शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

मराठी साहित्याची काश्मिरी युवकांना भुरळ;  संमेलनात हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 21:17 IST

काश्मिरमधल्या सर्वसामान्य माणसाच जीवनमान कसं आहे, त्याला भारताबद्दल काय वाटतं, याचं गाठोडं घेऊन काश्मिरातील दोन मुसाफीरांनी यवतमाळचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गाठले.

ठळक मुद्देमराठी तरुणांना काश्मिरी वास्तविकतेचे दर्शन

सुरेंद्र राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) : काश्मिर व तेथील स्थानिकांबद्दल संपूर्ण देशभरात अनेक गैरसमज आहे. मात्र काश्मिरमधल्या सर्वसामान्य माणसाच जीवनमान कसं आहे, त्याला भारताबद्दल काय वाटतं, याचं गाठोडं घेऊन काश्मिरातील दोन मुसाफीरांनी यवतमाळचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गाठले.या संमेलनात नुसताच सहभाग घेण्याऐवजी या युवकांनी काश्मिरी साहित्य मराठीत अनुवाद करून विक्रीला ठेवलयं. त्यांच्या या कामात संजय नहार यांच्या चिनार पब्लिकेशनचा मोठा वाटा आहे. ५० टक्के सवलतीच्या दरात भारताच्या नंदनवनाची माहिती दिली जात आहे. त्यांचा हा स्टॉल खऱ्या अर्थाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरीत ‘अखिल भारतीय’ ठरला. काश्मिरच्या बडगाम येथील फिरदोस अली मीर आणि कुपवाडा येथील मुश्ताक अहेमद हा भारतीय सेतू बांधण्याचे काम करीत आहे. भारतातील इतर राज्यातील नागरिक काश्मिरी व्यक्तीकडे साशंकतेने बघत असल्याची खंत त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.महाराष्ट्रातील मराठी माणूस मात्र काश्मिरींना आपल्यातलाच समजतो, ही ओढच त्यांना या संमेलनात घेऊन आली. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल मीडियावरून काश्मिरबाबत अनेक गैरसमज परसविण्यात येतात. ही दरी मिटविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मुश्ताक यांनी सांगितले. महाराष्ट्र हे भारताचे हृदयस्थान आहे. येथे कोणत्याही प्रदेशातील व्यक्तीचा अगदी सहज स्वीकार केला जातो. देशपातळीवरची भूमिका नेहमीच महाराष्ट्रातून ठरली आहे, याचा अभिमान असल्याचेही फिरदोस मीर यांनी सांगितले.पुण्यात मराठीतून पदवीहे दोन्ही युवक मराठीच्या इतक्या प्रेमात पडले की त्यांनी चक्क पुणे येथे कला शाखेला प्रवेश घेतला. ते आता मराठीतून पदवी घेत आहे. दोघेही बीए अंतिम वर्षाला आहेत. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात त्यांनी मित्रांचा गोतावळा तयार केला. सुटीच्या दिवसात महाराष्ट्रीयन मित्रांना घेऊन ते काश्मिरमध्ये जातात. तेथील वास्तव दाखवतात. त्यांनी काश्मिरच्या प्राथमिक शाळांमध्ये शिकविल्या जाणाºया बाल कथांचाही मराठीत अनुवाद केला. त्याची पुस्तके अगदी सवलतीच्या दरात मराठी माणसापर्यंत पोहोचविण्याचे काम हे दोघे करीत आहेत. त्यांचा हा उपक्रम प्रांत व भाषा वादावरून ‘माथी’ भडकवणाºयांसाठी खºया अर्थाने एक मौलिक संदेश आहे.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन