शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

दुधात अनेक पदार्थांची भेसळ

By admin | Updated: July 24, 2016 00:50 IST

जिल्ह्यात शेतीसोबत दुधाचा व्यवसाय शेतकरी करतात. शेतकरी हे दूध खासगी दूध संकलन केंद्राकडे नेतात.

बालके संकटात : आरोग्यावर विपरित परिणाम दिग्रस : जिल्ह्यात शेतीसोबत दुधाचा व्यवसाय शेतकरी करतात. शेतकरी हे दूध खासगी दूध संकलन केंद्राकडे नेतात. तेथे त्यात अनेक पदार्थांचे भेसळ करून ते विकले जात आहे. परिणामी बालकांना हे भेसळयुक्त दूध पाजल्यानंतर त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. दिग्रस तालुक्यातील ग्रामीण भागातून साधारणत: ४० ते ५० गावांचे दूध विक्रेते आपले दूध येथील संकलन केंद्रावर आणून त्याची विक्री करतात. त्या दुधावर कोणत्याही प्रकारे पाश्चराईझेशन केले जात नाही किंवा त्याची शुद्धतासुद्धा तपासली जात नाही. कमी भावात हे दूध मिळत असल्याने खरेदीदार त्याची कोणतीही तपासणी करीत नाही. तेच दूध विकत घेऊन, ते त्या दुधाची अव्वाच्या सव्वा दरात किरकोळ बाजारात विक्री करतात. विशेष म्हणजे दूध संकलन केंद्र तालुक्यातून येणाऱ्या दुधात अशुद्ध पाणी टाकून ते दूध विकत असल्याने, त्या दुधातील सत्वता व स्निग्धता पूर्णत: कमी होते. हेच दूध लहान मुलांना पिण्यास दिले जात असल्याने त्यांना टायफाईड, जुलाब, उलट्या, काविळ, जंत, आतड्याचा विकार, आदी आजार बळावतात. त्यामुळे बालकांसह मोठ्यांनाही विविध आजार होत आहे. दैनंदिन जीवनात दुधाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बालकांचे आयुष्य तर पूर्णत: दुधावरच अवलंबून आहे. मात्र त्याच दुधात भेसळ होत असून त्यांना आपण विषच पाजत तर नाही ना, असा प्रश्न पालकांना पडला आहे. यामुळे बालकांचे आरोग्य दिवसेंदिवस खालावत आहे. ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या या दुधात आधीच पाणी टाकले जाते. त्यात दूध संकलन केंद्रात पुन्हा हेराफेरी केली जाते. या दुधाला पांढरा रंग येण्यासाठी पिठासारखे पदार्थ त्यात मिसळविले जातात. ते ग्राहकांच्या लक्षातसुद्धा येत नाही. यातून ग्राहकांची आर्थिक लूट तर होतेच, सोबतच त्यांना अशुद्ध दूध मिळते. दूध संकलन विक्रेत्याच्या मनमानी कारभार रामभरोसे असतो. खासगी दूध संकलन केंद्र ठेकेदारी पद्धतीने कारभार करतात. पूर्वी गावोगावी शासकीय दूध संकलन केंद्र होते. मात्र गावातील म्हैस, गायी व इतर सस्तन प्राणी कमी झाल्याने आता तालुक्याला दूध विक्री केली जाते. मात्र दूध संकलन केंद्राची पत घसरली असून ग्राहकांना आता शुद्ध दूध मिळणे अवघड झाले आहे. घरोघरी दुधाची गंगा वाहणाऱ्या दिग्रस तालुक्याची ख्याती, आता नामशेष होत आहे. (शहर प्रतिनिधी) विठोली येथील गुरेढोरे विक्रीला दिग्रस तालुक्यातील विठोली मारोती येथील गावात पूर्वी विक्रमी दूध उत्पादन होत होते. यवतमाळ जिल्ह्यात हे गाव दूध उत्पादनात अग्रस्थानी होते. मात्र सततचा दुष्काळ अन् नापिकीने तेथील शेतकरी आता हतबल झाले आहेत. त्यांनी पोटच्या मुलाप्रमाणे जपलेली गुरेढोरे आता विक्रीला काढली आहे. परिणामी या गावातील शेतीपूरक व्यवसाय मोडकळीस आला आहे. शेतकऱ्यांना आता कोणता व्यवसाय करावा, असा प्रश्न पडला आहे. ही समस्या केवळ तालुक्यातील एकाच गावाची नसून संपूर्ण जिल्ह्यालाच ती भेडसावत आहे.