शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्याचे सेवानिवृत्तीनंतरचे लाभ रोखले; अधिकाऱ्यांच्या सदोष निर्णयाचा मजीप्राला लाखोंनी फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2022 13:37 IST

प्राधिकरणातून आरेखक पदावरून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याची सर्व देणी रोखण्यात आली होती. अंशदान, उपदान, जीपीएफ, जीआयएस आदी लाभ देण्यात आले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्याने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली.

ठळक मुद्दे सव्याज द्यावी लागली रक्कम

यवतमाळ : अधिकाऱ्यांनी घेतलेले काही निर्णय प्रशासनाला कसे महागात पडतात याचे उदाहरण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये पुढे आले आहे. कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीनंतरचे सर्व लाभ विलंबाने देण्यात आले. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानुसार या कर्मचाऱ्याला सव्याज रक्कम द्यावी लागली. याचा प्राधिकरणाला लाखो रुपयांनी फटका बसला. विशेष म्हणजे, या विभागात कर्मचाऱ्यांना लाभ देताना बराच वेळ लागतो, ही बाब नित्याची झाली आहे.

प्राधिकरणातून आरेखक पदावरून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याची सर्व देणी रोखण्यात आली होती. अंशदान, उपदान, जीपीएफ, जीआयएस आदी लाभ देण्यात आले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्याने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. न्यायालयाने सर्व लाभ सव्याज देण्यात यावे, असा आदेश दिला. परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या कर्मचाऱ्याला केवळ त्याच्या लाभाची रक्कम दिली, व्याज दिले नाही. व्याजाची रक्कम मिळाली नाही, हा मुद्दाही या कर्मचाऱ्याने न्यायालयाच्या निदर्शनास त्यांच्या वकिलामार्फत आणून दिला. त्यामुळे या आरेखक कर्मचाऱ्याला व्याजापोटी एक लाख आठ हजार ८८ रुपये द्यावे लागले. कार्यरत असताना जादा रक्कम दिली गेल्याचे कारण पुढे करून या कर्मचाऱ्याचे सेवानिवृत्तीनंतरचे लाभ रोखण्यात आले होते. हाच निर्णय चुकीचा ठरल्याने मजीप्राला या लाखो रुपयांचा भुर्दंड बसला.

अधिकाऱ्यांकडून पैसा वसूल करा

केवळ अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे प्राधिकरणाला एक लाख आठ हजार ८८ रुपयांचा भुर्दंड बसला आहे. यासाठी जबाबदार असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांकडून ही रक्कम वसूल करावी, ही मागणीही आता पुढे आली आहे. मजीप्राच्या सदस्य सचिवांना याबाबत सेवानिवृत्तांचा संघ पुणेच्यावतीने पत्र पाठविण्यात आले आहे. मजीप्राकडून कर्मचाऱ्यांना लाभ देताना दीर्घ कालावधी लावला जातो. अधिकाऱ्यांकडून ही रक्कम वसूल केल्यास विलंबाची प्रथा थांबेल, असे यामध्ये नमूद करण्यात आले आहे.

न्यायालयाच्या निर्णयामुळेच कर्मचाऱ्याला न्याय मिळाला आहे. अधिकाऱ्यांना ही चपराक आहे. भविष्यात असे प्रकार होऊ नये, यासाठी त्यांच्याकडून व्याजापोटी देण्यात आलेली रक्कम वसूल झाली पाहिजे.

- राजाराम विठाळकर, सरचिटणीस (विदर्भ), मजीप्रा सेवानिवृत्तांचा संघ

टॅग्स :GovernmentसरकारMaharahtra Jivan Pradhikaranमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणCourtन्यायालय