शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

फेब्रुवारीत १० वर्षातील सर्वात कमी तापमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 23:57 IST

आजपर्यंतच्या नोंदीमध्ये फेब्रुवारी महिन्याचे तापमान २० अंशाखाली घसरले नाही. २००९ ते २०१९ या कालखंडाचा अभ्यास केला तर फेब्रुवारीत जिल्ह्याचे तापमान २१ ते २५ अंश सेल्सीयसच्या आसपास असते. यावर्षी शनिवारी तापमानातील सर्व गोळाबेरीज मागे पडली. १० अंश सेल्सीयसपर्यंत तापमान खाली आले.

ठळक मुद्दे‘क्लायमेट चेंज’ने शेतीवर नुकसानीचे ढग : उष्ण आणि थंड वाऱ्यांच्या एकत्रीकरणाने गारांच्या पावसाची शक्यता

गत ५० वर्षात सर्वात मोठा थंडीचा मुक्काम जिल्ह्यात राहिला आहे. फेब्रुवारी महिना आला तरी थंडी हलायला तयार नाही. फेब्रुवारीतील तापमान २१ अंशाच्या वर आजपर्यंत राहिले आहे. मात्र यंदा गत १० वर्षातील सर्वात कमी तापमान फेबु्रवारीत शनिवारी नोंदविण्यात आले. जिल्ह्याचे तापमान १० अंश सेल्सीयसपर्यंत खाली आले आहे. मागील १० वर्षांच्या तुलनेत हे तापमान १० अंशाने घसरले आहे. ही उलथापालथ ‘क्लायमेट चेंज’चा मोठा फटका बसणार असे संकेत देणारी आहे. याचा पहिला वार कृषी अर्थव्यवस्थेवर होण्याचा धोका आहे.रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आजपर्यंतच्या नोंदीमध्ये फेब्रुवारी महिन्याचे तापमान २० अंशाखाली घसरले नाही. २००९ ते २०१९ या कालखंडाचा अभ्यास केला तर फेब्रुवारीत जिल्ह्याचे तापमान २१ ते २५ अंश सेल्सीयसच्या आसपास असते. यावर्षी शनिवारी तापमानातील सर्व गोळाबेरीज मागे पडली. १० अंश सेल्सीयसपर्यंत तापमान खाली आले. साधारणत: नोव्हेंबर महिन्यातील थंडीच्या बरोबरीचे हे तापमान आहे.उत्तरेकडील थंड वारे विदर्भापर्यंत पोहोचले आहेत. ते ताशी ३५ ते ४० किलोमिटर वेगाने वाहत आहे. विदर्भ हा उष्ण कटीबंधीय प्रदेश आहे. या भागात फेब्रुवारीत तापमान जास्त असते. मात्र थंडीची लाट या भागात धडकली आहे. यामुळे उष्ण आणि थंड वारे एकत्र आले आहे. या स्थितीत ढगाळी वातावरण तयार होऊन गारपीट होण्याचा धोका आहे. यामुळे काढणीला आलेल्या गहू, हरभरा पिकांना धोका होण्याची शक्यता आहे.अवेळी घसरलेल्या तापमानाचा फटका उन्हाळी लागवडीला बसला आहे. जानेवारी महिन्यात होणारी तिळ आणि भुर्ईमुगाची लागवड थंडीच्या मुक्कामाने लांबली आहे. फेब्रुवारी महिन्यात लागवड केली तर हे पीक पावसाळ्याच्या तोंडावर निघण्याची शक्यता आहे. मग मशागत कधी करायची आणि पुढील कामकाज कसे आटपायचे, हा पेच निर्माण होणार आहे.भुईमूग आणि तीळ लागवडीला १५ अंशापेक्षा जास्त तापमानाची गरज आहे. थंडीत बियाण्याची उगवण होत नाही. यामुळे हे दोनही क्षेत्र यावर्षी मोठ्या प्रमाणात घटण्याचा धोका आहे. ज्या शेतकºयांना तापमानाचा अभ्यास नाही, त्यांनी कालावधी संपत आहे म्हणून पेरणी केली तर थंडीने पीक उगवणार नाही. यासोबतच भाजीपाला व फुल पिकांचेही थंडीने काही प्रमाणात नकसान झाले आहे. या थंडीमुळे आजाराचे प्रमाण वाढले असून उन्हाळ्यात स्वेटर बाहेर काढण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. थंडीने चहाचा गल्लाही दुप्पट केला आहे. या थंडीने पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक पिकांचे उत्पन्न अर्ध्यावर आले आहे.निसर्गाच्या लहरीपणाचा हा परिणाम पुढील काळात वाढताच राहणार आहे. याकरिता प्रत्येकाने निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरण समृद्धीच्या दृष्टीने पावले उचलावी लागणार आहे. हाच यावरचा एकमेव उपाय आहे.- सुरेश चोपने, हवामान अभ्यासक, चंद्रपूर 

टॅग्स :Temperatureतापमान