शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

हजार वऱ्हाडी रफादफा, दहा लोकांमध्येच शुभमंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 05:00 IST

हा नवरदेव होता यवतमाळचा. तर नवरी होती किन्हाळाची. कोरोनामुळे सर्वत्र गर्दी टाळली जात असताना किन्हाळा गावात मात्र हजार लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळ्याची तयारी झाली होती. त्यासाठी यवतमाळातील तीन-चार वाहनांमध्ये वºहाडी रवाना झाले. ही माहिती गावातील आशा सेविकेला कळताच तिने मेटीखेडाचे आरोग्य पर्यवेक्षक मनोज पवार यांना दिली.

ठळक मुद्देऐनवेळी परतविली गर्दी : कोरोनाच्या धास्तीने जागरुक कार्यकर्त्यांनी टाळला कळंब तालुक्यातील पेचप्रसंग

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : हिरवा मांडव पडला. त्या पलिकडे मोठा शामियानाही सजला. नवरी नटून तयार होती. नवरदेव चार ट्रॅक्स आणि एक मोठे वाहन भरुन लग्नवऱ्हाडी घेऊन पोहोचला. किमान ११०० ते १२०० जणांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा होणार होता. मात्र ऐनवेळी धडकलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी कोरोनाविषयी जनजागृती करून सर्वांचे मन वळविले आणि वऱ्हाड्यांना आपआपल्या गावाकडे परत पाठविले. केवळ दहा लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला.हा नवरदेव होता यवतमाळचा. तर नवरी होती किन्हाळाची. कोरोनामुळे सर्वत्र गर्दी टाळली जात असताना किन्हाळा गावात मात्र हजार लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळ्याची तयारी झाली होती. त्यासाठी यवतमाळातील तीन-चार वाहनांमध्ये वऱ्हाडी रवाना झाले. ही माहिती गावातील आशा सेविकेला कळताच तिने मेटीखेडाचे आरोग्य पर्यवेक्षक मनोज पवार यांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पवार यांनी संकल्प फाऊंडेशनचे यवतमाळातील पूर्वज गलांडे, आकाश भारती, तुषार गिरी व काही कार्यकर्ते सोबत घेतले आणि तडक किन्हाळा (ता.कळंब) गाव गाठले. गावाबाहेरच वऱ्हाड्यांना रोखून सर्वांना कोरोना जनजागृतीबाबत पॉम्पलेट वाटप केले. डीजे परत पाठविण्यात आला. यावेळी अनेकांनी विरोधही केला. मात्र पवार यांनी गावातील सरपंच सुदाम पवार यांच्याशी चर्चा करून सर्व वऱ्हाड्यांचे मन वळविण्यात यश मिळविले. अखेर सर्वांनी समंजसपणा दाखवित लग्नातील गर्दी टाळली. केवळ दहा लोकांच्या उपस्थितीत वधू-वरांचे शुभमंगल पार पाडण्यात आले.सध्या दिल्लीत झालेल्या मरकस कार्यक्रमातील हजारोंची उपस्थिती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गाजत आहे. किन्हाळात हजार-बाराशे मंडळींच्या हजेरीत हा लग्न सोहळा झाला असता तर जिल्ह्यात मरकस सारखीच परिस्थिती निर्माण होण्याचा धोका होता.आशा सेविकेचे प्रसंगावधान ठरले उपयुक्तअत्यल्प मानधनावर काम करणाऱ्या गावखेड्यातील आशा सेविका कोरोनाच्या प्रादूर्भावात महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. किन्हाळात होऊ घातलेल्या लग्नातील गर्दीचा धोकाही सर्वप्रथम आशा सेविकेने ओळखला. मात्र प्रसंगावधान राखून तिने आपल्या वरिष्ठांना माहिती कळवून ही गर्दी रोखली. अन्यथा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव आणखी वाढला असता. विशेष म्हणजे हजार वºहाडी गावातून परत पाठविताना प्रत्येकाला कोरोनाची माहिती देणारे पॉम्पलेट देण्यात आले. प्रत्येकाचे हात सॅनिटायझरने स्वच्छ करण्यात आले.

टॅग्स :marriageलग्न