शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

‘मजीप्रा’चे काम ढेपाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 21:29 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात आधीच कर्मचाऱ्यांची वानवा आहे. दैनंदिन कामकाज ढेपाळलेले असताना एकाचवेळी सात ते आठ कर्मचाऱ्यांना रजा दिली जाते. यामुळे संपूर्ण कामकाज प्रभावित झाले आहे. वसुलीसाठी अधिकारी वर्ग गल्लीबोळात फिरत आहे. वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याने कर्मचाºयांची मनमानी सुरू असल्याचे सांगितले जाते.

ठळक मुद्देअधिकारी वसुलीवर : एकाचवेळी आठ कर्मचाऱ्यांना रजा मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात आधीच कर्मचाऱ्यांची वानवा आहे. दैनंदिन कामकाज ढेपाळलेले असताना एकाचवेळी सात ते आठ कर्मचाऱ्यांना रजा दिली जाते. यामुळे संपूर्ण कामकाज प्रभावित झाले आहे. वसुलीसाठी अधिकारी वर्ग गल्लीबोळात फिरत आहे. वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याने कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू असल्याचे सांगितले जाते.कर्मचारी नसल्याने कामे ठप्प पडल्याची ओरड या विभागाकडून केली जाते. अभियंत्यांपासून ते शिपायापर्यंतची अनेक पदे या विभागात रिक्त आहे. २० ते २२ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या भरवशावर काम ढकलले जात आहे. शहरात अनेक ठिकाणी असलेले लिकेज दिवसच नव्हे तर कित्येक महिने काढले जात नाही. यातून पाणी धो-धो वाहते. नळ जोडण्या देण्यात आलेल्या ग्राहकांना १२ महिने ते दोन वर्षपर्यंत देयक पाठविले जात नाही. एकाचवेळी दोन ते तीन हजारांचे बिल त्यांच्या माथी मारले जाते. त्यातही व्याज घेण्यात येते.सध्या प्राधिकरणाचे कोट्यवधी रुपये ग्राहकांकडे थकीत आहे. मार्च महिना तोंडावर असल्याने वसुलीसाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चमू घरोघरी फिरत आहे. त्यांना ‘टार्गेट’ देण्यात आले आहे. ही सर्व धावपळ सुरू असताना तब्बल सात ते आठ कर्मचारी एकाचवेळी रजेवर गेले आहेत. शनिवार-रविवारच्या सुट्यानंतरही सोमवार आणि मंगळवारीही सदर कर्मचारी कार्यालयात हजर झालेले नव्हते. एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडण्याची परवानगी कशी देण्यात आली, हा प्रश्न आहे. येथील कार्यकारी अभियंता सोमवारी आणि मंगळवारी अकोल्याचा कारभार सांभाळतात. उर्वरित दिवस यवतमाळ येथे असतात. हीच संधी साधून कर्मचारी सुटीवर गेल्याचे सांगितले जाते. मात्र यापासून अधिकारी अनभिज्ञ कसे हा प्रश्न आहे. मात्र या सर्व प्रकारात कामकाजावर परिणाम होत आहे.लोकांचे प्रश्न अधांतरीमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणात आपल्या समस्या घेऊन जाणाऱ्या नागरिकांना कुठलाही अधिकारी उपलब्ध होत नाही. मंगळवारी कार्यकारी अभियंता नव्हते. उपविभागीय अभियंता आणि शाखा अभियंता वसुलीवर असल्याचे सांगण्यात आले. इतर कर्मचारी गप्पांमध्ये रंगले होते. अशावेळी समस्या मांडायच्या कुणाकडे हा प्रश्न नागरिकांपुढे निर्माण झाला आहे.