शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

माहूरमध्ये केंद्राच्या निधीअभावी घरकूल योजना रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 05:00 IST

नव्याने घरकूल मंजूर झालेले लाभार्थी ही योजना फसवी असल्याचे याेजनेकडे पाठ फिरविताना दिसत आहेत.  शहरी भागात प्रत्येक लाभार्थ्याला अडीच लाख रुपये अनुदान दिले जाते. त्यात केंद्र शासनाचे दीड लाख, तर राज्य शासनाचे एक लाखाचे अनुदान असते.  येथे आजपर्यंत ८४७ घरकुलांना मंजुरी मिळाली. त्यासाठी राज्य शासनाकडून १८ लाख ८८ हजार, तर केंद्र शासनाकडून ४० लाख ८० हजारांचा निधी मिळाला.

ठळक मुद्देपावसाळ्याच्या तोंडावर लाभार्थी अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कमाहूर : सर्वांसाठी घरे, या संकल्पनेतून पंतप्रधान आवास योजना राबविण्यात आली. मात्र, एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटूनही लाभार्थ्यांना अद्याप निम्मे हप्ते न मिळाल्याने त्यांची घरे अर्धवट राहिली आहे. केंद्राच्या निधी अभावी योजना रखडली आहे.नव्याने घरकूल मंजूर झालेले लाभार्थी ही योजना फसवी असल्याचे याेजनेकडे पाठ फिरविताना दिसत आहेत.  शहरी भागात प्रत्येक लाभार्थ्याला अडीच लाख रुपये अनुदान दिले जाते. त्यात केंद्र शासनाचे दीड लाख, तर राज्य शासनाचे एक लाखाचे अनुदान असते.  येथे आजपर्यंत ८४७ घरकुलांना मंजुरी मिळाली. त्यासाठी राज्य शासनाकडून १८ लाख ८८ हजार, तर केंद्र शासनाकडून ४० लाख ८० हजारांचा निधी मिळाला.कोरोनाच्या प्रादुर्भावात लाभार्थी आर्थिक संकटात सापडले असताना अनेकांनी गाठीशी असलेला पैसा खर्च करुन घराची कामे पूर्ण केली. पैशाअभावी काहींची कामे अर्धवट राहिली. आज ना उद्या घरकुलाचे हप्ते मिळतील, अशी लाभार्थ्यांना अपेक्षा होती. मात्र, वर्ष निघून गेले पण हप्ता मिळाला नाही. बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही १०० टक्के अनुदान मिळाले नाही. काहीचे हप्ते न मिळाल्याने  बांधकाम थांबले आहे. एकीकडे घर बांधकामाची चिंता आणि दुसरीकडे घर भाड्याचा भार, यामुळे लाभार्थी  आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. नगरपंचायतकडे विचारणा केल्यावर केंद्राचा निधी आला नसल्याचे उत्तर मिळत असल्याने नागरिकांत तीव्र रोष व्यक्त होत आहे.शहरात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ८४७ घरकुलांना मंजुरी मिळाली. पहिल्या टप्प्यात ८२ घरकुलांना मंजुरी मिळाली होती. त्यापैकी ६८ लाभार्थ्यांना राज्य सरकारकडून प्राप्त होणारे ४० हजारांप्रमाणे दोन हप्ते व केंद्र सरकारकडून प्राप्त निधीतून ६० हजारांचा एक हप्ता, असे १ लाख ४० हजार रुपये तीन टप्प्यात मिळाले. दुसऱ्या टप्प्यात मंजूर झालेल्या २६५ लाभार्थ्यांपैकी १६८ लाभार्थ्यांना राज्य सरकारचे दोन हप्ते प्राप्त झाले. मात्र, केंद्राचा निधी मिळाला नाही. तिसऱ्या टप्प्यात मंजूर ५०० लाभार्थ्यांना अद्याप एकही हप्ता मिळाला नाही. 

सहा टप्प्यात मिळतोय अडीच लाखांचा निधीयोजनेंतर्गत केंद्र शासन व राज्य शासन मिळून २ लाख ५० हजार रुपये लाभार्थ्यांना दिले जातात. त्यात राज्य शासनाकडून मिळणाऱ्या १ लाख रुपयातून पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात प्रत्येकी ४० टक्के, तिसऱ्या टप्प्यात २० टक्के रक्कम दिली जाते. केंद्र शासनाच्या दीड लाखातून पहिल्या टप्प्यात ६०, दुसऱ्या २० तर तिसऱ्या टप्प्यात २० टक्के निधी दिला जातो. अशा सहा टप्प्यात निधी वितरित केला जातो.

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना