शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

मंडई बंदने शेतकऱ्यांनी फेकली रस्त्यावर भाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 05:00 IST

कोरोना रोखण्यासाठी गर्दी टाळणे हाच रामबाण उपाय आहे. तरी भाजीपाला खरेदीसाठी गर्दी उसळते. यामुळे जिल्ह्यातील आठवडी बाजार रद्द करण्यात आले. मात्र दैनंदिन भाजीपाला विक्री कायम ठेवण्यात आला. त्यानुसार शेतकरी भाजीमंडीत शेतमाल विक्रीकरिता आणत होते. साधारणत: १० ते १२ हजार नागरिक भाजीमंडीत येतात. ही गर्दी कोरोनासाठी पोषक आहे.

ठळक मुद्देलिंक तोडली : जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच रविवारचा भाजी हर्रास थांबला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गत आठवड्याला भाजी विक्रेत्यांची ३०० टन भाजी विक्रीविनाच राहिली. याचा फटका शेतकऱ्यांना बसला. यामुळे भाजीमंडी विक्रेता संघटनेने रविवारी शेतमालाचा हर्रास न करण्याचा निर्णय घेतला. यातून १२ हजार ग्राहकांची साखळी तुटली. शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीसाठी रस्त्यावर बसावे लागले.कोरोना रोखण्यासाठी गर्दी टाळणे हाच रामबाण उपाय आहे. तरी भाजीपाला खरेदीसाठी गर्दी उसळते. यामुळे जिल्ह्यातील आठवडी बाजार रद्द करण्यात आले. मात्र दैनंदिन भाजीपाला विक्री कायम ठेवण्यात आला. त्यानुसार शेतकरी भाजीमंडीत शेतमाल विक्रीकरिता आणत होते. साधारणत: १० ते १२ हजार नागरिक भाजीमंडीत येतात. ही गर्दी कोरोनासाठी पोषक आहे. यामुळे पोलीस प्रशासनाने २९ मार्चला भाजीमंडीत नाकाबंदी केली. परिणामी ३०० टन भाजी विक्रीविना सडली.अशा स्वरूपाचे नुकसान पुन्हा होऊ नये म्हणून भाजीमंडी विक्रेत्यांनी रविवारी भाजीविक्रीच न करण्याचा निर्णय घेतला. यामुळे ५ एप्रिलला या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. अनेक शेतकºयांना याची कल्पणा नव्हती. त्यांनी आपला शेतमाल विक्रीसाठी मंडीत आणला. विक्री न झाल्याने रस्त्याच्या कडेला तो विकला. या ठिकाणी नागरिकांनी पुन्हा गर्दी केली. यामुळे पोलिसांच्या रोषालाही सामोरे जावे लागले.भाजी विक्री सुरळीत पार पाडावी याकरिता प्रत्येक प्रभागात विक्रेत्यांचे नियोजन करण्यात आले आहे. असे असले तरी नियोजित प्रभागात जाण्यासाठी विक्रेते तयार नाही. ज्या भागात सर्वाधिक भाजी विकली जाते, अशा ठिकाणी घोळका केला जातो. यामुळे पोलीस प्रशासनानेही अशा विक्रेत्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. पोलिसांच्या कारवाईविरोधात विक्रेतेही प्रचंड रोष व्यक्त करीत आहेत.अपुरे व्यापारी आणि जादा भाजीपाला४८० व्यापाऱ्यांनी भाजी विक्रेते म्हणून नोंद केली. त्यातील अनेक विक्रेते डमी आहे. गत आठ दिवसात यातील मोजकेच विक्रेते भाजी खरेदीसाठी आले आहे. यामुळे इतर विक्रेते गेले कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मर्यादित भाजी आणायची तर इतर प्लॉटमधील भाजीचे करायचे काय, असा पेच भाजीपाला उत्पादकांना सतावत आहे.ठोक आणि चिल्लर दरातील तफावत वाढलीभाजीपाला खरेदी करणारे व्यापारी मोजकेच आहेत. भाजीची मागणी जास्त आहेत. यामुळे मोजकेच विक्रेते तुटवडा भासवत जादा दरात भाजीची विक्री करीत आहे. मुळात शेतकºयांकडून कमी दरातच भाजीची खरेदी झाली आहे.मोठ्या प्रमाणात विक्रेत्यांना भाजीची परवानगी दिली तर हा गोंधळ संपेल. भाजी विक्रीची परवानगी देताना भाजीमंडी संघटनेतील पदाधिकाऱ्यांना विचारणा केली तर हा विक्रेता आहे की नाही, असा प्रश्नही राहणार नाही.- गजानन बरे,अध्यक्ष, भाजी विक्रेता संघटना

टॅग्स :Marketबाजारvegetableभाज्या