शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
4
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
5
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
6
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
7
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
8
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
9
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
10
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
11
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
12
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
13
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
14
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
15
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
16
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
17
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
18
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
19
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
20
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'

झाडीपट्टी असो वा दंडार, साहित्य परंपरांना मराठी मनाने कायमच जपले; देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 6:36 PM

झाडीपट्टी नाट्य महोत्सव असो वा दंडार या आणि अशा साहित्य परंपरांना मराठी मनांनी कायम जपल्या आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केले.

ठळक मुद्दे वणी येथे विदर्भ साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ (राम शेवाळकर परिसर, वणी ) : विदर्भाची भूमी ही समृद्ध आहे. येथे अनेक गोष्टी पहायला, अनुभवायला मिळतात. झाडीपट्टी नाट्य महोत्सव असो वा दंडार या आणि अशा साहित्य परंपरांना मराठी मनांनी कायम जपल्या आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केले.विदर्भ साहित्य संघाच्यावतीने आयोजित येथील राम शेवाळकर परिसरात ६६ व्या विदर्भ साहित्य संमेलनात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष डॉ. शिरीष देशपांडे, प्रमुख पाहुणे म्हणून चित्रपट दिग्दर्शक राजदत्त, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, वणीचे आमदार तथा स्वागताध्यक्ष संजीवरेड्डी बोदकुरवार, वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, आमदार राजू तोडसाम, आशुतोष शेवाळकर, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैैसाळकर, कार्याध्यक्ष वामन तेलंग, सरचिटणीस विलास मानेकर, माजी कुलगुरू भालचंद्र चोपने, सुनील कातकडे, विजयराव देशमुख, आमंत्रक शुभदा फडणवीस, मुख्य संयोजक माधवराव सरपटवार, वणी तालुका शाखाध्यक्ष दिलीप अलोणे, नरेंद्र नगरवाला उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ऐतिहासिक आणि साहित्य भूमी असलेल्या वणी शहरात आयोजित या संमेलनाच्या उद्घाटनासाठी मला बोलावले, त्याचा मला आनंद आहे. या शहराने अनेक साहित्यरत्न दिलेत, असे सांगत प्राचार्य राम शेवाळकर, लोकनायक बापूजी अणे, वसंत आबाजी डहाके यांच्या नावांचा त्यांनी उल्लेख केला. साहित्य हे कल्पना विलास नाही. साहित्यातून वास्तवता प्रतिबिंबीत होते. समाजनिर्मितीचे कामच साहित्यातून होते, असेही ते म्हणाले. सारगर्भीत साहित्य समाजापुढे येत नाही. अलिकडे संक्रमणाची अवस्था सुरू आहे. तंत्रज्ञान विकसित होत आहे. त्यामुळे मूलभूत साहित्याचे काय होणार, अशीही भीती वाटायला लागते असे सांगून जोपर्यंत मराठी माणूस जीवंत आहे, तोपर्यंत साहित्य संपणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.यावेळी ना.हंसराज अहीर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, राजदत्त संमेलनाध्यक्ष शिरीष देशपांडे यांनीही मनोगत व्यक्त केले. ‘बहुगुणी वणी’ या विदर्भ साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.संचालन प्रा.डॉ.अभिजीत अणे यांनी तर प्रास्ताविक शुभदा फडणवीस यांनी, तर आभार गजानन कासावार यांनी मानले. साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला साहित्य रसिकांनी संमेलनस्थळी तुडूंब गर्दी केली होती. तत्पूर्वी सकाळी वणी शहरातून गंथदिंडी काढण्यात आली. यात संमेलनाध्यक्ष शिरीष देशपांडे यांच्यासह आयोजन समितीतील पदाधिकारी, शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी तथा नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.समाज घडविण्यात लेखकांचे योगदान - संमेलनाध्यक्ष डॉ. शिरीष देशपांडेवणी हे कामगार क्षेत्र असतानाही येथे वाचनाची आवड आहे, ते येथे जमलेल्या गर्दीवरून दिसून येते. समाज घडविण्यामध्ये लेखकांचे महत्वाचे योगदान असून क्रांती घडवून आणण्याची ताकद लेखकांमध्ये असल्याचे प्रतिपादन विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शिरीष देशपांडे यांनी केले.

टॅग्स :literatureसाहित्य