शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

विवाहित मुलगीही अनुकंपा नोकरीस पात्र; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 10:57 IST

मृताची मुलगी विवाहित असली तरी तिचा दावा संपत नाही, वारसदार म्हणून अनुकंपा नोकरीस ती पात्र ठरते, असे स्पष्ट करीत मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे व सोलापूरच्या दोन महिलांना मोठा दिलासा दिला.

ठळक मुद्देविवाह होणारच, नाव बदलणारच

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मृताची मुलगी विवाहित असली तरी तिचा दावा संपत नाही, वारसदार म्हणून अनुकंपा नोकरीस ती पात्र ठरते, असे स्पष्ट करीत मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे व सोलापूरच्या दोन महिलांना मोठा दिलासा दिला.प्रतिभा त्र्यंबक पवार यांनी ठाणे जिल्हा परिषदेविरुद्ध तर सोनिका विठोबा काशीद यांनी सोलापूर जिल्हा परिषदेविरुद्ध अ‍ॅड. गौरव बांदिवडेकर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. विवाहित आहे, या कारणावरून दोघींनाही अनुकंपा नोकरी नाकारण्यात आली होती. दोघींचीही प्रकरणे कमी अधिक प्रमाणात सारखीच आहेत. दोन्ही प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. आर.एम. सावंत आणि के.के. सोनवणे यांच्या खंडपीठाने ४ सप्टेंबर रोजी एकाच वेळी निर्णय दिला. मृताच्या वारसदार मुलींचे लग्न झाले, त्यांचे नाव बदलले म्हणून त्या अनुकंपा नोकरीसाठी अपात्र होऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी नवीन शासन आदेश काढला असून जुने आदेश रद्द ठरविल्याची बाबही सरकारी पक्षाच्या निदर्शनास आणून दिली.दोन्ही प्रकरणात १७ नोव्हेंबर २०१६ च्या जीआरचा अवलंब करा, जुने जीआर वापरु नका, नव्या जीआरने काम मार्गी लावा, अशा सूचना न्यायालयाने दिल्या. सोनिका व प्रतिभा यांचे प्रकरण ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत निकाली काढण्याचे आदेश संबंधित जिल्हा परिषदेच्या सीईओंना देण्यात आले.विवाह होणारच, नाव बदलणारचप्रतिभा पवार या एकमेव अपत्य नाही, त्यांना चार बहिणी आहेत, आई-वडील मरण पावले आहेत. त्यांच्यावर कुटुंब अवलंबून नाही, त्या विवाहित आहेत, असे नमूद करीत त्यांना अनुकंपा नोकरी नाकारण्यात आली होती. त्यावर कुणाही मुलीचा विवाह होणारच आणि नाव बदलणारच म्हणून तुम्ही नोकरी देणार नाही काय?असा जाब न्यायालयाने विचारला.

ही तर प्रशासनाची पश्च्यात बुद्धीसोनिका काशीद या विवाहित असल्याने त्यांना अनुकंपा नोकरी मिळणार नाही, असे सांगितले गेले. त्यामुळे त्यांच्या अशिक्षित आईने मग मुलाला नोकरी द्या, असे म्हणून अर्जावर अंगठा लावला. हाच मुद्दा सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाने उच्च न्यायालयात रेटला. मात्र तुमच्यामुळे गुंता निर्माण झाल्याचा ठपका न्यायालयाने प्रशासनावर ठेवला. गुंता निर्माण करून नोकरी नाकारणे ही प्रशासनाची पश्च्यात बुद्धी आहे, असे नमूद करीत ‘काही तरी दया दाखवा’ अशा सूचना प्रशासनाला केल्या.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय