शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

Maharashtra Election 2019 : राज्यात सक्षम विरोधी पक्षाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 05:00 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वणीतील शासकीय मैदानावर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी सभास्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. पाच वर्षांपूर्वी सत्ताधाऱ्यांनी दिलेली कोणतीही आश्वासने पूर्ण केली नसल्याचे सांगून आपल्या जाहिरनाम्यात भाजप, शिवसेनेने कोणकोणती वचने दिली होती, त्याचा पाढाच राज ठाकरे यांनी वाचला.

ठळक मुद्देराज ठाकरे : वणी येथे मनसे उमेदवारांसाठी पार पडली प्रचार सभा

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : देशात, राज्यात सत्ताधाऱ्यांची मनमानी सुरू असून ही मनमानी थांबविण्यासाठी राज्यात सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे. हा विरोधी पक्ष उभा करण्यासाठी मला साथ द्या, असे भावनिक आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी येथे केले.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वणीतील शासकीय मैदानावर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी सभास्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. पाच वर्षांपूर्वी सत्ताधाऱ्यांनी दिलेली कोणतीही आश्वासने पूर्ण केली नसल्याचे सांगून आपल्या जाहिरनाम्यात भाजप, शिवसेनेने कोणकोणती वचने दिली होती, त्याचा पाढाच राज ठाकरे यांनी वाचला. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी आज संकटात आहे. यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. ही बाब अभिमानाची नसल्याचेही त्यांनी सांगितले. आजही शेतकरी आत्महत्येच्या घटना घडतच असल्याचे ते म्हणाले. एका ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी एका शेतकऱ्याने ‘हे माझं सरकार’ असा मजकूर लिहून असलेलं टी शर्ट घालून आत्महत्या केली. काय चाललयं या राज्यात? असा सवाल करीत निवडणुकांना तुम्ही गंमत समजत असाल तर तुमचा आवाज असाच दाबला जाईल. त्यामुळे आजच जागे व्हा, असे आवाहनही ठाकरे यांनी उपस्थिताना केले.जोपर्यंत सक्षम विरोधी पक्ष तयार होणार नाही, तोपर्यंत सत्ताधाऱ्यांची मनमानी थांबणार नाही, असेही ते म्हणाले. त्यामुळेच मला एक सक्षम विरोधी पक्ष तयार करायचा आहे. त्यासाठी आता मला तुमची साथ हवी आहे. नोटबंदीमुळे देशात मंदी आली असून त्यामुळे विविध उद्योगातून कर्मचाºयांना काढून टाकले जात आहे. यापुढे ३० टक्के सरकारी कर्मचाऱ्यांनाही नोकरीवरून काढले जाणार आहे. त्यामुळे आजच सावध व्हा, असेही ठाकरे यांनी सांगितले. तत्पूर्वी मनसेच्या उमेदवारांचीही भाषणे झालीत. यावेळी व्यासपिठावर मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी, राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर, आनंद एंबडवार, ज्येष्ठ नेते विठ्ठल लोखंडकर, अनिल शिदोरे, वरोराचे रमेश राजूरकर, राजूराचे महालिंग कंठाळे प्रामुख्याने उपस्थित होते.

पोलिसांना पाणी द्यासत्तेवर येण्यापूर्वी पोलिसांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिले होते. सुटल्या का समस्या, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्न आजही कायम असल्याचे सांगून कायदा व सुव्यवस्था राखणाºया पोलीस बांधवाची देखील सत्ताधाऱ्यांनी प्रतारणा केली, असे ठाकरे म्हणाले. ठाकरे यांचे भाषण सुरू असताना मनसेचे काही कार्यकर्ते सभास्थळी पाण्याच्या बॉटल वितरीत करीत होते. नेमका हाच धागा पकडून ठाकरे यांनी पाण्याच्या बॉटल आधी पोलीस बांधवांना द्या, अशा सुचना कार्यकर्त्यांना केल्या, तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला.

टॅग्स :yavatmal-acयवतमाळ