शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

अन्न सुरक्षा योजनेपासून अनेक नागरिक वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 21:38 IST

तालुक्यातील अनेक नागरिक अन्न सुरक्षा योजनेपासून वंचित आहे. त्यांना धान्य मिळत नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे.

ठळक मुद्देउमरखेड तालुका : सलग तीन वर्षांपासून पाठपुरावा, तरीही अपयश

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : तालुक्यातील अनेक नागरिक अन्न सुरक्षा योजनेपासून वंचित आहे. त्यांना धान्य मिळत नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे.शासनाने अन्न सुरक्षा योजना सुरू करून धान्य पुरविण्याची ग्वाही दिली. शिधापत्रिकेवर त्यांना धान्य देण्याची हमी दिली. प्रत्यक्षात अनेक शिधापत्रिकाधारकांचा अद्याप या योजनेत समावेशच झाला नाही. परिणामी त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. अनेक केशरी शिधापत्रिकाधारक या योजनेपासून वंचित आहे. त्यांचा अन्नसुरक्षा योजनेत समाविेश झाला नाही. परिणामी त्यांना रास्त भाव दुकानदार धान्य देण्यास तयार नाही.तालुक्यातील आदिवासीबहुल भागातील बोरी (वन) येथील अनेक नागरिक अन्न सुरक्षा योजनेपासून वंचित आहे. त्यांनी गेल्या तीन वर्षांपासून योजनेम समावेश करावा म्हणून प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र त्यांची नावे अद्याप समाविष्ट झाली नाही. परिणामी आदिवासी भूमिहिन, शेतमजूर व दिव्यांगासह अनेक नागरिक गेल्या तीन वर्षांपासून धान्यापासून वंचित आहे.या वंचित नागरिकांनी पंचायत समिती सदस्य धनराज तगरे यांच्या नेतृत्वात तहसीलवर धडक दिली. त्यात आदिवासी, भूमिहिन, दिव्यांग, मागासवर्गीय, मजुरांचा समावेश होता. त्यांनी २०१४ पासून केशरी शिधापत्रिका काढल्या. मात्र संबंधित दुकानदारांकडून धान्यच मिळाले नाही, असा टाहो तहसीलदार भगवान कांबळे यांच्यासमोर फोडला.अन्यथा उपोषण करणारगेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा करूनही अनेक नागरिकांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळाला नाही. अनेकांवर उपासमारीची वेळ आली. पात्र असूनही त्यांना धान्य मिळत नाही. त्यामुळे आता वंचित नागरिकांनी न्याय न मिळाल्यास येथील तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.