शहरं
Join us  
Trending Stories
1
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
2
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
3
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
4
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
5
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
6
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
7
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
8
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
9
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
10
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
11
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
12
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
13
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
14
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
15
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
16
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
17
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
18
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
19
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
20
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं

गाळे फेरलिलावाचा मार्ग सुकर

By admin | Updated: May 21, 2015 00:12 IST

शहरातील गांधी चौक व भाजी मंडीतील दुकान गाळे नगरपरिषदेने ताब्यात घेऊन त्यांचा फेरलिलाव करण्याचा आदेश ...

फेरयाचिका फेटाळली : नगरपरिषदेची दुकाने ५७ वर्षांपासून केली काबीजवणी : शहरातील गांधी चौक व भाजी मंडीतील दुकान गाळे नगरपरिषदेने ताब्यात घेऊन त्यांचा फेरलिलाव करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी ६ नोव्हेंबर २०१४ रोजी दिला होता. या निर्णयावर पुनर्विचार करण्यात यावा, असा अर्ज नंदकिशोर खत्री व सुभाष गील्डा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी अर्जदार व गैरअर्जदार दोघांचेही बयाण घेतले आणि खत्री व गेल्डा यांची पुनर्विचार याचिका १८ मे २०१५ च्या आदेशान्वये खारीज केली. ६ नोव्हेंबर २०१४ चा आदेश कायम ठेवत या प्रकरणामध्ये ३ डिसेंबर २०१२ च्या आदेशान्वये दिलेला ‘स्टे‘ रद्द केला. त्यामुळे आता गांधी चौकातील दुकान गाळे खाली करून फेरलिलाव करण्याचा नगरपरिषदेचा मार्ग मोकळा झाला आहे.वणी नगरपरिषदेने तब्बल ५७ वर्षांपूर्वी शिट क्रमांक १९ अ, १९ ब आणि १९ सी मधील जागेवर दुकान काळे बांधून लिलाव केला होता. तेव्हापासून गाळ्यांच्या भाड्यात कोणतीही वाढ न केल्याने गाळ्यांपासूनचे उत्पन्न कमी व देखभाल खर्च अधिक, अशी स्थिती सुरू आहे. त्यामुळे नगरपरिषदेचे स्विकृत सदस्य पांडुरंग टोंगे यांनी हे सर्व गाळे फेरलिलाव करण्याची मागणी केली. त्यावर नगरपरिषदेने १७ नोव्हेंबर २०१३ ला विशेष सर्वसाधारण सभेत तसा ठराव पारित केला. त्यासाठी आर्थिक तरतुदही मंजूर केली. परंतु मुख्याधिकाऱ्यांनी यावर कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे टोंगे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली. सदर्हू याचिकेमध्ये १६ मार्च २०१४ रोजी उच्च न्यायालयाने आदेश पारित करून अर्जदारास १५ दिवसांचे आत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करावे व जिल्हाधिकारी यांनी सहा आठवड्यात त्यावर निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले. त्यानुसार टोंगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी ६ नोव्हेंबर २०१४ रोजी निकाल देऊन १६० गाळे संबंधित गाळेधारकांकडून खाली करण्यात यावे व नगररचना विभागाकडून आवश्यक मूल्यांकन काढून संपूर्ण गाळ्यांचा जाहीर हर्रास करावा, असा आदेश पारित केला. त्यावर खत्री व गेल्डा यांनी महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम ३२० अंतर्गत पुनर्विचार अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केला होता. त्यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या ६ नोव्हेंबरच्या आदेशाला ‘स्टे’ देऊन प्रकरण सुनावणीसाठी ठेवले. दोन्ही बाजूचा जबाब घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तो ‘स्टे’ रद्द करून खत्री व गेल्डा यांची याचिका आता खारीज केली आहे.गांधी चौकातील गाळे ५७ वर्षांपूर्वी ज्यांनी हर्रास घेतले, त्यापैकी बहुतांश गाळेधारक आता हयात नाही. अनेकांनी गाळे परस्पर विकूनही टाकले. बहुतांश गाळेधारकांनी नगरपरिषदेची कोणतीही परवानगी न घेता गाळ्यांमध्ये वाढीव बांधकाम केले. त्यावर दुसरा मजला चढविला. गाळ्यांमध्ये बदल करावयावा असेल, तर २/३ बहुमताने नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेने ठराव घेणे आवश्यक आहे. (स्थानिक प्रतिनिधी)गाळेधारकांनी वाढीव भाडेही भरले नाहीगेल्या २९ आॅगस्ट २०१२ रोजीच्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत गाळ्यांच्या भाड्यामध्ये तिनपट वाढ करण्यात आली होती. ते सुध्दा गाळेधारकांनी भरले नाही. परिणामी नगरपरिषदेचे दरवर्षी कोट्यवधी रूपयांचे नुकसान होत आहे. गांधी चौक हा वणी शहराचा आत्मा आहे. शहराच्या इतर भागातील गाळ्यांपासून प्रत्येकी २० लाख रूपयापर्यंतची अनामत व वार्षिक भाडे दोन हजारापर्यंत मिळत आहे. त्यामुळे गांधी चौक व भाजी मंडीतील गाळ्यांपासून किती अनामत रक्कम व भाडे मिळेल, याची कल्पनाच न केलेली बरी. आता नगरपरिषद या आदेशावरून काय कारवाई करते, याकडे वणीकरांचे लक्ष लागले आहे. गाळेधारकांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. या निर्णयावर आयुक्तांनी स्टे दिल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात येत आहे.