शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
5
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
6
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
7
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
8
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
9
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
10
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
11
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
12
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
13
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
14
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
15
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
16
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
17
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
18
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
19
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
20
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलनाचे त्रांगडे : जाता-जाताही जोशींनी फेटाळली नवी यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 20:05 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ऐन तोंडावर साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांनी राजीनामा देऊन स्वत:ची सुटका करून घेतली, तर संमेलनाला आणि संमेलनाच्या आयोजकांना मात्र वा-यावर सोडले.

यवतमाळ - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ऐन तोंडावर साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांनी राजीनामा देऊन स्वत:ची सुटका करून घेतली, तर संमेलनाला आणि संमेलनाच्या आयोजकांना मात्र वा-यावर सोडले. सुरवातीपासून एककल्ली कारभाराचा आरोप असलेल्या महामंडळ अध्यक्षांनी जाता-जाताही नव्या उद्घाटकांच्या नवांची यादी फेटाळली, हे विशेष.त्यामुळे आता संमेलनाची घटिका जवळ येऊन ठेपलेली असताना उद्घाटकाचा थांगपत्ता नाही. तर ज्यांच्या आज्ञेत राहूनच संमेलनाचे आयोजन होत आहे, ते महामंडळ अध्यक्ष राजीनामा देऊन वर्तुळाबाहेर गेले आहेत. त्यामुळे यवतमाळ येथे शुक्रवारी सुरू होणाºया अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेत उद्घाटक म्हणून ख्यातकीर्त लेखिका नयनतारा सहगल यांचा उल्लेख करण्यात आला. तत्पूर्वीच मोठा खल करून महामंडळ आणि स्थानिक अयोजकांनी मिळून त्यांना रितसर निमंत्रण धाडले होते. पण नयनतारा सहगल यांचे नियोजित लेखी भाषण पाहून महामंडळाची पाचावर धारण बसली. अन् लगेच ईमेल पाठूवन सहगल यांना ‘तुम्ही येऊ नका’ असा तुसडा निरोप देण्यात आला. या प्रकाराने अवघ्या देशातील संवेदनशीन साहित्यिकांनी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी आणि यवतमाळच्या स्थानिक आयोजकांवर टीकेची झोड उठवली. हा प्रकार सरकारच्या दबावानेच झाल्याचा आरोप करीत माजी मंत्री वसंतराव पुरके, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीचे देवानंद पवार आदींनी मुख्यमंत्र्यांनीच माफी मागण्याची मागणी रेटली. आपल्या चुकांचे निरसण करण्याऐवजी डॉ. श्रीपाद जोशी यांनी बुधवारी सकाळी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. प्रज्ञावंत उद्घाटकाचे निमंत्रण रद्द केल्याच्या बालंटातून त्यांनी स्वत:ची मान सोडवून घेतली. मात्र, जाता-जाताही शेवटचा निर्णय घेतानाही ‘मी म्हणेल तीच पूर्व दिशा’ हा प्रकार केलाच. यवतमाळच्या आयोजन समितीने सोमवारी संमेलनासाठी नवा उद्घाटक निश्चित करण्याचा प्रस्ताव जोशी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला. त्यात काही नावेही सुचविली. ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार, ख्यातनाम साहित्यिक लोकमत नागपूरचे संपादक सुरेश द्वादशीवार, कविवर्य विठ्ठल वाघ, शेगाव संस्थानचे शिवशंकरभाऊ पाटील ही नावे जोशींपुढे ठेवण्यात आली. यापैकी तुम्ही म्हणाल त्याच मान्यवराचे नाव उद्घाटक म्हणून जाहीर करू, अशी भूमिकाही मांडण्यात आली. मात्र, जोशी यांनी सोमवार-मंगळवार असे दोन दिवस त्याबाबत निर्णयच कळवला नाही. तर बुधवारी स्वत: राजीनामा देण्यापूर्वी ही सर्वच्या सर्व नावे फेटाळल्याचे महामंडळाने यवतमाळच्या आयोजकांना कळविले. त्यामुळे आयोजक चांगलेच कात्रीत सापडले आहेत. ज्यांनी संमेलनाची सारी सुत्रे सुरवातीपासून स्वत:च्याच ‘कह्यात’ ठेवली, ते महामंडळ अध्यक्षच आता नाहीत, त्यामुळे पुढला कारभार कोणाच्या ‘हुकमांवरून’ करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.  यवतमाळात पुतळा जाळलादरम्यान, साहित्य संमेलनाच्या सोहळ्याआडून महामंडळ आणि स्थानिक आयोजकांनी यवतमाळ जिल्ह्याच्या आतिथ्यशीलतेचा अवमान केला. जिल्ह्याची नाचक्की केली. या कारणावरून संभाजी ब्रिगेड व पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी यवतमाळात निषेध नोंदविला. संभाजी ब्रिगेडने जोशी आणि कोलते यांचा पुतळा जाळून संताप नोंदविला. विचारांची एकजुट झाल्यानेच श्रीपाद जोशी यांच्या अहंकाराचा पाडाव झाल्याची प्रतिक्रिया शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे देवानंद पवार यांनी नोंदविली. आज महामंडळाची बैठकसाहित्य संमेलन दोन दिवसांवर आलेले उद्घाटकाचे नाव निश्चित झालेले नाही. आयोजकांनी सुचविलेली नावे फेटाळून महामंडळ अध्यक्षांनी स्वत:ही राजीनामा दिल्याने पेच वाढला आहे. आता गुरुवारी साहित्य महामंडळाच्या पदाधिका-यांची बैठक होत आहे. त्यात महामंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार सोपविणे, तसेच संमेलनासाठी नव्या उद्घाटकाचे नाव निश्चित होणार असल्याचे संमेलनाचे कार्यवाह प्रा. घनश्याम दरणे यांनी सांगितले.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनYavatmalयवतमाळ