शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

नगरपरिषदेचे अनेक गाळे लिलावाअभावी पडूनच

By admin | Updated: April 11, 2015 23:59 IST

येथील नगरपरिषदेचे जवळपास दुकाने ३५ गाळे गेल्या कित्येक वर्षांपासून लिलावाअभावी पडून आहे.

आर्थिक नुकसान : काहींनी सुरू केला मोफत वापरवणी : येथील नगरपरिषदेचे जवळपास दुकाने ३५ गाळे गेल्या कित्येक वर्षांपासून लिलावाअभावी पडून आहे. त्यामुळे नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान होत आहे.नगरपरिषदेने आयडीएसएमटी व इतर निधीतून बांधकाम केलेले गाळे, यापूर्वी लिलाव करूनही भाड्याने न गेलेले गाळे, नव्याने भाडे ठरविण्यात आलेले गाळे नगरपरिषदेच्या मालकीचे आहेत. त्यांचा लिलाव न झाल्यामुळे नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान होत आहे. शहरातील आरक्षण क्रमांक १४ मधील गाळ्यांचा लिलाव न झाल्यामुळे त्याचा मोफत वापर काही नागरिक करताना दिसून येत आहे. हे गाळे सन १९९८ मध्येच बांधून तयार झाले होते. मात्र त्यांचा लिलावच करण्यात आला नाही. परिणामी हे गाळे अद्याप तसेच पडून आहे. त्याचा उप्योग आता काही नागरिक करीत आहे. मात्र त्यापासून नगरपरिषदेला छदामही मिळत नाही. परिणामी लाखो रूपये खर्चन बांधलेले हे गाळे आता शोभेचेच ठरले आहे.यासोबतच आरक्षण क्रमांक ७९ मधील नगरपरिषदेच्या निधीतून बांधलेल्या १८ पैकी केवळ एक गाळा भाड्याने देण्यात आला आहे. उर्वरित १७ गाळेधारकांनी पैसेच भरले नाही. मात्र त्यापैकी काहींनी लिलावात बोली बोलताना अनामत रक्क्म जमा केली होती. आता त्यांच्या अनामत रकमेतून काही पैसे कापून ते नव्याने लिलाव करण्याची गरज निर्माण झाली आहे. हे गाळेसुद्धा रिकामे पडून असल्याने त्यापासून नगरपरिषदेला कोणताही आर्थिक लाभ होत नाही. सोबतच आरक्षण क्रमांक ७८ मधील आयडीएसएमटी योजनेअंतर्गत १८ गाळ्याचे भाडे निश्चित करण्यात आले आहे. मात्र ते गाळेही अद्याप हर्रास करण्यात आले नाही. त्यामुळे नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान होत आहे. लाखो रूप्ये खर्च करून नगरपरिषदेने विविध निधीतून या गाळ्याची् निर्मिती केली. त्यांचा लिलाव करून त्यापासून नगरपरिषदेला आर्थिक उत्पन्न मिळवून देणे, असा हेतू होता. मात्र हा मूळ हेतूच आता बाजूला सारला गेला आहे. परिणामी गाळे तयार असूनही नगरपरिषदेला आर्थिक लाभ होत नाही. त्यामुळे नगरपरिषदेने केलेली गुंतवणूक निरर्थक ठरली आहे. त्यापासून काहीच मिळकत होत नसल्याने नगरपरिषदेचे आर्थिक बाजूही कमकुवत होत आहे. त्यासाठी आता नव्याने या सर्व गाळ्यांचा लिलाव करण्याची गरज आहे. (कार्यालय प्रतिनिधी)या संदर्भात नगरपरिषदेचे आरोग्य सभापती व मनसेचे गटनेते धनंजय त्रिंबके यांनी नुकतेच मुख्याधिकाऱ्यांना एक निवेदन दिले आहे. त्यातून त्यांनीही या सर्व गाळ्यांचा नव्याने लिलाव करण्याची मागणी केली आहे. तसेच नगरपरिषद शाळा क्रमांक दोनसमोरील पहिला माळ्यावरील गाळेधारकांनी पैसे भरले नसल्यास ते गाळे खाली करून ते हर्रास करावे, अशी मागणीही त्रिंबके यांनी केली आहे. आता किमान त्यांच्या मागणीला तरी नगरपरिषदेकडून होकार मिळतो किंवा नाही, याबाबत साशंकताच आहे. विशेष म्हणजे सत्तारूढ प२ाच्या सभापतीलाच निवेदन देऊन गाळे हर्रास करण्याची मागणी करावी लागत आहे.