शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 21:51 IST

मुळात माणसाने माणसाशी बोलणे हेच खूप आवश्यक आहे. त्यातही बोलताना मायबोलीचा अंगीकार केला तर दुधात साखरच. भाषा टिकली तर, आपण टिकू. नव्हे, भाषा टिकविणे ही आपलेच कर्तव्य आहे. ही जबाबदारी जाणूनच ‘लोकमत’ने ‘मराठीत बोला ना’ हे अत्यावश्यक अभियान सुरू केले आहे.

ठळक मुद्देआयएएस-आयपीएसची कृतज्ञता : ज्यांच्या समस्या सोडवायच्या, त्यांच्याशी संवाद झालाच पाहिजे

अविनाश साबापुरे। रूपेश उत्तरवारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्राची राजभाषा मराठी.. त्याहून महत्त्वाचे म्हणजे बहुतांश लोकांची तर मराठीच मायबोली. तरीही मराठी बोलता-बोलताच मध्येच इतर भाषांची उसनवारी करण्याची टूम निघाली आहे. पण जिल्ह्यात आलेल्या हिंदीभाषिक आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांनी मात्र आपली मूळ भाषा किंचित बाजूला ठेवत स्थानिक मराठी भाषा बोलण्यावर भर दिला आहे. एवढेच काय, तर मराठी बोलायला मिळणे हे आमचे भाग्य आहे, अशी कृतज्ञता त्यांच्या बोलण्यातून झळकते.गुरुवारी महाराष्ट्रात ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा होतोय. त्यानिमित्त मराठी मुलखात सेवा देणाऱ्या हिंदी भाषिक अधिकाऱ्यांशी साधलेला हा अस्सल मराठी संवाद... भारतीय प्रशासकीय सेवेत येण्याचा अर्थच हा की, भारताच्या कोणत्याही क्षेत्रात काम करण्याची तयारी. मग उत्तर प्रदेशातली व्यक्ती आंध्र प्रदेशात किंवा आंध्र प्रदेशातली व्यक्ती मध्य प्रदेशात जाऊ शकते. महाराष्ट्रात विशेषत: यवतमाळ जिल्ह्यात तर अनेक हिंदी भाषिक आयएएस अधिकारी येतात. सध्याही सेवारत आहेत. खुद्द जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, अपर पोलीस अधीक्षक नुरूल हसन हे अधिकारी परप्रांतीय हिंदीभाषिक आहेत. तरीही ते जाणीवपूर्वक आणि अभिमानाने मराठीतच बोलतात. निवेदने घेऊन येणाऱ्या सामान्य माणसांशी बोलताना त्यांचा मराठीचा लहेजा किंचित इकडे-तिकडे होत असेल कदाचित. पण मराठी माणसाशी मराठीतच बोलण्याचा त्यांचा आग्रह कायम असतो. ज्यांच्या समस्या सोडवायच्या आहेत, त्या माणसांची भाषा आपल्याला आलीच पाहिजे, हा आयएएस अधिकाऱ्यांचा कर्तव्यमंत्र आहे.मराठी भाषा दिनी, मराठी बोलीविषयी काय म्हणतात हे अधिकारी? वाचा त्यांच्याच शब्दात...मुळात माणसाने माणसाशी बोलणे हेच खूप आवश्यक आहे. त्यातही बोलताना मायबोलीचा अंगीकार केला तर दुधात साखरच. भाषा टिकली तर, आपण टिकू. नव्हे, भाषा टिकविणे ही आपलेच कर्तव्य आहे. ही जबाबदारी जाणूनच ‘लोकमत’ने ‘मराठीत बोला ना’ हे अत्यावश्यक अभियान सुरू केले आहे. सर्व स्तरातून त्याला प्रतिसादही मिळतोय. आज मराठी राजभाषा दिनी पुन्हा एकदा त्याची आपुलकीने आठवण करून देतोय.. ‘मराठीतच बोला ना’!मराठीचा गोडवा अनेकांना मराठीच्या प्रेमात पाडतो. मराठी भाषा समृद्ध आहे. मी मराठी पुस्तके वाचली आहे. मराठीला समृद्ध वारसा लाभला आहे. मी मराठीचा चाहता आहे.- एम.देवेंद्र सिंह, जिल्हाधिकारी, यवतमाळइंग्रजी इतकीच मराठी महत्वाची आहे. मराठीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. आपले विचार मातृभाषेतूनच समृद्ध होतात. मी २०१५ पासून मराठी शिकायला सुरुवात केली.- जलज शर्मा , सीईओ जिल्हा परिषद, यवतमाळमराठी ही माझी भाषा कधी झाली कळलेच नाही. २०१२ पासून मी मराठी शिकायला सुरुवात केली. आता मी अस्खलीत मराठी बोलतो. माझ्या घरातले वातावरण मराठीमय झाले. माझ्या मुलीही मराठी बोलतात.- एम. राज कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक, यवतमाळप्रशासनात चांगली पकड निर्माण करायची असेल तर मराठीवर प्रभूत्व निर्माण केले पाहिजे. मी मूळचा उत्तर भारतीय आहे. मला मराठीचा सार्थ अभिमान आहे. मी प्रत्येकांशी मराठीत बोलतो.- नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ.आज अनेक लोक बदलत्या काळानुसार स्वत:च्या मुलांना इंग्रजी शाळेत टाकत आहेत. यात काहीच वाद नाही. माणूस कुठेही असो पण आपल्या मातीशी आणि आपल्या भाषेशी जोडलेला असला पाहिजे.- भाग्यश्री विसपुते,सहा. जिल्हाधिकारी, पांढरकवडासमृद्ध मराठीचा वारसा चित्रपटांनी व्यापक केला आहे. मराठी समजून घेणे फार सोपे आहे. अन्य भाषांच्या तुलनेत मराठी व्यापक आहे. त्याचे साहित्य अन्य भाषेत न आल्याने व्यापकता इतरत्र पोहोचली नाही.- अनुराग जैन , सहा. पोलीस अधीक्षक, पुसद

टॅग्स :marathiमराठी