शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

कोरोनाच्या धास्तीने साखरपुड्यातच मंगलाष्टके; दोन महिने आधीच उरकला लग्न सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 14:02 IST

साखरपुड्यासाठी मोजकी मंडळी जमली. लग्नाची तारीख १४ मे ठरली. पण तेवढ्यात एक समंजस माणूस पुढे आला.

प्रकाश लामणेपुसद(यवतमाळ) : साखरपुड्यासाठी मोजकी मंडळी जमली. लग्नाची तारीख १४ मे ठरली. पण तेवढ्यात एक समंजस माणूस पुढे आला. कोरोना विषाणू पसरू नये म्हणून गर्दी टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे आपणही लग्नाची गर्दी टाळली तर बरे होईल, असा प्रस्ताव ठेवला. वर आणि वधू अशा दोन्हीकडील मंडळींनी हा प्रस्ताव लगेच मान्य केला अन् साखरपुड्यातच साधा विवाह सोहळा पार पडला.शासनाच्या आवाहनाला मान देत अन् स्वत:च्या इच्छांना मुरड घालत हा आदर्श विवाह सोहळा रविवारी ८ मार्च २०२० रोजी येथील विरंगुळा केंद्रात पार पडला. १४ मे रोजी ठरलेला लग्नसोहळा दोन महिने आधीच ८ मार्च रोजी झाला. येथील पालडीवाल ले-आउटमधील शेतकरी कैलासराव कदम यांची सुकन्या दिपाली आणि वाशिम जिल्ह्यातील किनखेडा येथील शेतकरी किसनराव अवचार यांचे चिरंजीव शुभम यांचा विवाह नुकताच जुळला होता. लग्नाची तारीखही ठरली होती. तत्पूर्वी रविवारी त्यांचा साखरपुडा येथील विरंगुळा केंद्रात आयोजित करण्यात आला होता. दोन्हीकडील निवडक मंडळी या छोटेखानी कार्यक्रमासाठी जमली होती. साखरपुडा झाला अन् पाहुण्यांमध्ये ‘कोरोना’ची चर्चा सुरू झाली. मेहकर (जि. बुलडाणा) येथील प्राचार्य प्रतापराव देशमुख यांनी वेगळाच प्रस्ताव सर्वांसमोर ठेवला. कोरोनामुळे शासनाने गर्दी व यात्रा आदी टाळण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आपण साखरपुड्यातच लग्न आटोपले तर चालेल का, असा प्रस्ताव त्यांनी सर्वांपुढे मांडला. त्यावर दोन्ही बाजूंनी होकार आला. जेवढे पाहुणे, नातेवाईक साखरपुड्यासाठी हजर होते, त्यांच्या साक्षीनेच हा छोटेखानी पण आदर्श विवाह सोहळा पार पडला. वाजंत्री नाही, आहेर नाही, मानपान नाही. कोणताही बडेजाव न करता पुसद तालुक्यातील सावंगी येथील बाळू देशमुख यांनी मंगलाष्टके व लग्नविधी पार पाडले. 

-----------------मराठा सेवा संघाचे विचार आम्ही आत्मसात केले असून अ‍ॅड. पुरुषोत्तम खेडेकर यांना आदर्श मानतो. त्याच पद्धतीने मुलीचे लग्न व्हावे, असे वाटत होते. मात्र कोरोनाच्या भीतीपोटी आम्ही जास्त लोकांना आमंत्रित न करता साखरपुड्यातच लग्न उरकून घेतले.- डॉ. गणेश कदम, नववधू दिपालीचे वडील

-----------------आमचे शेतकरी कुटुंब असून एकुलता एक मुलगा शुभम याचे लग्न बºयापैकी व्हावे अशी इच्छा होती. १४ मे ही लग्नाची तारीख ठरली होती. मात्र कोरोनामुळे शासनाने जमाव, यात्रा आदींवर बंदी घातली आहे. त्याला प्रतिसाद म्हणून साखरपुड्यातच साध्या पद्धतीने विवाह उरकला.- किसनराव अवचार, नवरदेव शुभचे वडील

टॅग्स :Yavatmalयवतमाळ