शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

बाजार समित्या बंद, हमी केंद्रांचाही पत्ता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 22:45 IST

खरीप हंगामातील सोयाबीनचे पीक बाजारात येण्यास सुरूवात होताच बाजार समित्यांनी बंद पुकारला आहे. तर दुुसरीकडे शासकीय हमीकेंद्राचा अद्यापही मुहूर्त निघाला नाही. यामुळे शेतकऱ्यांनी शेतमाल विकायचा तरी कुठे, असा गंभीर पेच निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देसोयाबीन विकायचे कसे? : खेडा खरेदीतून शेतकऱ्यांची लूट

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खरीप हंगामातील सोयाबीनचे पीक बाजारात येण्यास सुरूवात होताच बाजार समित्यांनी बंद पुकारला आहे. तर दुुसरीकडे शासकीय हमीकेंद्राचा अद्यापही मुहूर्त निघाला नाही. यामुळे शेतकऱ्यांनी शेतमाल विकायचा तरी कुठे, असा गंभीर पेच निर्माण झाला आहे. या स्थितीचा फायदा घेत खासगी व्यापाºयांनी शेतकऱ्यांची लूट सुरू केली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यात सहकार विभागाच्या यंत्रणेला पूर्णत: अपयश आले आहे.केंद्र शासनाच्या वित्त विभागाने तेलबीयांवर पाच टक्के जीएसटी आकारण्याचे आदेश दिले आहेत. जीएसटी आकारताना व्यापारी आणि अडत्यांवर बंधने आली आहेत. या जीएसटीला अडते आणि व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. या विरोधात बाजार समित्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे राज्यातील बाजार समित्यांमध्ये शेतमाल खरेदी विक्रीचा व्यवहार ठप्प झाला आहे.सतत तीन वर्षापासूनच्या निसर्ग प्रकोपाने जिल्ह्यातील शेतकरी यावर्षी प्रारंभापासूनच आर्थिक अडचणीत आहे. अशा स्थितीत खरिपात सोयाबीनच्या पिकाने शेतकऱ्यांना दगा दिला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी रब्बी खेरीज पर्याय नाही. यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीला पहिली पसंती दिली आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. याचवेळी बाजार समित्यांनी बेमुदत बंद पुकारला आहे.याला पर्याय शासकीय हमी केंद्र आहेत. मात्र या ठिकाणी नोंदणी प्रक्रियाच सुरू आहे. या ठिकाणी अद्यापही खरेदीची प्रक्रियाच सुरू झाली नाही. अशा स्थितीत खासगी व्यापाऱ्यांशिवाय शेतकºयांकडे पर्याय नाही. या व्यापाऱ्यांकडे धान्य खरेदीचा परवाना नाही. यानंतरही हे व्यापारी गावामध्ये जाऊन वाट्टेल त्या दरात सोयाबीनची खरेदी करीत आहेत. सोयाबीनचे हमीदर ३३९९ रूपये आहेत. बाजार समित्यांमध्ये व्यापारी २९०० रूपये क्विंटलपर्यंत सोयाबीन खरेदी करीत होते. परवाना नसलेले व्यापारी दोन ते अडीच हजार रूपयाच सोयाबीन गिळण्याचा प्रयत्न करीत करीत आहे. यातून शेतकऱ्यांची अक्षरश: लूट सुरू आहे.यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सहकार विभागाची आहे. मात्र सहकार विभागाने अद्यापही यासंदर्भात कारवाई केली नाही. यामुळे शेतकरी नाडला जात आहे. खेडा खरेदी करणारे व्यापारी आणि परवाना नसलेले व्यापारी बिनधास्तपणे शेतकºयांची लूट करीत आहेत.