शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समित्या बंद, हमी केंद्रांचाही पत्ता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 22:45 IST

खरीप हंगामातील सोयाबीनचे पीक बाजारात येण्यास सुरूवात होताच बाजार समित्यांनी बंद पुकारला आहे. तर दुुसरीकडे शासकीय हमीकेंद्राचा अद्यापही मुहूर्त निघाला नाही. यामुळे शेतकऱ्यांनी शेतमाल विकायचा तरी कुठे, असा गंभीर पेच निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देसोयाबीन विकायचे कसे? : खेडा खरेदीतून शेतकऱ्यांची लूट

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खरीप हंगामातील सोयाबीनचे पीक बाजारात येण्यास सुरूवात होताच बाजार समित्यांनी बंद पुकारला आहे. तर दुुसरीकडे शासकीय हमीकेंद्राचा अद्यापही मुहूर्त निघाला नाही. यामुळे शेतकऱ्यांनी शेतमाल विकायचा तरी कुठे, असा गंभीर पेच निर्माण झाला आहे. या स्थितीचा फायदा घेत खासगी व्यापाºयांनी शेतकऱ्यांची लूट सुरू केली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यात सहकार विभागाच्या यंत्रणेला पूर्णत: अपयश आले आहे.केंद्र शासनाच्या वित्त विभागाने तेलबीयांवर पाच टक्के जीएसटी आकारण्याचे आदेश दिले आहेत. जीएसटी आकारताना व्यापारी आणि अडत्यांवर बंधने आली आहेत. या जीएसटीला अडते आणि व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. या विरोधात बाजार समित्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे राज्यातील बाजार समित्यांमध्ये शेतमाल खरेदी विक्रीचा व्यवहार ठप्प झाला आहे.सतत तीन वर्षापासूनच्या निसर्ग प्रकोपाने जिल्ह्यातील शेतकरी यावर्षी प्रारंभापासूनच आर्थिक अडचणीत आहे. अशा स्थितीत खरिपात सोयाबीनच्या पिकाने शेतकऱ्यांना दगा दिला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी रब्बी खेरीज पर्याय नाही. यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीला पहिली पसंती दिली आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. याचवेळी बाजार समित्यांनी बेमुदत बंद पुकारला आहे.याला पर्याय शासकीय हमी केंद्र आहेत. मात्र या ठिकाणी नोंदणी प्रक्रियाच सुरू आहे. या ठिकाणी अद्यापही खरेदीची प्रक्रियाच सुरू झाली नाही. अशा स्थितीत खासगी व्यापाऱ्यांशिवाय शेतकºयांकडे पर्याय नाही. या व्यापाऱ्यांकडे धान्य खरेदीचा परवाना नाही. यानंतरही हे व्यापारी गावामध्ये जाऊन वाट्टेल त्या दरात सोयाबीनची खरेदी करीत आहेत. सोयाबीनचे हमीदर ३३९९ रूपये आहेत. बाजार समित्यांमध्ये व्यापारी २९०० रूपये क्विंटलपर्यंत सोयाबीन खरेदी करीत होते. परवाना नसलेले व्यापारी दोन ते अडीच हजार रूपयाच सोयाबीन गिळण्याचा प्रयत्न करीत करीत आहे. यातून शेतकऱ्यांची अक्षरश: लूट सुरू आहे.यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सहकार विभागाची आहे. मात्र सहकार विभागाने अद्यापही यासंदर्भात कारवाई केली नाही. यामुळे शेतकरी नाडला जात आहे. खेडा खरेदी करणारे व्यापारी आणि परवाना नसलेले व्यापारी बिनधास्तपणे शेतकºयांची लूट करीत आहेत.