शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

‘मजीप्रा’चे काम ढेपाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 21:29 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात आधीच कर्मचाऱ्यांची वानवा आहे. दैनंदिन कामकाज ढेपाळलेले असताना एकाचवेळी सात ते आठ कर्मचाऱ्यांना रजा दिली जाते. यामुळे संपूर्ण कामकाज प्रभावित झाले आहे. वसुलीसाठी अधिकारी वर्ग गल्लीबोळात फिरत आहे. वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याने कर्मचाºयांची मनमानी सुरू असल्याचे सांगितले जाते.

ठळक मुद्देअधिकारी वसुलीवर : एकाचवेळी आठ कर्मचाऱ्यांना रजा मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात आधीच कर्मचाऱ्यांची वानवा आहे. दैनंदिन कामकाज ढेपाळलेले असताना एकाचवेळी सात ते आठ कर्मचाऱ्यांना रजा दिली जाते. यामुळे संपूर्ण कामकाज प्रभावित झाले आहे. वसुलीसाठी अधिकारी वर्ग गल्लीबोळात फिरत आहे. वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याने कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू असल्याचे सांगितले जाते.कर्मचारी नसल्याने कामे ठप्प पडल्याची ओरड या विभागाकडून केली जाते. अभियंत्यांपासून ते शिपायापर्यंतची अनेक पदे या विभागात रिक्त आहे. २० ते २२ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या भरवशावर काम ढकलले जात आहे. शहरात अनेक ठिकाणी असलेले लिकेज दिवसच नव्हे तर कित्येक महिने काढले जात नाही. यातून पाणी धो-धो वाहते. नळ जोडण्या देण्यात आलेल्या ग्राहकांना १२ महिने ते दोन वर्षपर्यंत देयक पाठविले जात नाही. एकाचवेळी दोन ते तीन हजारांचे बिल त्यांच्या माथी मारले जाते. त्यातही व्याज घेण्यात येते.सध्या प्राधिकरणाचे कोट्यवधी रुपये ग्राहकांकडे थकीत आहे. मार्च महिना तोंडावर असल्याने वसुलीसाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चमू घरोघरी फिरत आहे. त्यांना ‘टार्गेट’ देण्यात आले आहे. ही सर्व धावपळ सुरू असताना तब्बल सात ते आठ कर्मचारी एकाचवेळी रजेवर गेले आहेत. शनिवार-रविवारच्या सुट्यानंतरही सोमवार आणि मंगळवारीही सदर कर्मचारी कार्यालयात हजर झालेले नव्हते. एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडण्याची परवानगी कशी देण्यात आली, हा प्रश्न आहे. येथील कार्यकारी अभियंता सोमवारी आणि मंगळवारी अकोल्याचा कारभार सांभाळतात. उर्वरित दिवस यवतमाळ येथे असतात. हीच संधी साधून कर्मचारी सुटीवर गेल्याचे सांगितले जाते. मात्र यापासून अधिकारी अनभिज्ञ कसे हा प्रश्न आहे. मात्र या सर्व प्रकारात कामकाजावर परिणाम होत आहे.लोकांचे प्रश्न अधांतरीमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणात आपल्या समस्या घेऊन जाणाऱ्या नागरिकांना कुठलाही अधिकारी उपलब्ध होत नाही. मंगळवारी कार्यकारी अभियंता नव्हते. उपविभागीय अभियंता आणि शाखा अभियंता वसुलीवर असल्याचे सांगण्यात आले. इतर कर्मचारी गप्पांमध्ये रंगले होते. अशावेळी समस्या मांडायच्या कुणाकडे हा प्रश्न नागरिकांपुढे निर्माण झाला आहे.