शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

Maharashtra Election 2019 ; राहुल गांधींच्या सभेला जनसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 06:00 IST

राहुल गांधी यांचे आगमन झाल्यावर तर ‘तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं’ असा घोष सुरू झाला. राहुल गांधी व्यासपीठावर येताच ही गर्दी तेवढ्यात उत्कंठेने त्यांचे भाषण ऐकण्यासाठी शांतही झाली. भाजपने मागील निवडणुकीत केलेल्या घोषणा पूर्ण झाल्या का, असा एकेक सवाल राहुल गांधी उपस्थित करीत गेले आणि समोरच्या गर्दीनेही ताडताड् त्या घोषणा अर्धवटच राहिल्याचे मान्य केले.

ठळक मुद्देवणीतील सभा : भाषण नव्हे, झाला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : ‘गांधी’ या नावाची जादू आजही भारतीयांच्या मनावर कायम आहे. याचाच प्रत्यय मंगळवारी वणीतील काँग्रेसच्या जाहीर सभेच्या निमित्ताने पुन्हा एकदा आला.गांधी घराण्यातील नव्या दमाचे नेतृत्व आणि काँग्रेसचे शिर्षस्थ नेते म्हणून राहुल गांधी मंगळवारी वणीत येणार हे कळताच, हजारो सर्वसामान्यांची पावले शासकीय मैदानाकडे वळली. वणीत येण्यासाठी राहुल गांधी दुपारी १२ वाजताच्या सुमारास नागपूर विमानतळावर पोहोचले. मात्र त्यांना ऐकण्याची उत्सुकता बाळगणाऱ्या हजारो नागरिकांनी वणीत सकाळी १० वाजतापासूनच गर्दी केली होती. दुपारी टळटळीत उन्हाने उकाडा वाढविला होता. पण लोक जागचे हलले नाही.गांधी नावाचे हे गारुड केवळ सामान्य मतदारांच्या मनावरच होते असे नव्हे, तर जिल्ह्यातील सारे काँग्रेस नेते, पदाधिकारी, कार्यकर्तेही या सभेसाठी आवर्जुन हजर झाले.राहुल गांधी यांचे आगमन झाल्यावर तर ‘तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं’ असा घोष सुरू झाला. राहुल गांधी व्यासपीठावर येताच ही गर्दी तेवढ्यात उत्कंठेने त्यांचे भाषण ऐकण्यासाठी शांतही झाली. भाजपने मागील निवडणुकीत केलेल्या घोषणा पूर्ण झाल्या का, असा एकेक सवाल राहुल गांधी उपस्थित करीत गेले आणि समोरच्या गर्दीनेही ताडताड् त्या घोषणा अर्धवटच राहिल्याचे मान्य केले. त्यामुळे राहुल गांधी यांचे जाहीर सभेतील हे भाषण एककल्ली न होता, तो परस्पर संवाद घडत गेला.वणी भागातील कोळसा खाणग्रस्तांच्या समस्यांचाही उहापोह त्यांनी केला. येथील शेतकरी आत्महत्या, आरोग्याच्या सुविधा, शिक्षणाची अवस्था याबाबतही पाच वर्षांत काय झाले, असा प्रश्न उपस्थित जनसमुदायाच्या काळजाला हात घातला. राहुल गांधींनी उपस्थित केलेले प्रश्न म्हणजे सर्वसामान्यांच्या दु:खावर फुंकर ठरली.

टॅग्स :yavatmal-acयवतमाळRahul Gandhiराहुल गांधी