शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

फेब्रुवारीत १० वर्षातील सर्वात कमी तापमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 23:57 IST

आजपर्यंतच्या नोंदीमध्ये फेब्रुवारी महिन्याचे तापमान २० अंशाखाली घसरले नाही. २००९ ते २०१९ या कालखंडाचा अभ्यास केला तर फेब्रुवारीत जिल्ह्याचे तापमान २१ ते २५ अंश सेल्सीयसच्या आसपास असते. यावर्षी शनिवारी तापमानातील सर्व गोळाबेरीज मागे पडली. १० अंश सेल्सीयसपर्यंत तापमान खाली आले.

ठळक मुद्दे‘क्लायमेट चेंज’ने शेतीवर नुकसानीचे ढग : उष्ण आणि थंड वाऱ्यांच्या एकत्रीकरणाने गारांच्या पावसाची शक्यता

गत ५० वर्षात सर्वात मोठा थंडीचा मुक्काम जिल्ह्यात राहिला आहे. फेब्रुवारी महिना आला तरी थंडी हलायला तयार नाही. फेब्रुवारीतील तापमान २१ अंशाच्या वर आजपर्यंत राहिले आहे. मात्र यंदा गत १० वर्षातील सर्वात कमी तापमान फेबु्रवारीत शनिवारी नोंदविण्यात आले. जिल्ह्याचे तापमान १० अंश सेल्सीयसपर्यंत खाली आले आहे. मागील १० वर्षांच्या तुलनेत हे तापमान १० अंशाने घसरले आहे. ही उलथापालथ ‘क्लायमेट चेंज’चा मोठा फटका बसणार असे संकेत देणारी आहे. याचा पहिला वार कृषी अर्थव्यवस्थेवर होण्याचा धोका आहे.रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आजपर्यंतच्या नोंदीमध्ये फेब्रुवारी महिन्याचे तापमान २० अंशाखाली घसरले नाही. २००९ ते २०१९ या कालखंडाचा अभ्यास केला तर फेब्रुवारीत जिल्ह्याचे तापमान २१ ते २५ अंश सेल्सीयसच्या आसपास असते. यावर्षी शनिवारी तापमानातील सर्व गोळाबेरीज मागे पडली. १० अंश सेल्सीयसपर्यंत तापमान खाली आले. साधारणत: नोव्हेंबर महिन्यातील थंडीच्या बरोबरीचे हे तापमान आहे.उत्तरेकडील थंड वारे विदर्भापर्यंत पोहोचले आहेत. ते ताशी ३५ ते ४० किलोमिटर वेगाने वाहत आहे. विदर्भ हा उष्ण कटीबंधीय प्रदेश आहे. या भागात फेब्रुवारीत तापमान जास्त असते. मात्र थंडीची लाट या भागात धडकली आहे. यामुळे उष्ण आणि थंड वारे एकत्र आले आहे. या स्थितीत ढगाळी वातावरण तयार होऊन गारपीट होण्याचा धोका आहे. यामुळे काढणीला आलेल्या गहू, हरभरा पिकांना धोका होण्याची शक्यता आहे.अवेळी घसरलेल्या तापमानाचा फटका उन्हाळी लागवडीला बसला आहे. जानेवारी महिन्यात होणारी तिळ आणि भुर्ईमुगाची लागवड थंडीच्या मुक्कामाने लांबली आहे. फेब्रुवारी महिन्यात लागवड केली तर हे पीक पावसाळ्याच्या तोंडावर निघण्याची शक्यता आहे. मग मशागत कधी करायची आणि पुढील कामकाज कसे आटपायचे, हा पेच निर्माण होणार आहे.भुईमूग आणि तीळ लागवडीला १५ अंशापेक्षा जास्त तापमानाची गरज आहे. थंडीत बियाण्याची उगवण होत नाही. यामुळे हे दोनही क्षेत्र यावर्षी मोठ्या प्रमाणात घटण्याचा धोका आहे. ज्या शेतकºयांना तापमानाचा अभ्यास नाही, त्यांनी कालावधी संपत आहे म्हणून पेरणी केली तर थंडीने पीक उगवणार नाही. यासोबतच भाजीपाला व फुल पिकांचेही थंडीने काही प्रमाणात नकसान झाले आहे. या थंडीमुळे आजाराचे प्रमाण वाढले असून उन्हाळ्यात स्वेटर बाहेर काढण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. थंडीने चहाचा गल्लाही दुप्पट केला आहे. या थंडीने पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक पिकांचे उत्पन्न अर्ध्यावर आले आहे.निसर्गाच्या लहरीपणाचा हा परिणाम पुढील काळात वाढताच राहणार आहे. याकरिता प्रत्येकाने निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरण समृद्धीच्या दृष्टीने पावले उचलावी लागणार आहे. हाच यावरचा एकमेव उपाय आहे.- सुरेश चोपने, हवामान अभ्यासक, चंद्रपूर 

टॅग्स :Temperatureतापमान