शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

मंडई बंदने शेतकऱ्यांनी फेकली रस्त्यावर भाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 05:00 IST

कोरोना रोखण्यासाठी गर्दी टाळणे हाच रामबाण उपाय आहे. तरी भाजीपाला खरेदीसाठी गर्दी उसळते. यामुळे जिल्ह्यातील आठवडी बाजार रद्द करण्यात आले. मात्र दैनंदिन भाजीपाला विक्री कायम ठेवण्यात आला. त्यानुसार शेतकरी भाजीमंडीत शेतमाल विक्रीकरिता आणत होते. साधारणत: १० ते १२ हजार नागरिक भाजीमंडीत येतात. ही गर्दी कोरोनासाठी पोषक आहे.

ठळक मुद्देलिंक तोडली : जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच रविवारचा भाजी हर्रास थांबला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गत आठवड्याला भाजी विक्रेत्यांची ३०० टन भाजी विक्रीविनाच राहिली. याचा फटका शेतकऱ्यांना बसला. यामुळे भाजीमंडी विक्रेता संघटनेने रविवारी शेतमालाचा हर्रास न करण्याचा निर्णय घेतला. यातून १२ हजार ग्राहकांची साखळी तुटली. शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीसाठी रस्त्यावर बसावे लागले.कोरोना रोखण्यासाठी गर्दी टाळणे हाच रामबाण उपाय आहे. तरी भाजीपाला खरेदीसाठी गर्दी उसळते. यामुळे जिल्ह्यातील आठवडी बाजार रद्द करण्यात आले. मात्र दैनंदिन भाजीपाला विक्री कायम ठेवण्यात आला. त्यानुसार शेतकरी भाजीमंडीत शेतमाल विक्रीकरिता आणत होते. साधारणत: १० ते १२ हजार नागरिक भाजीमंडीत येतात. ही गर्दी कोरोनासाठी पोषक आहे. यामुळे पोलीस प्रशासनाने २९ मार्चला भाजीमंडीत नाकाबंदी केली. परिणामी ३०० टन भाजी विक्रीविना सडली.अशा स्वरूपाचे नुकसान पुन्हा होऊ नये म्हणून भाजीमंडी विक्रेत्यांनी रविवारी भाजीविक्रीच न करण्याचा निर्णय घेतला. यामुळे ५ एप्रिलला या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. अनेक शेतकºयांना याची कल्पणा नव्हती. त्यांनी आपला शेतमाल विक्रीसाठी मंडीत आणला. विक्री न झाल्याने रस्त्याच्या कडेला तो विकला. या ठिकाणी नागरिकांनी पुन्हा गर्दी केली. यामुळे पोलिसांच्या रोषालाही सामोरे जावे लागले.भाजी विक्री सुरळीत पार पाडावी याकरिता प्रत्येक प्रभागात विक्रेत्यांचे नियोजन करण्यात आले आहे. असे असले तरी नियोजित प्रभागात जाण्यासाठी विक्रेते तयार नाही. ज्या भागात सर्वाधिक भाजी विकली जाते, अशा ठिकाणी घोळका केला जातो. यामुळे पोलीस प्रशासनानेही अशा विक्रेत्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. पोलिसांच्या कारवाईविरोधात विक्रेतेही प्रचंड रोष व्यक्त करीत आहेत.अपुरे व्यापारी आणि जादा भाजीपाला४८० व्यापाऱ्यांनी भाजी विक्रेते म्हणून नोंद केली. त्यातील अनेक विक्रेते डमी आहे. गत आठ दिवसात यातील मोजकेच विक्रेते भाजी खरेदीसाठी आले आहे. यामुळे इतर विक्रेते गेले कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मर्यादित भाजी आणायची तर इतर प्लॉटमधील भाजीचे करायचे काय, असा पेच भाजीपाला उत्पादकांना सतावत आहे.ठोक आणि चिल्लर दरातील तफावत वाढलीभाजीपाला खरेदी करणारे व्यापारी मोजकेच आहेत. भाजीची मागणी जास्त आहेत. यामुळे मोजकेच विक्रेते तुटवडा भासवत जादा दरात भाजीची विक्री करीत आहे. मुळात शेतकºयांकडून कमी दरातच भाजीची खरेदी झाली आहे.मोठ्या प्रमाणात विक्रेत्यांना भाजीची परवानगी दिली तर हा गोंधळ संपेल. भाजी विक्रीची परवानगी देताना भाजीमंडी संघटनेतील पदाधिकाऱ्यांना विचारणा केली तर हा विक्रेता आहे की नाही, असा प्रश्नही राहणार नाही.- गजानन बरे,अध्यक्ष, भाजी विक्रेता संघटना

टॅग्स :Marketबाजारvegetableभाज्या