शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

कम्युनिटी पोलिसिंगचा स्वतंत्र सेल- मनोज केदारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 06:00 IST

अनेकदा हातचा तपास सोडून पळावे लागते. ही अडचण सिंगापूर पोलिसांना नाही. सगळ्यात मोठी समस्या संख्याबळाची आहे. याचा समतोल कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून साधल्यास निश्चितच गुन्ह्याचे प्रमाण कमी होऊन पोलिसांना समाजात सन्मानाची वागणूक मिळणे शक्य आहे.

ठळक मुद्देवाढत्या गुन्हेगारीवर ठरू शकते प्रभावी

सुरेंद्र राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ब्यूरो ऑफ पोलीस रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट सेंटरच्या वतीने भारतातील निवडक पोलीस अधिकाऱ्यांची सिंगापूर येथे प्रशिक्षणासाठी निवड झाली. यवतमाळ ग्रामीणचे ठाणेदार मनोज केदारे यांनी सिंगापूर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर तुलनात्मक पद्धतीने उहापोह केला.भारत आणि सिंगापूरच्या कायद्यात काही फरक आहे का?भारतातीलच कायदे सिंगापूरमध्ये आहेत. आयपीसी, सीआरपीसीच्या तरतुदीनुसारच सिंगापूर पोलीस काम करतात. तेथील शिक्षेची तरतूदही सारखीच आहे. न्यायप्रक्रिया गतिमान असून खटले वेळेत निकाली निघतात.कम्युनिटी पोलिसिंग नेमकी काय संकल्पना आहे ?सिंगापूरमध्ये प्रत्येक तरूणाला किमान दोन वर्षे पोलीस दलात काम करण्याची सक्ती आहे. कम्युनिटी पोलीस पूर्ण अधिकाराने कर्तव्य बजावतात. त्यामुळे तेथील नागरिकांमध्ये पोलीस व सैन्याविषयी वेगळी आस्था आहे. शिवाय यामुळे गुन्हे घडण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. प्रत्येक जण जबाबदारीने कायदे पाळतो. ५६ लाख लोकसंख्येचा देश असल्याने तेथे हा प्रयोग अतिशय यशस्वी झाला आहे.पोलीस कुठल्या हायटेक तंत्राचा वापर करतात?सिंगापूरमधील इंचन् इंच भूभाग हा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत आहे. त्यामुळे गुन्हा घडला तरी काही मिनिटातच आरोपीची ओळख पटवणे शक्य होते. शिवाय कामाचा ताण नसल्याने प्रत्येक यंत्रणा स्वतंत्रपणे काम करते. तेथे कायदा व सुव्यवस्था सांभाळणारे पथक स्वतंत्र आहे. वाहतूक पोलीस केवळ वाहतुकीवरच लक्ष ठेवतात. गुन्हे व आरोपींचा शोध घेणारी स्वतंत्र शाखा आहे. त्यांना आपली शाखा सोडून कोणतचे काम दिले जात नाही. उलट महाराष्ट्र पोलिसांची सर्वाधिक एनर्जी बंदोबस्तामध्येच खर्च होते. अनेकदा हातचा तपास सोडून पळावे लागते. ही अडचण सिंगापूर पोलिसांना नाही. सगळ्यात मोठी समस्या संख्याबळाची आहे. याचा समतोल कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून साधल्यास निश्चितच गुन्ह्याचे प्रमाण कमी होऊन पोलिसांना समाजात सन्मानाची वागणूक मिळणे शक्य आहे.सिंगापूर पोलिसांच्या तुलनेत महाराष्ट्र पोलीस अधिक सक्षम आहेत. प्रचंड काम व अपुऱ्या मनुष्यबळावरही येथे काम करण्याची क्षमता आहे. महाराष्ट्र पोलीस सायबर क्राईममध्ये एक्सपर्ट आहेत. गुन्हे घडत नसल्याने सिंगापूर पोलिसांकडे पुरेसा अनुभव दिसत नाही.बंदोबस्ताचा ताण तणाव नाहीसिंगापूरमध्ये मंत्री, आमदारही स्वत:च गाडी चालवितात. व्हीआयपी व सार्वजनिक बंदोबस्ताचा तेथील पोलिसांवर कोणताच ताण नाही. कठोर कायदे अंमलबजावणी व आर्थिक समानतेमुळे प्रत्येक जण कायद्याचे पालन करतो. तेथे पोलिसांना प्रचंड आदर आहे. हे वातावरण उच्च तंत्रज्ञान व कम्युनिटी पोलिसिंगमुळे शक्य झाले आहे. ही संकल्पना आपल्याकडे राबविल्यास युवकांना बेरोजगारीच्या काळात मानधनावर काम करता येईल. शिवाय कायदे पाळण्याचे संस्कार त्यांच्यात रुजल्याने गुन्हे नियंत्रणास मदत होऊ शकते. पोलीस हा आपल्या सुरक्षेसाठी आहे ही भावना वाढीस लागण्यास मदत होते. शिवाय तारुण्यातच जबाबदारीचे भानयेते.

टॅग्स :Policeपोलिस