शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

‘मजीप्रा’ने सोडले २७ लाखांवर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 06:00 IST

‘अमृत’ योजनेअंतर्गत यवतमाळ शहरासाठी बेंबळा प्रकल्पातून पाणी आणले जात आहे. ३०२ कोटी रुपयांच्या या योजनेची गाथा सर्वदूर पोहोचली आहे. करारानुसार ऑक्टोबर २०१९ पर्यंत काम पूर्ण करून प्राधिकरणाला योजना हस्तांतरित करायची आहे. याला अवघे दोन महिने शिल्लक आहे. प्रत्यक्षात ६० टक्केच्या आसपास काम झाले आहे.

ठळक मुद्देकंत्राटदारावर मेहेरबानी : दरमहा साडेचार लाखांच्या दंडाला स्थगिती!

विलास गावंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अमृत योजनेच्या कंत्राटदाराला ठोकण्यात आलेल्या दंडाच्या २७ लाख रुपयांवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाणी सोडले आहे. काम पूर्ण करून घ्यायचे आहे, असे कारण सांगत प्राधिकरणाने ही मेहेरबानी दाखविली आहे. एवढेच नाही तर, दंड झाल्यानंतर या कंत्राटदाराला कोट्यवधी रुपयांची बिलेही देण्यात आली.‘अमृत’ योजनेअंतर्गत यवतमाळ शहरासाठी बेंबळा प्रकल्पातून पाणी आणले जात आहे. ३०२ कोटी रुपयांच्या या योजनेची गाथा सर्वदूर पोहोचली आहे. करारानुसार ऑक्टोबर २०१९ पर्यंत काम पूर्ण करून प्राधिकरणाला योजना हस्तांतरित करायची आहे. याला अवघे दोन महिने शिल्लक आहे. प्रत्यक्षात ६० टक्केच्या आसपास काम झाले आहे. कामाची प्रगती नसल्याने प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांनी मे.पी.एम. आडके कंपनीला दरमहा चार लाख ६१ हजार ९९० रुपये दंड ठोकला. एप्रिल २०१९ पासून हा दंड लागू करण्यात आला.आता मात्र प्राधिकरणाने या दंडाला सप्टेंबर २०१९ पर्यंत स्थगिती दिली आहे. या कालावधीपर्यंत कामाची प्रगती पाहून दंडाविषयी विचार केला जाणार असल्याचे सांगितले जाते.तूर्तास तरी सहा महिन्याचे एकूण २७ लाख ७१ हजार ९४० रुपये सोडण्याची प्राधिकरणाची तयारी असल्याचे दिसून येते. कामापोटी २९ वे देयक आडके कंपनीला देण्यात आले आहे. आता ३० वे देयक पास होत आहे.‘सीएम’च्या हस्ते पाणी पाजण्याचे नियोजनविधानसभेची निवडणूक अगदी काही महिन्यावर आली आहे. बेंबळाचे पाणी निवडणुकीपूर्वी यवतमाळात आणता येईल, यासाठी आटापिटा सुरू आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यवतमाळला पाणी पाजण्याचा प्रयत्न आहे. सप्टेंबरपर्यंत किमान पाईपलाईन पूर्ण करून घ्यायची आहे. दंड आकारल्यास काम थांबेल आणि सप्टेंबरच्या प्रयत्नावर पाणी फेरले जाईल, अशी शक्यता पाहता तूर्तास दंडाला स्थगितीचा फंडा शोधून काढण्यात आला असल्याची चर्चा आहे.बेंबळाचे काम पूर्ण करून घ्यायचे आहे. कंत्राटदाराला दंड लावल्यास काम थांबेल. तूर्तास सप्टेंबरपर्यंत दंडास स्थगिती देण्यात आली आहे. कामाची प्रगती पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल.- सुरेश हुंगे, कार्यकारी अभियंता,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, यवतमाळसप्टेंबरपर्यंत काम शक्य, पण...महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अमरावतीत बसलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या योजनेच्या कामाची ‘प्रगती’ गेल्या आठवड्यात तपासली. पाईपलाईन सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे फर्मान त्यांनी सोडले. ही बाब शक्यही आहे, पण हायड्रोलिक टेस्टिंग न करता. सध्या केवळ अडीच किमीचे हे टेस्टिंग झाले आहे. पाईपलाईनचे काम केवळ तीन किमी शिल्लक राहिले आहे. येत्या दोन महिन्यात ते पूर्ण होईल. पण टेस्टिंग होणार नाही. यवतमाळात पाणी आणण्याची सोय या कालावधीत होईल. पाईपने पुन्हा आपला रंग दाखविला, कुठे लिकेज असल्यास ये रे माझ्या मागल्या, अशी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

टॅग्स :Bembla Damबेंबळा धरण