शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

वयोवृद्ध आई-वडिलांसाठी घरालाच आनंदआश्रम बनवा; मोरारीबापू यांचे आवाहन

By विशाल सोनटक्के | Updated: September 11, 2025 12:45 IST

डॉ. विजय दर्डा, राजेंद्र दर्डा आणि दर्डा परिवाराच्या वतीने यवतमाळ येथील चिंतामणी बाजार समितीच्या आवारात आयोजित रामकथा पर्वाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

- विशाल सोनटक्के, यवतमाळ आधुनिक काळात वृद्धाश्रमाची संख्या वाढत आहे. याची गरज मी जाणतो, ओळखतो. तरीही माझे म्हणणे आहे, सुरक्षित आणि सहायक वातावरण निर्माण करून आपण आपल्या घरालाच वृद्धाश्रम बनविल्यास तो खऱ्या अर्थाने वयोवृद्ध आई-वडिलांसाठी आनंदआश्रम ठरेल, असे विवेचन प्रसिद्ध आध्यात्मिक संत मोरारीबापू यांनी केले.

डॉ. विजय दर्डा, राजेंद्र दर्डा आणि दर्डा परिवाराच्या वतीने यवतमाळ येथील चिंतामणी बाजार समितीच्या आवारात आयोजित रामकथा पर्वाच्या पाचव्या दिवशी बुधवारी ते बोलत होते. 

रामचरितमानसमध्ये नऊ ग्रहांचे वर्णन आहे. हे ग्रह नव्हे तर गुरू आहेत. आकाशात नऊ ग्रह आहेत. कधी-कधी त्यांची युती होते, वियोग होतो हे खगोलशास्त्र आहे; पण शरणागतांसाठी ग्रहांपेक्षा गुरूची आवश्यकता जास्त आहे. पहिला ग्रह म्हणजे आई लेकराला जिथे जन्म देते ते मातृगृह, तर संपूर्ण घरालाच पितृगृह म्हणतात. या दोघांचा आदर करायला हवा. प्रत्येकाने लहान मुलांसाठी बालमंदिर, संस्कारयुक्त तरुणांसाठी युवा मंदिर, ज्येष्ठांना सेवा मिळेल असे वृद्धाश्रम आणि जिथे मौन, वैराग्य, साधना करता येईल, असे संन्यासाश्रम घरामध्येच उभारले पाहिजे, यातून ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास मिळून आपले घरच आध्यात्मिक विश्वविद्यालय होईल, असे ते म्हणाले.

गुरू लेझर नाही मेजर ऑपरेशन करतो

गुरू मनाचा ज्ञाता आणि निर्मातादेखील आहे. तो लेझर ऑपरेशन करीत नाही, तर मेजर ऑपरेशन करतो, गुरू सान्निध्यामुळे हळूहळू वैराग्य प्राप्त होते. मिथ्या, सत्य, सार्थक काय आहे समजते आणि माणूस आतल्या आत पुढे जातो, अशा शब्दांत मोरारीबापू यांनी गुरू महिमा कथन केला.

बंधन नव्हे, तर आध्यात्मिक यात्रा : डॉ. विजय दर्डा

पती-पत्नी यांच्यातील संबंध केवळ बंधन नव्हे तर ती आध्यात्मिक यात्रा आहे. विवाहाचा अर्थ केवळ एकत्र राहणे नव्हे, तर परस्परांच्या जीवनात सहकारी, साधन आणि सहयात्री होणे आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पती-पत्नीला केवळ शरीर म्हणून न पाहता आत्मा म्हणून पाहायला हवे, शक्ती मानून सन्मान द्यायला हवा, तेव्हाच जीवनात संतुलन येईल, असे सांगत लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन तथा कथापर्वचे यजमान डॉ. विजय दर्डा यांनी सुफियाना शेर ऐकविला. ‘इश्क में जब रंग ए हुस्न समा जाए, हर दर्द में राहत का पता चल जाए, दिल से दिल की बात जुड जाए, सुफी की राहों में सुकून बिखर जाए.’

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमYavatmalयवतमाळ