शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

‘मजीप्रा’ सर्वच आघाड्यांवर थंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 05:00 IST

निळोणा आणि चापडोह या दोन प्रकल्पातून यवतमाळ शहरवासीयांची तहान भागविली जाते. सुदैवाने या दोनही प्रकल्पामध्ये पुरेसे पाणी असल्याने शहरवासीयांची टंचाईतून मुक्तता झाली आहे. पण प्राधिकरणाच्या नियोजनशून्यतेमुळे कृत्रिम पाणीटंचाईचा झटका नागरिकांना बसत आहे. पाच दिवसाआड होणारा पाणीपुरवठा १२ दिवसांवर पोहोचला आहे.

ठळक मुद्देपाणीपुरवठा विस्कळीत : नवीन योजनांच्या कामांची गती संथ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यवतमाळ शहरात सर्वच आघाड्यांवर संथ आहे. अनियमित पाणीपुरवठा सुरू आहे. नवीन योजनांच्या कामांची कासवगती आहे.निळोणा आणि चापडोह या दोन प्रकल्पातून यवतमाळ शहरवासीयांची तहान भागविली जाते. सुदैवाने या दोनही प्रकल्पामध्ये पुरेसे पाणी असल्याने शहरवासीयांची टंचाईतून मुक्तता झाली आहे. पण प्राधिकरणाच्या नियोजनशून्यतेमुळे कृत्रिम पाणीटंचाईचा झटका नागरिकांना बसत आहे. पाच दिवसाआड होणारा पाणीपुरवठा १२ दिवसांवर पोहोचला आहे.यवतमाळ शहरासाठी अमृत योजनेंतर्गत बेंबळाचे पाणी आणण्याची सर्कस अजूनही सुरूच आहे. २९ एप्रिल २०१७ रोजी या कामाचा कार्यादेश झाला. २७ आॅक्टोबर २०१९ पर्यंत ही योजना पूर्ण करायची होती. ३०० कोटींची योजना पूर्ण होणे तर दूर अजूनही पाईपच्या टेस्टींगवरच आहे.बेंबळा प्रकल्प ते टाकळी फिल्टर प्लांटपर्यंत १८ किलोमीटर एक हजार मिमीचे पाईप टाकले गेले. परंतू सद्यस्थितीत केवळ १२ किलोमीटरचे टेस्टींग झाले आहे. सहा किलोमीटरसाठी दिवसं मोजावे लागत आहे. पाईप फुटले नसल्याचे समाधान प्राधिकरणाला आहे. मात्र फिटिंगमधील दोष काढताना नाकीनऊ येत आहे. टाकळी ते मजीप्रा कार्यालयापर्यंत आठ किलोमीटर पाईपलाईन टाकण्यात आली. या पाईपचेही टेस्टींग पूर्ण झालेले नाही. स्थानिक कंत्राटदारांकडून ही कामे करून घेतली जात आहे. अनुभवाची वाणवा त्यांच्याकडे आहे.भूमिगत गटार योजनेच्या कामाने यवतमाळ शहरातील काही भागांची दैना केली आहे. सुस्थितीतील आणि चकचकीत रस्ते फोडून काढले. इथपर्यंत ठीक आहे, पण गटार योजनेच्या कामाविषयी साशंकताच आहे. पाण्याचा अतिशय कमी वापर, वाहतुकीच्या रस्त्यापेक्षा खोल किंवा उथळ भागावर असलेले गडर अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहे. काही ठिकाणी तर चेंबर आतापासूनच फुटायला सुरुवात झाली आहे.योजनांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. लोकांचा त्रास कमी व्हावा यासाठी योजना हाती घेण्यात आल्या असल्या तरी त्या विद्यमान स्थितीत तरी डोकेदुखी ठरत आहे. योजनांना गती देण्याची गरज नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.रस्त्यांची वाट लागू नये म्हणजे झालेअमृत योजनेंतर्गत यवतमाळ शहरात पाईपचे जाळे विणण्यात आले. पाईपलाईन टाकलेल्या ठिकाणचे रस्ते गुळगुळीत झाले. मात्र पाईप लिकेज निघाल्यास या रस्त्यांवर पुन्हा भगदाड पडण्याची भीती आहे. नागरिकांच्या घरापर्यंत ११० एमएमचे पाईप अंथरले जात आहे. परंतु अजूनही काही भागात ते पोहोचले नाही. काही लोकांना जुन्या तर काहींना नवीन पाईपलाईनवरून पाणी पुरवठा होत आहे.लॉकडाऊननंतर बेंबळाच्या कामाला अधिक गती देवून लवकरच पंपिंग सुरू केले जाईल. भूमिगत गटार योजनेच्या कामात कुठलेही दोष नाही. सर्व कामे व्यवस्थित होत आहे.- सुरेश हुंगे, कार्यकारी अभियंता, मजीप्रा, यवतमाळ

टॅग्स :Waterपाणी