शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

साहित्य संमेलनाचे त्रांगडे : जाता-जाताही जोशींनी फेटाळली नवी यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 20:05 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ऐन तोंडावर साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांनी राजीनामा देऊन स्वत:ची सुटका करून घेतली, तर संमेलनाला आणि संमेलनाच्या आयोजकांना मात्र वा-यावर सोडले.

यवतमाळ - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ऐन तोंडावर साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांनी राजीनामा देऊन स्वत:ची सुटका करून घेतली, तर संमेलनाला आणि संमेलनाच्या आयोजकांना मात्र वा-यावर सोडले. सुरवातीपासून एककल्ली कारभाराचा आरोप असलेल्या महामंडळ अध्यक्षांनी जाता-जाताही नव्या उद्घाटकांच्या नवांची यादी फेटाळली, हे विशेष.त्यामुळे आता संमेलनाची घटिका जवळ येऊन ठेपलेली असताना उद्घाटकाचा थांगपत्ता नाही. तर ज्यांच्या आज्ञेत राहूनच संमेलनाचे आयोजन होत आहे, ते महामंडळ अध्यक्ष राजीनामा देऊन वर्तुळाबाहेर गेले आहेत. त्यामुळे यवतमाळ येथे शुक्रवारी सुरू होणाºया अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेत उद्घाटक म्हणून ख्यातकीर्त लेखिका नयनतारा सहगल यांचा उल्लेख करण्यात आला. तत्पूर्वीच मोठा खल करून महामंडळ आणि स्थानिक अयोजकांनी मिळून त्यांना रितसर निमंत्रण धाडले होते. पण नयनतारा सहगल यांचे नियोजित लेखी भाषण पाहून महामंडळाची पाचावर धारण बसली. अन् लगेच ईमेल पाठूवन सहगल यांना ‘तुम्ही येऊ नका’ असा तुसडा निरोप देण्यात आला. या प्रकाराने अवघ्या देशातील संवेदनशीन साहित्यिकांनी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी आणि यवतमाळच्या स्थानिक आयोजकांवर टीकेची झोड उठवली. हा प्रकार सरकारच्या दबावानेच झाल्याचा आरोप करीत माजी मंत्री वसंतराव पुरके, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीचे देवानंद पवार आदींनी मुख्यमंत्र्यांनीच माफी मागण्याची मागणी रेटली. आपल्या चुकांचे निरसण करण्याऐवजी डॉ. श्रीपाद जोशी यांनी बुधवारी सकाळी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. प्रज्ञावंत उद्घाटकाचे निमंत्रण रद्द केल्याच्या बालंटातून त्यांनी स्वत:ची मान सोडवून घेतली. मात्र, जाता-जाताही शेवटचा निर्णय घेतानाही ‘मी म्हणेल तीच पूर्व दिशा’ हा प्रकार केलाच. यवतमाळच्या आयोजन समितीने सोमवारी संमेलनासाठी नवा उद्घाटक निश्चित करण्याचा प्रस्ताव जोशी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला. त्यात काही नावेही सुचविली. ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार, ख्यातनाम साहित्यिक लोकमत नागपूरचे संपादक सुरेश द्वादशीवार, कविवर्य विठ्ठल वाघ, शेगाव संस्थानचे शिवशंकरभाऊ पाटील ही नावे जोशींपुढे ठेवण्यात आली. यापैकी तुम्ही म्हणाल त्याच मान्यवराचे नाव उद्घाटक म्हणून जाहीर करू, अशी भूमिकाही मांडण्यात आली. मात्र, जोशी यांनी सोमवार-मंगळवार असे दोन दिवस त्याबाबत निर्णयच कळवला नाही. तर बुधवारी स्वत: राजीनामा देण्यापूर्वी ही सर्वच्या सर्व नावे फेटाळल्याचे महामंडळाने यवतमाळच्या आयोजकांना कळविले. त्यामुळे आयोजक चांगलेच कात्रीत सापडले आहेत. ज्यांनी संमेलनाची सारी सुत्रे सुरवातीपासून स्वत:च्याच ‘कह्यात’ ठेवली, ते महामंडळ अध्यक्षच आता नाहीत, त्यामुळे पुढला कारभार कोणाच्या ‘हुकमांवरून’ करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.  यवतमाळात पुतळा जाळलादरम्यान, साहित्य संमेलनाच्या सोहळ्याआडून महामंडळ आणि स्थानिक आयोजकांनी यवतमाळ जिल्ह्याच्या आतिथ्यशीलतेचा अवमान केला. जिल्ह्याची नाचक्की केली. या कारणावरून संभाजी ब्रिगेड व पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी यवतमाळात निषेध नोंदविला. संभाजी ब्रिगेडने जोशी आणि कोलते यांचा पुतळा जाळून संताप नोंदविला. विचारांची एकजुट झाल्यानेच श्रीपाद जोशी यांच्या अहंकाराचा पाडाव झाल्याची प्रतिक्रिया शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे देवानंद पवार यांनी नोंदविली. आज महामंडळाची बैठकसाहित्य संमेलन दोन दिवसांवर आलेले उद्घाटकाचे नाव निश्चित झालेले नाही. आयोजकांनी सुचविलेली नावे फेटाळून महामंडळ अध्यक्षांनी स्वत:ही राजीनामा दिल्याने पेच वाढला आहे. आता गुरुवारी साहित्य महामंडळाच्या पदाधिका-यांची बैठक होत आहे. त्यात महामंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार सोपविणे, तसेच संमेलनासाठी नव्या उद्घाटकाचे नाव निश्चित होणार असल्याचे संमेलनाचे कार्यवाह प्रा. घनश्याम दरणे यांनी सांगितले.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनYavatmalयवतमाळ