शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
4
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
5
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
6
"पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
7
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
8
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
9
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
10
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
11
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
12
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
13
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
14
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
15
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
16
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
17
बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर...
18
निवृत्तीनंतर हातात येणार रग्गड पैसा! NPS चे नवीन नियम लागू; ५ वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी संपला
19
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता
20
Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जीवाची बाजी
Daily Top 2Weekly Top 5

मारेगाव नगरपंचायत निवडणुकीत स्पष्ट बहुमतासाठी लागणार कस, गटबंधन महत्त्वाचे : राजकीय हालचालींना आला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:48 IST

मारेगाव नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीने तांत्रिक, प्रशासकीय, राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या निवडणुकांवर कोरोना, ओबीसी ...

मारेगाव नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीने तांत्रिक, प्रशासकीय, राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या निवडणुकांवर कोरोना, ओबीसी आरक्षणाची टांगती तलवार आहे. यामुळे निवडणुका अपेक्षित वेळेत होणार की पुढे ढकलल्या जाणार? ही भीती सर्वांनाच सतावत आहे. २०१५ मध्ये शहरातील ग्रामपंचायत जाऊन नगरपंचायत स्थापन करण्यात आली. शहराचे १७ वाॅर्डांत विभाजन करण्यात आले. तेवढीच नगरसेवक संख्याही होती. आता यात काही बदल होईल अशी शक्यता नाही. राज्यातील नगरपंचायत निवडणुकीच्या वाॅर्ड रचनेच्या दृष्टीने मंत्रिमंडळ बैठक होत आहे. नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. शिवसेना-भाजपने अपक्ष उमेदवारांच्या मदतीने पाच वर्षे सत्ता मिळवली होती. आताही आगामी नगरपंचायत निवडणुकीत सर्वच पक्षांना बहुमताची संधी आहे. फक्त राजकीय पक्षांनी सक्षम नेतृत्व देण्याची गरज आहे. शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा चेहरा जो पक्ष या निवडणुकीत देऊ शकेल, त्या पक्षाला विजयाची संधी आहे. आज शहरात अनेक समस्या प्रलंबित आहे. नगरपंचायत प्रशासनावर पकड निर्माण करेल, अशा व्यक्तीची मतदारांना गरज आहे. जो पक्ष मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करू शकेल असा उमेदवार देईल, त्यांचा विजय पक्का मानला जात आहे. तालुक्यातील काही महत्त्वाच्या राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांना उमेदवार निवडीच्या वेळेस तारेवरची कसरत करावी लागणार आहे. अनेक इच्छुक उमेदवार तिकीट मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी करीत आहेत. उमेदवारी मिळविण्याचे हेतूने अनेकांनी पक्ष प्रवेश करून पक्षातील नेत्यांसमोर पुढे-पुढे करणे सुरू केले आहे.

बॉक्स : राजकीय पुढाऱ्यांची सावध भूमिका

या निवडणुकीचा परिणाम आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवर होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांचे पुढारी सावध भूमिका घेत आहेत. तिकीट नाकारल्याने नाराज झालेले उमेदवार पुढे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उपद्रव निर्माण करू शकतात. तसेच या निवडणुकीत जी राजकीय समीकरणे बनातील, याचा मोठा परिणाम जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवर होणार असल्याने सर्वच पक्षांचे नेते सावध भूमिका घेणार हे उघड आहे. त्यामुळे युती-आघाडी कशी होते, यावरच विजयाचे सूत्र पक्के होणार आहे.