शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
2
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
3
Tariffs on Furniture: ट्रम्प यांचा फर्निचर उद्योगावरही 'टॅरिफ घाव'; कोणत्या भारतीय कंपन्यांना बसणार फटका?
4
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
5
४ लाख कोटी स्वाहा! TATA च्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना दिला मोठा झटका, आणखी खाली जाऊ शकते किंमत?
6
भारतीय हवाई दलात इतिहास घडवणारे 'MiG-21' झाले निवृत; पाकिस्तानचा थरकाप उडवणाऱ्या विमानाला शेवटचा सॅल्यूट!
7
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
8
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
9
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
10
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
11
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
12
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
13
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
14
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
15
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
16
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
17
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
18
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
19
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
20
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 

नवीन पदाधिकाऱ्यांपुढे अनेक आव्हाने

By admin | Updated: April 10, 2017 01:57 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पदाधिकारी व सदस्यांसमोर एकीकडे विविध विकासकामांना गती देण्याचे आव्हान आहे.

विविध प्रश्न तीव्र : राळेगाव परिसरात आरोग्य, शिक्षण, पाणीटंचाईची समस्या के.एस. वर्मा   राळेगावराळेगाव : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पदाधिकारी व सदस्यांसमोर एकीकडे विविध विकासकामांना गती देण्याचे आव्हान आहे. दुसरीकडे वर्षानुवर्षे आरोग्य, शिक्षण, पाणीटंचाईसह विविध महत्वपूर्ण सेवांची पदांच्या कमतरतेमुळे विस्कळीत झालेली घडी सुयोग्यपणे बसविण्याकरिताही प्रयत्नांची कसोटी लागणार आहे. राळेगाव तालुक्यात जून २०१६ पासून पूर्ण वेळ तालुका आरोग्य अधिकारी नाही. मारेगाव येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भेरे यांच्याकडे अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे. हीच स्थिती कळंब येथील तालुका आरोग्य अधिकारी पदाच्या बाबतीतही आहे. मागील चार वर्षांपासून राळेगाव येथे पूर्णवेळ गटशिक्षणाधिकारी नाही. प्रभारावर कामकाज चालविले जात आहे. काही महिन्यांपूर्वी सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला होता. आता मागील महिन्यांपासून पुन्हा विस्तार अधिकाऱ्याकडे हा प्रभार देण्यात आला. राळेगाव सोबतच कळंब व बाभूळगाव तालुक्यातही या पदांबाबत असा खेळखंडोबा गेल्या काही वर्षांपासून सतत चालू राहिला आहे. महिला व बाल विकास प्रकल्प विभागाचे प्रकल्प अधिकारी पद एक वर्षांपेक्षा अधिक काळापासून रिक्त आहे. संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात दोन तालुक्यांचा अपवाद वगळता इतर १४ तालुक्यात प्रभरावर कामकाज सुरू आहे. राळेगाव पंचायत समितीमध्ये तीन शाखा अभियंत्यांची गरज असताना मागील एक-दोन वर्षांपासून केवळ एकाच शाखा अभियंत्याच्या भरवशावर निभावून घेतले जात आहे. वरद सर्कलचा प्रभार जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कळंब येथील शाखा अभियंता गणेश शिंगणे यांच्याकडे अतिरिक्त देण्यात आला आहे. ते कळंबवरून परस्परपनेच हा प्रभार पार पडत आहेत. आरोग्य , शिक्षण, महिला व बाल विकास, बांधकाम अभियंते आदी प्रत्येक पद महत्वाचे आहे. प्रत्येक पदाच्या अधिकाऱ्यांना त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे निर्धारित अवधीत पार पाडाव्याच लागतात. या स्थितीत मानहताकडे प्रभार, अतिरिक्त प्रभार आदी बाबींमुळे दोन्ही पदावर अन्याय होतो, त्रुटी राहतात, गैरप्रकारही होऊन जातात. अनेकदा केवळ खानापूर्ती तेव्हढी होते. हे असेच आणखी किती दिवस चालू राहणार याचा विचार करून निर्वाचित पदाधिकारी, संबंधित वरिष्ठ अधिकारी, आमदार, मंत्री आदींनी आवश्यक त्या पदावर पूर्ण वेळ अधिकारी देण्याची नितांत गरज आहे.