शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

हजार वऱ्हाडी रफादफा, दहा लोकांमध्येच शुभमंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 05:00 IST

हा नवरदेव होता यवतमाळचा. तर नवरी होती किन्हाळाची. कोरोनामुळे सर्वत्र गर्दी टाळली जात असताना किन्हाळा गावात मात्र हजार लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळ्याची तयारी झाली होती. त्यासाठी यवतमाळातील तीन-चार वाहनांमध्ये वºहाडी रवाना झाले. ही माहिती गावातील आशा सेविकेला कळताच तिने मेटीखेडाचे आरोग्य पर्यवेक्षक मनोज पवार यांना दिली.

ठळक मुद्देऐनवेळी परतविली गर्दी : कोरोनाच्या धास्तीने जागरुक कार्यकर्त्यांनी टाळला कळंब तालुक्यातील पेचप्रसंग

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : हिरवा मांडव पडला. त्या पलिकडे मोठा शामियानाही सजला. नवरी नटून तयार होती. नवरदेव चार ट्रॅक्स आणि एक मोठे वाहन भरुन लग्नवऱ्हाडी घेऊन पोहोचला. किमान ११०० ते १२०० जणांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा होणार होता. मात्र ऐनवेळी धडकलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी कोरोनाविषयी जनजागृती करून सर्वांचे मन वळविले आणि वऱ्हाड्यांना आपआपल्या गावाकडे परत पाठविले. केवळ दहा लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला.हा नवरदेव होता यवतमाळचा. तर नवरी होती किन्हाळाची. कोरोनामुळे सर्वत्र गर्दी टाळली जात असताना किन्हाळा गावात मात्र हजार लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळ्याची तयारी झाली होती. त्यासाठी यवतमाळातील तीन-चार वाहनांमध्ये वऱ्हाडी रवाना झाले. ही माहिती गावातील आशा सेविकेला कळताच तिने मेटीखेडाचे आरोग्य पर्यवेक्षक मनोज पवार यांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पवार यांनी संकल्प फाऊंडेशनचे यवतमाळातील पूर्वज गलांडे, आकाश भारती, तुषार गिरी व काही कार्यकर्ते सोबत घेतले आणि तडक किन्हाळा (ता.कळंब) गाव गाठले. गावाबाहेरच वऱ्हाड्यांना रोखून सर्वांना कोरोना जनजागृतीबाबत पॉम्पलेट वाटप केले. डीजे परत पाठविण्यात आला. यावेळी अनेकांनी विरोधही केला. मात्र पवार यांनी गावातील सरपंच सुदाम पवार यांच्याशी चर्चा करून सर्व वऱ्हाड्यांचे मन वळविण्यात यश मिळविले. अखेर सर्वांनी समंजसपणा दाखवित लग्नातील गर्दी टाळली. केवळ दहा लोकांच्या उपस्थितीत वधू-वरांचे शुभमंगल पार पाडण्यात आले.सध्या दिल्लीत झालेल्या मरकस कार्यक्रमातील हजारोंची उपस्थिती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गाजत आहे. किन्हाळात हजार-बाराशे मंडळींच्या हजेरीत हा लग्न सोहळा झाला असता तर जिल्ह्यात मरकस सारखीच परिस्थिती निर्माण होण्याचा धोका होता.आशा सेविकेचे प्रसंगावधान ठरले उपयुक्तअत्यल्प मानधनावर काम करणाऱ्या गावखेड्यातील आशा सेविका कोरोनाच्या प्रादूर्भावात महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. किन्हाळात होऊ घातलेल्या लग्नातील गर्दीचा धोकाही सर्वप्रथम आशा सेविकेने ओळखला. मात्र प्रसंगावधान राखून तिने आपल्या वरिष्ठांना माहिती कळवून ही गर्दी रोखली. अन्यथा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव आणखी वाढला असता. विशेष म्हणजे हजार वºहाडी गावातून परत पाठविताना प्रत्येकाला कोरोनाची माहिती देणारे पॉम्पलेट देण्यात आले. प्रत्येकाचे हात सॅनिटायझरने स्वच्छ करण्यात आले.

टॅग्स :marriageलग्न