शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

मराठी साहित्याची काश्मिरी युवकांना भुरळ;  संमेलनात हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 21:17 IST

काश्मिरमधल्या सर्वसामान्य माणसाच जीवनमान कसं आहे, त्याला भारताबद्दल काय वाटतं, याचं गाठोडं घेऊन काश्मिरातील दोन मुसाफीरांनी यवतमाळचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गाठले.

ठळक मुद्देमराठी तरुणांना काश्मिरी वास्तविकतेचे दर्शन

सुरेंद्र राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) : काश्मिर व तेथील स्थानिकांबद्दल संपूर्ण देशभरात अनेक गैरसमज आहे. मात्र काश्मिरमधल्या सर्वसामान्य माणसाच जीवनमान कसं आहे, त्याला भारताबद्दल काय वाटतं, याचं गाठोडं घेऊन काश्मिरातील दोन मुसाफीरांनी यवतमाळचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गाठले.या संमेलनात नुसताच सहभाग घेण्याऐवजी या युवकांनी काश्मिरी साहित्य मराठीत अनुवाद करून विक्रीला ठेवलयं. त्यांच्या या कामात संजय नहार यांच्या चिनार पब्लिकेशनचा मोठा वाटा आहे. ५० टक्के सवलतीच्या दरात भारताच्या नंदनवनाची माहिती दिली जात आहे. त्यांचा हा स्टॉल खऱ्या अर्थाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरीत ‘अखिल भारतीय’ ठरला. काश्मिरच्या बडगाम येथील फिरदोस अली मीर आणि कुपवाडा येथील मुश्ताक अहेमद हा भारतीय सेतू बांधण्याचे काम करीत आहे. भारतातील इतर राज्यातील नागरिक काश्मिरी व्यक्तीकडे साशंकतेने बघत असल्याची खंत त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.महाराष्ट्रातील मराठी माणूस मात्र काश्मिरींना आपल्यातलाच समजतो, ही ओढच त्यांना या संमेलनात घेऊन आली. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल मीडियावरून काश्मिरबाबत अनेक गैरसमज परसविण्यात येतात. ही दरी मिटविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मुश्ताक यांनी सांगितले. महाराष्ट्र हे भारताचे हृदयस्थान आहे. येथे कोणत्याही प्रदेशातील व्यक्तीचा अगदी सहज स्वीकार केला जातो. देशपातळीवरची भूमिका नेहमीच महाराष्ट्रातून ठरली आहे, याचा अभिमान असल्याचेही फिरदोस मीर यांनी सांगितले.पुण्यात मराठीतून पदवीहे दोन्ही युवक मराठीच्या इतक्या प्रेमात पडले की त्यांनी चक्क पुणे येथे कला शाखेला प्रवेश घेतला. ते आता मराठीतून पदवी घेत आहे. दोघेही बीए अंतिम वर्षाला आहेत. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात त्यांनी मित्रांचा गोतावळा तयार केला. सुटीच्या दिवसात महाराष्ट्रीयन मित्रांना घेऊन ते काश्मिरमध्ये जातात. तेथील वास्तव दाखवतात. त्यांनी काश्मिरच्या प्राथमिक शाळांमध्ये शिकविल्या जाणाºया बाल कथांचाही मराठीत अनुवाद केला. त्याची पुस्तके अगदी सवलतीच्या दरात मराठी माणसापर्यंत पोहोचविण्याचे काम हे दोघे करीत आहेत. त्यांचा हा उपक्रम प्रांत व भाषा वादावरून ‘माथी’ भडकवणाºयांसाठी खºया अर्थाने एक मौलिक संदेश आहे.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन