शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

वयोवृद्ध आई-वडिलांसाठी घरालाच आनंदआश्रम बनवा; मोरारीबापू यांचे आवाहन

By विशाल सोनटक्के | Updated: September 11, 2025 12:45 IST

डॉ. विजय दर्डा, राजेंद्र दर्डा आणि दर्डा परिवाराच्या वतीने यवतमाळ येथील चिंतामणी बाजार समितीच्या आवारात आयोजित रामकथा पर्वाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

- विशाल सोनटक्के, यवतमाळ आधुनिक काळात वृद्धाश्रमाची संख्या वाढत आहे. याची गरज मी जाणतो, ओळखतो. तरीही माझे म्हणणे आहे, सुरक्षित आणि सहायक वातावरण निर्माण करून आपण आपल्या घरालाच वृद्धाश्रम बनविल्यास तो खऱ्या अर्थाने वयोवृद्ध आई-वडिलांसाठी आनंदआश्रम ठरेल, असे विवेचन प्रसिद्ध आध्यात्मिक संत मोरारीबापू यांनी केले.

डॉ. विजय दर्डा, राजेंद्र दर्डा आणि दर्डा परिवाराच्या वतीने यवतमाळ येथील चिंतामणी बाजार समितीच्या आवारात आयोजित रामकथा पर्वाच्या पाचव्या दिवशी बुधवारी ते बोलत होते. 

रामचरितमानसमध्ये नऊ ग्रहांचे वर्णन आहे. हे ग्रह नव्हे तर गुरू आहेत. आकाशात नऊ ग्रह आहेत. कधी-कधी त्यांची युती होते, वियोग होतो हे खगोलशास्त्र आहे; पण शरणागतांसाठी ग्रहांपेक्षा गुरूची आवश्यकता जास्त आहे. पहिला ग्रह म्हणजे आई लेकराला जिथे जन्म देते ते मातृगृह, तर संपूर्ण घरालाच पितृगृह म्हणतात. या दोघांचा आदर करायला हवा. प्रत्येकाने लहान मुलांसाठी बालमंदिर, संस्कारयुक्त तरुणांसाठी युवा मंदिर, ज्येष्ठांना सेवा मिळेल असे वृद्धाश्रम आणि जिथे मौन, वैराग्य, साधना करता येईल, असे संन्यासाश्रम घरामध्येच उभारले पाहिजे, यातून ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास मिळून आपले घरच आध्यात्मिक विश्वविद्यालय होईल, असे ते म्हणाले.

गुरू लेझर नाही मेजर ऑपरेशन करतो

गुरू मनाचा ज्ञाता आणि निर्मातादेखील आहे. तो लेझर ऑपरेशन करीत नाही, तर मेजर ऑपरेशन करतो, गुरू सान्निध्यामुळे हळूहळू वैराग्य प्राप्त होते. मिथ्या, सत्य, सार्थक काय आहे समजते आणि माणूस आतल्या आत पुढे जातो, अशा शब्दांत मोरारीबापू यांनी गुरू महिमा कथन केला.

बंधन नव्हे, तर आध्यात्मिक यात्रा : डॉ. विजय दर्डा

पती-पत्नी यांच्यातील संबंध केवळ बंधन नव्हे तर ती आध्यात्मिक यात्रा आहे. विवाहाचा अर्थ केवळ एकत्र राहणे नव्हे, तर परस्परांच्या जीवनात सहकारी, साधन आणि सहयात्री होणे आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पती-पत्नीला केवळ शरीर म्हणून न पाहता आत्मा म्हणून पाहायला हवे, शक्ती मानून सन्मान द्यायला हवा, तेव्हाच जीवनात संतुलन येईल, असे सांगत लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन तथा कथापर्वचे यजमान डॉ. विजय दर्डा यांनी सुफियाना शेर ऐकविला. ‘इश्क में जब रंग ए हुस्न समा जाए, हर दर्द में राहत का पता चल जाए, दिल से दिल की बात जुड जाए, सुफी की राहों में सुकून बिखर जाए.’

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमYavatmalयवतमाळ