शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा, विदर्भाच्या जलाशयाने तळ गाठले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 15:25 IST

निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका यावर्षी पश्चिम विदर्भाला बसला आहे. या ठिकाणच्या जलाशयांनी तळ गाठला आहे. तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जलाशय ‘ओव्हरफ्लो’च्या वाटेवर आहेत. यामुळे यावर्षी पश्चिम विदर्भाला दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागेल, अशी गंभीर स्थिती आहे.

ठळक मुद्देसहा लघु प्रकल्प कोरडे

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका यावर्षी पश्चिम विदर्भाला बसला आहे. या ठिकाणच्या जलाशयांनी तळ गाठला आहे. तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जलाशय ‘ओव्हरफ्लो’च्या वाटेवर आहेत. यामुळे यावर्षी पश्चिम विदर्भाला दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागेल, अशी गंभीर स्थिती आहे.ग्लोबल वार्मिंगच्या प्रकोप वाढतच आहे. यावर्षी अलनिनोचा प्रभाव नसला तरी कमी दाबाचा पट्टा तयार न झाल्याने पश्चिम विदर्भात दमदार पाऊस झाला नाही. परिणामी या ठिकाणच्या जलाशयांनी तळ गाठला आहे. भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न झाला आहे. भविष्यातील रब्बी हंगाम अडचणीत सापडण्याचा धोका आहे.हमखास पाऊस बरसणाºया यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ४७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. यवतमाळ, कळंब आणि राळेगावात केवळ २६ ते २७ टक्के पाऊस कोसळला आहे. जिल्ह्यातील जलाशयात सरासरी २० टक्के जलसाठा आहे. सहा लघु प्रकल्प कोरडे पडले आहे.अमरावती विभागातील उर्ध्व वर्धामध्ये ४८, अरूणावती २२, बेंबळा २९, पूस ४८ तर नागपूर विभागातील पेंच तोतलाडोह ११, कामठी खैरी ५३, इटियाडोह २९, सिरपूर ४, गोसीखुर्द २० आणि निम्न वर्धा प्रकल्पात २७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्पात ६५ टक्के जलसाठा झाला आहे. पूर्णा येलदरी ४, माजलगाव ६, मांजरा ३०, निम्न दुधाना ४१ टक्के भरला आहे.पश्चिम महाराष्ट्र पावसाच्या बाबतीत श्रीमंतपश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातील मुख्य जलप्रकल्पात मुबलक पाण्याचा संचय झाला आहे. काही प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’ होण्याची स्थिती आहे. पुणे विभागातील डिंभे, पानशेत, खडकवासला, पवनार, चासकमान, भामा आसखेड, निरा देवघर आणि वारणा प्रकल्पात ९९ ते १०० टक्के जलसाठा झाला आहे. उजनी प्रकल्प ७५ टक्के भरला आहे. तर नाशिक विभागातील भंडारदरा प्रकल्प १०० टक्के भरला आहे. दरणा ९८, गंगापूर ९४, मुकणे ७३, करंजवन ९८, गिरणा ५५, उर्ध्व वैतरणा ९६, मुळा ७५, निळवंडे ९५, हातनूर ५७ तर वाघूर प्रकल्पात ६४ टक्के जलसाठा आहे.ग्लोबल वार्मिंगचा हा प्रकार आहे. तापमानातील चढ-उताराने उत्तर भारतातच कमी दाबाचे क्षेत्र तयार होत राहीले. यामुळे मराठवाडा आणि विदर्भात पाऊस कोसळला नाही. याचा परिणाम उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे.- सुरेश चोपने, हवामान अभ्यासक