शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

इस्रोमध्ये चमकली महाराष्ट्रकन्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 17:19 IST

इस्रोने (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) देशभरातील विद्यार्थ्यांसाठी ‘सायबर स्पेस कॉम्पीटीशन’ आयोजित केली होती. इस्रोने दोन हजार २९८ गुणवंत विद्यार्थ्यांची निवड केली. त्यात महाराष्ट्रातील १५६ स्पर्धकांचा समावेश असून त्यात निम्म्याहून अधिक म्हणजे ८१ मुली आहेत, हे विशेष.

ठळक मुद्देसायबर स्पेस स्पर्धांमध्ये दाखविली विचारांची प्रगल्भता

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्राच्या मातीत विचारांची ताकद आणि भवितव्याचा वेध घेण्याची क्षमता ठासून भरली आहे. त्याचाच वारसा सांभाळत येथील गुणवंत विद्यार्थिनींनी चक्क इस्रोच्या स्पर्धेत देशभरातील विद्यार्थ्यांना मागे टाकत प्रगल्भ बुद्धिमत्तेचा परिचय दिला.पुढच्या दोन दशकात अंतराळात कोणती आव्हाने येतील, असा प्रश्न उपस्थित करत इस्रोने (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) देशभरातील विद्यार्थ्यांसाठी ‘सायबर स्पेस कॉम्पीटीशन’ आयोजित केली होती. जुलैमध्ये झालेल्या या स्पर्धांचा निकाल निकाल शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला.

विविध राज्यातील लाखो सहभागी विद्यार्थ्यांपैकी पाच गटातून इस्रोने दोन हजार २९८ गुणवंत विद्यार्थ्यांची निवड केली. त्यात महाराष्ट्रातील १५६ स्पर्धकांचा समावेश असून त्यात निम्म्याहून अधिक म्हणजे ८१ मुली आहेत, हे विशेष. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, मुंबई-पुण्यासह चक्क पाटणबोरी, यवतमाळ, अकोला, तुकूम चंद्रपूरसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी या संशोधनात्मक स्पर्धेत यशश्री पटकावली.यवतमाळातील तिघांची भरारीइस्रोने नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध, क्विझ स्पर्धा घेतली. यात यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी येथील रेड्डी कॉन्व्हेन्टची गौरी सुरेश रेड्डी, यवतमाळ येथील अ‍ॅग्लो हिंदी ज्युनिअर कॉलेजची श्रावणी संजय देशपांडे व नंदूरकर विद्यालयाचा देवांश गोपाल कदम या तिघांची उत्तम स्पर्धक म्हणून निवड करण्यात आली. अंतराळातील प्रदूषण, तेथील संशोधन, भविष्यातील संधी आदी विषयांवर त्यांनी विचार मांडले.यापूर्वी अंतराळ मोहिमांमध्ये देशा-देशात स्पर्धा होती. परंतु पुढच्या दोन दशकात खासगी कंपन्यांमध्ये अंतराळ मोहिमांची स्पर्धा दिसणार आहे. तेथील मौल्यवान धातू आणि खनिजे मिळविण्यासाठी आतापासूनच कंपन्या सरसावल्या आहेत. त्यातून अंतराळातील प्रदूषण वाढीसोबतच तेथील पर्यटनाच्या आणि शेतीच्या संधी कमी होतील, हा धोका मी माझ्या निबंधात वर्तविला.- गौरी सुरेश रेड्डी, पाटणबोरी (विजयी विद्यार्थिनी)

टॅग्स :isroइस्रो