शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

‘मजीप्रा’चे काम ढेपाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 21:29 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात आधीच कर्मचाऱ्यांची वानवा आहे. दैनंदिन कामकाज ढेपाळलेले असताना एकाचवेळी सात ते आठ कर्मचाऱ्यांना रजा दिली जाते. यामुळे संपूर्ण कामकाज प्रभावित झाले आहे. वसुलीसाठी अधिकारी वर्ग गल्लीबोळात फिरत आहे. वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याने कर्मचाºयांची मनमानी सुरू असल्याचे सांगितले जाते.

ठळक मुद्देअधिकारी वसुलीवर : एकाचवेळी आठ कर्मचाऱ्यांना रजा मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात आधीच कर्मचाऱ्यांची वानवा आहे. दैनंदिन कामकाज ढेपाळलेले असताना एकाचवेळी सात ते आठ कर्मचाऱ्यांना रजा दिली जाते. यामुळे संपूर्ण कामकाज प्रभावित झाले आहे. वसुलीसाठी अधिकारी वर्ग गल्लीबोळात फिरत आहे. वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याने कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू असल्याचे सांगितले जाते.कर्मचारी नसल्याने कामे ठप्प पडल्याची ओरड या विभागाकडून केली जाते. अभियंत्यांपासून ते शिपायापर्यंतची अनेक पदे या विभागात रिक्त आहे. २० ते २२ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या भरवशावर काम ढकलले जात आहे. शहरात अनेक ठिकाणी असलेले लिकेज दिवसच नव्हे तर कित्येक महिने काढले जात नाही. यातून पाणी धो-धो वाहते. नळ जोडण्या देण्यात आलेल्या ग्राहकांना १२ महिने ते दोन वर्षपर्यंत देयक पाठविले जात नाही. एकाचवेळी दोन ते तीन हजारांचे बिल त्यांच्या माथी मारले जाते. त्यातही व्याज घेण्यात येते.सध्या प्राधिकरणाचे कोट्यवधी रुपये ग्राहकांकडे थकीत आहे. मार्च महिना तोंडावर असल्याने वसुलीसाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चमू घरोघरी फिरत आहे. त्यांना ‘टार्गेट’ देण्यात आले आहे. ही सर्व धावपळ सुरू असताना तब्बल सात ते आठ कर्मचारी एकाचवेळी रजेवर गेले आहेत. शनिवार-रविवारच्या सुट्यानंतरही सोमवार आणि मंगळवारीही सदर कर्मचारी कार्यालयात हजर झालेले नव्हते. एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडण्याची परवानगी कशी देण्यात आली, हा प्रश्न आहे. येथील कार्यकारी अभियंता सोमवारी आणि मंगळवारी अकोल्याचा कारभार सांभाळतात. उर्वरित दिवस यवतमाळ येथे असतात. हीच संधी साधून कर्मचारी सुटीवर गेल्याचे सांगितले जाते. मात्र यापासून अधिकारी अनभिज्ञ कसे हा प्रश्न आहे. मात्र या सर्व प्रकारात कामकाजावर परिणाम होत आहे.लोकांचे प्रश्न अधांतरीमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणात आपल्या समस्या घेऊन जाणाऱ्या नागरिकांना कुठलाही अधिकारी उपलब्ध होत नाही. मंगळवारी कार्यकारी अभियंता नव्हते. उपविभागीय अभियंता आणि शाखा अभियंता वसुलीवर असल्याचे सांगण्यात आले. इतर कर्मचारी गप्पांमध्ये रंगले होते. अशावेळी समस्या मांडायच्या कुणाकडे हा प्रश्न नागरिकांपुढे निर्माण झाला आहे.