Death Case :'आमचा आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास'; हगवणेंच्या वकिलांच्या युक्तीवादावर वैष्णवीच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया
6
हगवणे बंधूंनी नीलेश चव्हाणच्या मदतीने केला आई, बहिणीचा मोबाईल लंपास; पोलिसांची कोर्टात माहिती
7
Rohit Sharma Gautam Gambhir, IND vs ENG: खुद्द रोहित शर्माने इंग्लंड दौऱ्यासाठी 'या' व्यक्तीबद्दल गौतम गंभीरकडे केली विनंती
8
सेबीच्या माजी अध्यक्षा माधबी पुरी बुच यांची हिंडेनबर्ग रिपोर्टच्या आरोपातून सुटका! लोकपालांनी दिली क्लीनचिट
9
आमच्याकडे ५ कोटींच्या गाड्या; आम्ही ४० लाखांच्या फॉर्च्युनरसाठी कशाला छळ करु - हगवणेंचे वकील
10
पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यास झालेल्या विलंबाची चौकशी व्हावी; महिला आयोगाचे मुख्यमंत्र्यांना पत्र
11
पाकिस्तानातील हिंदू क्रिकेटपटूचे दोन्ही पाय कापून टाकले, कारण ऐकून तुम्हालाही वाटेल वाईट
12
टॅरिफ आवश्यक, अन्यथा भारत-पाकिस्तान युद्धविराम भंग होऊ शकतो; ट्रम्प सरकारचा अमेरिकन न्यायालयात दावा
13
वैष्णवीचे एका व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते, म्हणून तिने...' हगवणेंच्या वकिलांचा अजब युक्तिवाद
14
ड्रोन हल्ल्यांपासून वाचण्याचे मार्ग, ऑपरेशन शील्ड' अंतर्गत उद्या या ४ राज्यांमध्ये मॉक ड्रिल होणार
15
आकडे बोलतात! 'लोकमत डॉट कॉम'ला दणदणीत 'बहुमत'; वाचकांचा विश्वास जिंकला, मराठी न्यूज वेबसाईट्समध्ये 'नंबर पहिला'
16
माजी मंत्र्याचा सचिव, पाकिस्तानला पुरवत होता गुप्त माहिती! जैसलमेरमधून पकडला गेला आणखी एक गद्दार
17
इलॉन मस्क यांना नकार देणे 'अ‍ॅपल'ला महागात पडले; आयफोन वापरकर्त्यांना ही खास सेवा मिळत नाही
18
'मला रात्री घराबाहेर काढलं', परिणय फुकेंवर प्रिया फुकेंचे आरोप; सुषमा अंधारेंनी CM फडणवीसांना केली विनंती
19
बेडरूममध्ये बसली होती सवत, बघताच पहिल्या पत्नीला संताप झाला अनावर! पुढे पतीने जे केले, ते वाचून व्हाल हैराण
20
सर्वात मोठा खुलासा; पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड...

मास्तर म्हणजे समाजाची माय

By admin | Updated: February 1, 2016 02:18 IST

लोकांच्या मनाची नाळ आपल्याला कळली पाहिजे. मास्तर म्हणजे समाजाची माय असतो. म्हणूनच शिकविण्यासोबतच शिक्षकांनी ...

बाळकृष्ण सरकटे : राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचा समारोपयवतमाळ : लोकांच्या मनाची नाळ आपल्याला कळली पाहिजे. मास्तर म्हणजे समाजाची माय असतो. म्हणूनच शिकविण्यासोबतच शिक्षकांनी समाजाच्या व खास करून शेतकऱ्यांचे सुख-दु:ख समजून घेतले पाहिजे. त्यांच्या आयुष्यात परिवर्तनासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन डॉ. बाळकृष्ण सरकटे यांनी केले.जगद्गुरू तुकोबाराय साहित्यनगरीत (नेहरू स्टेडियम) आयोजित राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या समारोपीय सत्रात ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते. यावेळी शिक्षक साहित्य संघाचे संस्थापक अध्यक्ष जयदीप सोनखासकर, विनय मिरासे, जिल्हाध्यक्ष किशोर तळोकर, ताराचंद कंठाळे, अशोक राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ. बाळकृष्ण सरकटे म्हणाले की, महात्मा फुले यांनी सामूहिक शेतीची कल्पना मांडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतीच्या राष्ट्रीयीकरणाची मागणी केली होती. डॉ. पंजाबराव देशमुख यांनीही शेतीसुधारणेसाठी खूप प्रयत्न केले. मात्र, या महापुरुषांच्या शेतीविषयक विचारांचा शासनाने विचार केला नाही. त्यामुळेच आज शेतीची अवस्था वाईट झाली आहे. विपन्नावस्थेतील शेतकऱ्यांविषयी आज समाजात विकृत पद्धतीने बोलले जात आहे. पोरीच्या लग्नात अनाठायी खर्च केला, दारू पिण्याचे व्यसन आहे, म्हणूनच शेतकरी हलाखीत पोहोचले आहे, असे बोलले जाते. मात्र, ते खरे नाही. समाजातील ही चुकीची मानसिकता निट करण्याचे काम आपल्यालाच करायचे आहे. कारण आपण शिक्षक समाजाची माय आहोत. जो दुसऱ्यासाठी जगतो, तो कधीच मरत नाही. अन् जो स्वत:पुरताच जगतो, तो मेलेलाच असतो.शिक्षक साहित्य संघाचे अध्यक्ष जयदीप सोनखासकर म्हणाले की, शिक्षकांनी अधिकाऱ्यांच्या समोर-समोर फिरू नये. तर अधिकाऱ्यांनाच आपल्या मंचावर बोलवावे आणि आपले उत्तम काम पाहण्यासाठी त्यांना भाग पाडावे. आता सॅकद्वारे आपल्या शाळांचे मूल्यांकन होणार आहे. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांकडे उत्तम लक्ष पुरवून शाळा टिकविण्याचे आव्हानही आपल्याला पेलावे लागेल. पुढचे साहित्य संमेलनही विदर्भातच व्हावे. कारंजा, दर्यापूर, नागपूर येथून संमेलनासाठी प्रस्ताव आले आहेत. यापैकीच एका ठिकाणी पाचवे संमेलन होईल.पुणे येथील हरीश बुटले यांनी लिहिलेल्या ‘पालक’ या पुस्तकाचे यवतमाळात प्रकाशन करण्यात आले. यावेळी संमेलनासाठी सहकार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात मिलिंद इंगळे, महादेव निमकर, बन्सी कोठेकर, सुरेश चिमणकर, मोहम्मदभाई नूर, स्वप्नील वानखडे, अशोक राऊत, ताराचंद कंठाळे, किशोर तळोकार, प्रा. नंदकिशोर इंगळे, वैशाली गावंडे, विनय मिरासे, केतकर, वडतकर, मादेशवार, कुंभारे या शिक्षक-शिक्षिकांचा समावेश होता. शिवाय संमेलनात राबणाऱ्या स्वयंसेवकांचाही सत्कार करण्यात आला.दरम्यान, संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी कथाकथन कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांनी हजेरी लावली. खुल्या कविसंमेलनात विनय मिरासे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक कवींनी जवळपास तीन तास कवितांचा पाऊस पाडला. सुरेश गांजरे यांच्या सूत्रसंचालनाने रंगत वाढविली. (स्थानिक प्रतिनिधी)