शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
3
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
4
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
5
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
6
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
7
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
8
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
9
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
10
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
11
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
12
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
13
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
14
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
15
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
16
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
17
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
18
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
19
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
20
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'

‘मजीप्रा’ सर्वच आघाड्यांवर थंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 05:00 IST

निळोणा आणि चापडोह या दोन प्रकल्पातून यवतमाळ शहरवासीयांची तहान भागविली जाते. सुदैवाने या दोनही प्रकल्पामध्ये पुरेसे पाणी असल्याने शहरवासीयांची टंचाईतून मुक्तता झाली आहे. पण प्राधिकरणाच्या नियोजनशून्यतेमुळे कृत्रिम पाणीटंचाईचा झटका नागरिकांना बसत आहे. पाच दिवसाआड होणारा पाणीपुरवठा १२ दिवसांवर पोहोचला आहे.

ठळक मुद्देपाणीपुरवठा विस्कळीत : नवीन योजनांच्या कामांची गती संथ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यवतमाळ शहरात सर्वच आघाड्यांवर संथ आहे. अनियमित पाणीपुरवठा सुरू आहे. नवीन योजनांच्या कामांची कासवगती आहे.निळोणा आणि चापडोह या दोन प्रकल्पातून यवतमाळ शहरवासीयांची तहान भागविली जाते. सुदैवाने या दोनही प्रकल्पामध्ये पुरेसे पाणी असल्याने शहरवासीयांची टंचाईतून मुक्तता झाली आहे. पण प्राधिकरणाच्या नियोजनशून्यतेमुळे कृत्रिम पाणीटंचाईचा झटका नागरिकांना बसत आहे. पाच दिवसाआड होणारा पाणीपुरवठा १२ दिवसांवर पोहोचला आहे.यवतमाळ शहरासाठी अमृत योजनेंतर्गत बेंबळाचे पाणी आणण्याची सर्कस अजूनही सुरूच आहे. २९ एप्रिल २०१७ रोजी या कामाचा कार्यादेश झाला. २७ आॅक्टोबर २०१९ पर्यंत ही योजना पूर्ण करायची होती. ३०० कोटींची योजना पूर्ण होणे तर दूर अजूनही पाईपच्या टेस्टींगवरच आहे.बेंबळा प्रकल्प ते टाकळी फिल्टर प्लांटपर्यंत १८ किलोमीटर एक हजार मिमीचे पाईप टाकले गेले. परंतू सद्यस्थितीत केवळ १२ किलोमीटरचे टेस्टींग झाले आहे. सहा किलोमीटरसाठी दिवसं मोजावे लागत आहे. पाईप फुटले नसल्याचे समाधान प्राधिकरणाला आहे. मात्र फिटिंगमधील दोष काढताना नाकीनऊ येत आहे. टाकळी ते मजीप्रा कार्यालयापर्यंत आठ किलोमीटर पाईपलाईन टाकण्यात आली. या पाईपचेही टेस्टींग पूर्ण झालेले नाही. स्थानिक कंत्राटदारांकडून ही कामे करून घेतली जात आहे. अनुभवाची वाणवा त्यांच्याकडे आहे.भूमिगत गटार योजनेच्या कामाने यवतमाळ शहरातील काही भागांची दैना केली आहे. सुस्थितीतील आणि चकचकीत रस्ते फोडून काढले. इथपर्यंत ठीक आहे, पण गटार योजनेच्या कामाविषयी साशंकताच आहे. पाण्याचा अतिशय कमी वापर, वाहतुकीच्या रस्त्यापेक्षा खोल किंवा उथळ भागावर असलेले गडर अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहे. काही ठिकाणी तर चेंबर आतापासूनच फुटायला सुरुवात झाली आहे.योजनांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. लोकांचा त्रास कमी व्हावा यासाठी योजना हाती घेण्यात आल्या असल्या तरी त्या विद्यमान स्थितीत तरी डोकेदुखी ठरत आहे. योजनांना गती देण्याची गरज नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.रस्त्यांची वाट लागू नये म्हणजे झालेअमृत योजनेंतर्गत यवतमाळ शहरात पाईपचे जाळे विणण्यात आले. पाईपलाईन टाकलेल्या ठिकाणचे रस्ते गुळगुळीत झाले. मात्र पाईप लिकेज निघाल्यास या रस्त्यांवर पुन्हा भगदाड पडण्याची भीती आहे. नागरिकांच्या घरापर्यंत ११० एमएमचे पाईप अंथरले जात आहे. परंतु अजूनही काही भागात ते पोहोचले नाही. काही लोकांना जुन्या तर काहींना नवीन पाईपलाईनवरून पाणी पुरवठा होत आहे.लॉकडाऊननंतर बेंबळाच्या कामाला अधिक गती देवून लवकरच पंपिंग सुरू केले जाईल. भूमिगत गटार योजनेच्या कामात कुठलेही दोष नाही. सर्व कामे व्यवस्थित होत आहे.- सुरेश हुंगे, कार्यकारी अभियंता, मजीप्रा, यवतमाळ

टॅग्स :Waterपाणी