शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

हजार वऱ्हाडी रफादफा, दहा लोकांमध्येच शुभमंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 05:00 IST

हा नवरदेव होता यवतमाळचा. तर नवरी होती किन्हाळाची. कोरोनामुळे सर्वत्र गर्दी टाळली जात असताना किन्हाळा गावात मात्र हजार लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळ्याची तयारी झाली होती. त्यासाठी यवतमाळातील तीन-चार वाहनांमध्ये वºहाडी रवाना झाले. ही माहिती गावातील आशा सेविकेला कळताच तिने मेटीखेडाचे आरोग्य पर्यवेक्षक मनोज पवार यांना दिली.

ठळक मुद्देऐनवेळी परतविली गर्दी : कोरोनाच्या धास्तीने जागरुक कार्यकर्त्यांनी टाळला कळंब तालुक्यातील पेचप्रसंग

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : हिरवा मांडव पडला. त्या पलिकडे मोठा शामियानाही सजला. नवरी नटून तयार होती. नवरदेव चार ट्रॅक्स आणि एक मोठे वाहन भरुन लग्नवऱ्हाडी घेऊन पोहोचला. किमान ११०० ते १२०० जणांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा होणार होता. मात्र ऐनवेळी धडकलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी कोरोनाविषयी जनजागृती करून सर्वांचे मन वळविले आणि वऱ्हाड्यांना आपआपल्या गावाकडे परत पाठविले. केवळ दहा लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला.हा नवरदेव होता यवतमाळचा. तर नवरी होती किन्हाळाची. कोरोनामुळे सर्वत्र गर्दी टाळली जात असताना किन्हाळा गावात मात्र हजार लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळ्याची तयारी झाली होती. त्यासाठी यवतमाळातील तीन-चार वाहनांमध्ये वऱ्हाडी रवाना झाले. ही माहिती गावातील आशा सेविकेला कळताच तिने मेटीखेडाचे आरोग्य पर्यवेक्षक मनोज पवार यांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पवार यांनी संकल्प फाऊंडेशनचे यवतमाळातील पूर्वज गलांडे, आकाश भारती, तुषार गिरी व काही कार्यकर्ते सोबत घेतले आणि तडक किन्हाळा (ता.कळंब) गाव गाठले. गावाबाहेरच वऱ्हाड्यांना रोखून सर्वांना कोरोना जनजागृतीबाबत पॉम्पलेट वाटप केले. डीजे परत पाठविण्यात आला. यावेळी अनेकांनी विरोधही केला. मात्र पवार यांनी गावातील सरपंच सुदाम पवार यांच्याशी चर्चा करून सर्व वऱ्हाड्यांचे मन वळविण्यात यश मिळविले. अखेर सर्वांनी समंजसपणा दाखवित लग्नातील गर्दी टाळली. केवळ दहा लोकांच्या उपस्थितीत वधू-वरांचे शुभमंगल पार पाडण्यात आले.सध्या दिल्लीत झालेल्या मरकस कार्यक्रमातील हजारोंची उपस्थिती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गाजत आहे. किन्हाळात हजार-बाराशे मंडळींच्या हजेरीत हा लग्न सोहळा झाला असता तर जिल्ह्यात मरकस सारखीच परिस्थिती निर्माण होण्याचा धोका होता.आशा सेविकेचे प्रसंगावधान ठरले उपयुक्तअत्यल्प मानधनावर काम करणाऱ्या गावखेड्यातील आशा सेविका कोरोनाच्या प्रादूर्भावात महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. किन्हाळात होऊ घातलेल्या लग्नातील गर्दीचा धोकाही सर्वप्रथम आशा सेविकेने ओळखला. मात्र प्रसंगावधान राखून तिने आपल्या वरिष्ठांना माहिती कळवून ही गर्दी रोखली. अन्यथा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव आणखी वाढला असता. विशेष म्हणजे हजार वºहाडी गावातून परत पाठविताना प्रत्येकाला कोरोनाची माहिती देणारे पॉम्पलेट देण्यात आले. प्रत्येकाचे हात सॅनिटायझरने स्वच्छ करण्यात आले.

टॅग्स :marriageलग्न