शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

माहूरमध्ये केंद्राच्या निधीअभावी घरकूल योजना रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 05:00 IST

नव्याने घरकूल मंजूर झालेले लाभार्थी ही योजना फसवी असल्याचे याेजनेकडे पाठ फिरविताना दिसत आहेत.  शहरी भागात प्रत्येक लाभार्थ्याला अडीच लाख रुपये अनुदान दिले जाते. त्यात केंद्र शासनाचे दीड लाख, तर राज्य शासनाचे एक लाखाचे अनुदान असते.  येथे आजपर्यंत ८४७ घरकुलांना मंजुरी मिळाली. त्यासाठी राज्य शासनाकडून १८ लाख ८८ हजार, तर केंद्र शासनाकडून ४० लाख ८० हजारांचा निधी मिळाला.

ठळक मुद्देपावसाळ्याच्या तोंडावर लाभार्थी अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कमाहूर : सर्वांसाठी घरे, या संकल्पनेतून पंतप्रधान आवास योजना राबविण्यात आली. मात्र, एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटूनही लाभार्थ्यांना अद्याप निम्मे हप्ते न मिळाल्याने त्यांची घरे अर्धवट राहिली आहे. केंद्राच्या निधी अभावी योजना रखडली आहे.नव्याने घरकूल मंजूर झालेले लाभार्थी ही योजना फसवी असल्याचे याेजनेकडे पाठ फिरविताना दिसत आहेत.  शहरी भागात प्रत्येक लाभार्थ्याला अडीच लाख रुपये अनुदान दिले जाते. त्यात केंद्र शासनाचे दीड लाख, तर राज्य शासनाचे एक लाखाचे अनुदान असते.  येथे आजपर्यंत ८४७ घरकुलांना मंजुरी मिळाली. त्यासाठी राज्य शासनाकडून १८ लाख ८८ हजार, तर केंद्र शासनाकडून ४० लाख ८० हजारांचा निधी मिळाला.कोरोनाच्या प्रादुर्भावात लाभार्थी आर्थिक संकटात सापडले असताना अनेकांनी गाठीशी असलेला पैसा खर्च करुन घराची कामे पूर्ण केली. पैशाअभावी काहींची कामे अर्धवट राहिली. आज ना उद्या घरकुलाचे हप्ते मिळतील, अशी लाभार्थ्यांना अपेक्षा होती. मात्र, वर्ष निघून गेले पण हप्ता मिळाला नाही. बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही १०० टक्के अनुदान मिळाले नाही. काहीचे हप्ते न मिळाल्याने  बांधकाम थांबले आहे. एकीकडे घर बांधकामाची चिंता आणि दुसरीकडे घर भाड्याचा भार, यामुळे लाभार्थी  आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. नगरपंचायतकडे विचारणा केल्यावर केंद्राचा निधी आला नसल्याचे उत्तर मिळत असल्याने नागरिकांत तीव्र रोष व्यक्त होत आहे.शहरात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ८४७ घरकुलांना मंजुरी मिळाली. पहिल्या टप्प्यात ८२ घरकुलांना मंजुरी मिळाली होती. त्यापैकी ६८ लाभार्थ्यांना राज्य सरकारकडून प्राप्त होणारे ४० हजारांप्रमाणे दोन हप्ते व केंद्र सरकारकडून प्राप्त निधीतून ६० हजारांचा एक हप्ता, असे १ लाख ४० हजार रुपये तीन टप्प्यात मिळाले. दुसऱ्या टप्प्यात मंजूर झालेल्या २६५ लाभार्थ्यांपैकी १६८ लाभार्थ्यांना राज्य सरकारचे दोन हप्ते प्राप्त झाले. मात्र, केंद्राचा निधी मिळाला नाही. तिसऱ्या टप्प्यात मंजूर ५०० लाभार्थ्यांना अद्याप एकही हप्ता मिळाला नाही. 

सहा टप्प्यात मिळतोय अडीच लाखांचा निधीयोजनेंतर्गत केंद्र शासन व राज्य शासन मिळून २ लाख ५० हजार रुपये लाभार्थ्यांना दिले जातात. त्यात राज्य शासनाकडून मिळणाऱ्या १ लाख रुपयातून पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात प्रत्येकी ४० टक्के, तिसऱ्या टप्प्यात २० टक्के रक्कम दिली जाते. केंद्र शासनाच्या दीड लाखातून पहिल्या टप्प्यात ६०, दुसऱ्या २० तर तिसऱ्या टप्प्यात २० टक्के निधी दिला जातो. अशा सहा टप्प्यात निधी वितरित केला जातो.

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना