शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

मारेगाव नगरपंचायतच्या सीओंना हटवा!

By admin | Updated: April 24, 2017 00:11 IST

येथील नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी हर्षाली राणे यांच्याविषयी सर्वपक्षीय सदस्यांत कमालिचा असंतोष आहे.

नगरसेवक एकवटले : समन्वय सभेत आमदारांना साकडे, बदलीची मागणीमारेगाव : येथील नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी हर्षाली राणे यांच्याविषयी सर्वपक्षीय सदस्यांत कमालिचा असंतोष आहे. शनिवारी पार पडलेल्या समन्वय समितीच्या सभेत सर्व सदस्यांनी राणे यांना धारेवर धरीत प्रश्नांचा भडीमार केला. तसेच त्यांच्या बदलीची मागणी लावून धरली. यावेळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उपविभागीय अधिकारी शिवानंद मिश्रा यांनी मुख्याधिकाऱ्यांना समज देत कामात सुधारण करण्याच्या सूचना दिल्या. येथील मुख्याधिकारी हर्षाली राणे त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे त्या अल्पावधीतच वादग्रस्त ठरल्या आहेत. दोन महिन्यापूर्वी विरोधी सदस्यांनी त्यांच्याविरुद्ध उपोषण केले होते. त्यासोबत नगरपंचायतीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत तेरवीचा कार्यक्रमही केला होता. त्यामुळे नगरपंचायत जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली होती. जिल्हा प्रशासनाने उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य करीत मुख्याधिकाऱ्यांना कामात सुधारणा करण्याचे आदेश दिले होते. परंतु हर्षाली राणे यांनी कामात सुधारणा न करता विकास कामे ठप्प केली आहे, असा सदस्यांचा आरोप आहे. शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रूपये नगरपंचायतीकडे जमा आहे. परंतु राणे यांच्या अडेलतट्टू भूमिकेने शहरात समस्यांचा डोंगर उभा झाला आहे. त्यातच विकास कामांसाठी आलेला निधी परत जाण्याची भीती आहे. त्यामुळे विरोधकांसोबतच सत्ताधाऱ्यांनी राणे यांच्यावर रोष असून राणे यांची बदली करण्याची मागणी केली आहे. शनिवारी समन्वय समितीच्या सभेमध्ये आमदारांसमोर नगरपंचायतीचा विषय निघताच विरोधकासोबतच सत्ताधारी सदस्यांनीही राणे यांच्या कामाचा पाढा वाचला. हर्षाली राणे यांना मात्र सदस्यांच्या प्रश्नाची समाधानकारक उत्तरे देता आली नाही. मी नवीन आहे, असे उत्तर त्या देत होत्या. आ. बोदकुरवार व एसडीओ मिश्रा यांनी त्यांना समज दिली. यासंदर्भात हर्षाली राणे यांच्याशी संपर्क केला असता, मी सध्या रजेवर आहे. या विषयावर मला काहीही बोलायचे नाही, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (शहर प्रतिनिधी)सीओ हर्षाली राणे एक महिन्याच्या रजेवरनगरपंचायतीचे सर्व सदस्य विरोधात गेल्याने आणि नगरपंचायतीमध्ये काम करणेही अवघड झाल्याने हर्षाली राणे ऐन उन्हाळ्यात एक महिन्याच्या रजेवर गेल्या आहेत. त्यांना मारेगाव येथे काम करायचे नसून त्या बदली करण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती मिळाली आहे. शहरात पाणी टंचाई, नाली सफाई, पथदिवे आदी कामे एक महिन्यांपासून ठप्प आहे. आता मुख्याधिकारी रजेवर गेल्याने या समस्या उग्ररूप धारण करण्याची शक्यता आहे.