शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
4
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
5
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
6
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
7
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
8
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
9
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
10
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
11
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
12
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
13
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
14
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
15
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
16
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
17
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
18
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
19
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
20
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स

‘एनसीडीएक्स’च्या दरावर ठरतात शेतमालाचे बाजारभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 13:35 IST

Yawatmal news agriculture बाजार समित्यांमध्ये दर दिवसाला १० ते १२ कोटींच्या घरात शेतमालाची उलाढाल होते. शेतमालाचे हे दर ‘एनसीडीएक्स’च्या जाहीर झालेल्या दरानुसार ठरतात. यानंतर १०:२:२ या नियमानुसार शेतमालाची खरेदी केली जाते.

ठळक मुद्देवरच्या स्तरावर खेळला जातो सट्टा बाजारदेशातील परिस्थितीवर ठरतात बाजारदर

लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : बाजार समित्यांमध्ये दर दिवसाला १० ते १२ कोटींच्या घरात शेतमालाची उलाढाल होते. शेतमालाचे हे दर ‘एनसीडीएक्स’च्या जाहीर झालेल्या दरानुसार ठरतात. यानंतर १०:२:२ या नियमानुसार शेतमालाची खरेदी केली जाते.

जिल्ह्यातील बाजार समितीचे दर ‘एनसीडीएक्स’च्या दरावर ठरतात. यानुसार प्लँटही व्यापाऱ्यांना किती शेतमाल खरेदी करायचा याच्या सूचना देते. त्यानुसार दरांचा मॅसेज व्यापाऱ्यांकडे वळता होतो. जाहीर झालेल्या दरावर शेतमालाचे दर घोषित होतात आणि हर्रास पद्धतीने शेतमालाची बोली लावली जाते.

यामध्ये बोली लावताना व्यापारी एक रुपयानुसार वाढीव दर सांगतात. सरतेशेवटी ज्या व्यापाऱ्यांनी सर्वाधिक वाढीव दर जाहीर केले, त्याला बाजारातील शेतमाल दिला जातो.

सध्या सोयाबीनचे हमी दर ३८८० आहे. खुल्या बाजारातील सोयाबीनचे दर ४२०० रुपयांपर्यंत पोहोचलेले आहे, तर डाग लागलेला आणि पावसामुळे खराब झालेला शेतमाल तीन हजार रुपयांपासून खरेदी होतो. हरभऱ्यामध्ये याच्या विरुद्ध स्थिती आहे. हरभऱ्याचे हमी दर पाच हजार रुपये क्विंटलचे आहे. खासगी व्यापाऱ्यांचे दर ४२०० रुपये आहे. ‘एनसीडीएक्स’मुळे हे दर कमी झाले आहेत. मुंबई आणि दिल्लीवरून ‘एनसीडीएक्स’ दर नियंत्रित करतात. त्यांनी जाहीर केलेल्या दरावरच खालचे दर ठरतात. कापसामध्ये खुल्या बाजारात मोठी घसरण झाली आहे. ४१ हजार रुपयांची कापूस गाठ ४० हजार ५०० पर्यंत खाली आहे, तर सरकीच्या ढेपेचे दर २३०० रुपयांवरून दोन हजारांपर्यंत खाली आले आहे. यातून कापसाचे दर ५३०० रुपयांवर आहे. यामध्ये हमी दराच्या तुलनेत ५०० रुपयांची घट आहे.

कापूस

यवतमाळ बाजार समिती सर्वात मोठी बाजार समिती आहे. याठिकाणी दरदिवसाला २०० कापूस गाड्या पणन महासंघाकडे विक्रीसाठी जात आहेत. तर १०० गाड्या खासगी व्यापाऱ्यांकडे कापूस विक्रीसाठी जात आहेत. खासगी व्यापाऱ्यांनी कापसाचे दर आधारभूत किमतीखाली ठेवले आहे. ५८२५ रुपये क्विंटलचा हमी दर आहे, तर खुल्या बाजारात ५२०० रुपये क्विंटलपर्यंत कापसाचा दर आहे.

सोयाबीन

बाजार समितीमध्ये दोन हजार क्विंटल सोयाबीनची उलाढाल होत आहे, तर खासगी बाजार समितीमध्ये दोन हजार इतकीच पोत्यांची आवक होत आहे. यवतमाळच्या बाजारपेठेत दर दिवसाला सोयाबीन खरेदीमध्ये तीन कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. याशिवाय पावसाने भिजलेले सोयाबीन हमी दराच्या खाली खरेदी होताना पाहायला मिळत आहे. या सोयाबीनला मागणी नाही.

हरभरा

यवतमाळच्या बाजारामध्ये दरदिवसाला १०० क्विंटल हरभऱ्याची आवक आहे, तर खासगी बाजार समितीमध्ये ५० क्विंटल हरभऱ्याची आवक होत आहे. दर दिवसाला १२ लाख रुपयांची उलाढाल हरभरा खरेदीमध्ये होत आहे. काही दिवसांपूर्वी हरभऱ्याचे दर साडेपाच हजार रुपये क्विंटल होते, आता या दरामध्ये घसरण झाली आहे. हे दर ४२०० रुपये क्विंटलपर्यंत खाली घसरलेले आहेत.

बाजार समित्यांमध्ये १२ वाजता ऑनलाईन पद्धतीने बाजार दर जाहीर होतात. यानंतर १२.३० वाजता बाजार सुरू होतो. कुठे काय भाव आहेत हे माहिती पडते. यानंतर जर शेतकऱ्याने कमी दर मिळाल्याची तक्रार केली तर बाजार समिती हस्तक्षेप करून शेतकऱ्याला न्याय मिळवून देते.

- रवींद्र ढोक, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, यवतमाळ

शेतमालाचे दर खर्चावर आधारित असेच जाहीर होणे अपेक्षित आहे. सध्या हमी दर जाहीर होतात ते देखील खर्चावर आधारित नाही. कारण मजुरीचे दर प्रचंड वाढले आहे. अशा स्थितीत खुल्या बाजारात मिळणारे दर फार कमी आहे. यामुळे शेती व्यवसाय घाट्यात येत आहे.

- अविनाश राऊत, शेतकरी

सध्याच्या स्थितीत शेतीचे उत्पन्न प्रचंड घटले आहे. अशा परिस्थितीत शेतमालास मिळणारे दर फार कमी आहेत. बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी नेल्यावर व्यापारी साखळी पद्धतीने दर वर चढू देत नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पाहिजे तसे पैसे पडत नाहीत.

- विजय कदम, शेतकरी

टॅग्स :agricultureशेती