शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
2
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
4
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
5
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
6
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
7
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
8
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
9
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
10
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
11
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
12
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
13
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
14
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
15
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
16
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
17
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
18
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
19
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
20
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

मराठवाडा, विदर्भाच्या जलाशयाने तळ गाठले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 15:25 IST

निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका यावर्षी पश्चिम विदर्भाला बसला आहे. या ठिकाणच्या जलाशयांनी तळ गाठला आहे. तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जलाशय ‘ओव्हरफ्लो’च्या वाटेवर आहेत. यामुळे यावर्षी पश्चिम विदर्भाला दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागेल, अशी गंभीर स्थिती आहे.

ठळक मुद्देसहा लघु प्रकल्प कोरडे

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका यावर्षी पश्चिम विदर्भाला बसला आहे. या ठिकाणच्या जलाशयांनी तळ गाठला आहे. तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जलाशय ‘ओव्हरफ्लो’च्या वाटेवर आहेत. यामुळे यावर्षी पश्चिम विदर्भाला दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागेल, अशी गंभीर स्थिती आहे.ग्लोबल वार्मिंगच्या प्रकोप वाढतच आहे. यावर्षी अलनिनोचा प्रभाव नसला तरी कमी दाबाचा पट्टा तयार न झाल्याने पश्चिम विदर्भात दमदार पाऊस झाला नाही. परिणामी या ठिकाणच्या जलाशयांनी तळ गाठला आहे. भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न झाला आहे. भविष्यातील रब्बी हंगाम अडचणीत सापडण्याचा धोका आहे.हमखास पाऊस बरसणाºया यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ४७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. यवतमाळ, कळंब आणि राळेगावात केवळ २६ ते २७ टक्के पाऊस कोसळला आहे. जिल्ह्यातील जलाशयात सरासरी २० टक्के जलसाठा आहे. सहा लघु प्रकल्प कोरडे पडले आहे.अमरावती विभागातील उर्ध्व वर्धामध्ये ४८, अरूणावती २२, बेंबळा २९, पूस ४८ तर नागपूर विभागातील पेंच तोतलाडोह ११, कामठी खैरी ५३, इटियाडोह २९, सिरपूर ४, गोसीखुर्द २० आणि निम्न वर्धा प्रकल्पात २७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्पात ६५ टक्के जलसाठा झाला आहे. पूर्णा येलदरी ४, माजलगाव ६, मांजरा ३०, निम्न दुधाना ४१ टक्के भरला आहे.पश्चिम महाराष्ट्र पावसाच्या बाबतीत श्रीमंतपश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातील मुख्य जलप्रकल्पात मुबलक पाण्याचा संचय झाला आहे. काही प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’ होण्याची स्थिती आहे. पुणे विभागातील डिंभे, पानशेत, खडकवासला, पवनार, चासकमान, भामा आसखेड, निरा देवघर आणि वारणा प्रकल्पात ९९ ते १०० टक्के जलसाठा झाला आहे. उजनी प्रकल्प ७५ टक्के भरला आहे. तर नाशिक विभागातील भंडारदरा प्रकल्प १०० टक्के भरला आहे. दरणा ९८, गंगापूर ९४, मुकणे ७३, करंजवन ९८, गिरणा ५५, उर्ध्व वैतरणा ९६, मुळा ७५, निळवंडे ९५, हातनूर ५७ तर वाघूर प्रकल्पात ६४ टक्के जलसाठा आहे.ग्लोबल वार्मिंगचा हा प्रकार आहे. तापमानातील चढ-उताराने उत्तर भारतातच कमी दाबाचे क्षेत्र तयार होत राहीले. यामुळे मराठवाडा आणि विदर्भात पाऊस कोसळला नाही. याचा परिणाम उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे.- सुरेश चोपने, हवामान अभ्यासक