शहरं
Join us  
Trending Stories
1
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
2
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
3
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
4
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
5
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
7
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
8
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
9
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
10
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
11
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
12
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
14
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
15
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
16
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
17
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
18
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
19
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
20
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

वणीत व्यापाऱ्यांकडून तूर उत्पादकांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 22:22 IST

येथे खासगी व्यापाऱ्यांकडून तूर उत्पादकांची अक्षरश: लूट होत असून पाच हजार ६७५ रूपये हमी भाव असताना व्यापाऱ्यांकडून केवळ चार हजार ५०० ते चार हजार ८२५ रूपये प्रति क्विंटल दराने तुरीची खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.

ठळक मुद्देकमी भावाने खरेदी : उत्पादन ५० टक्क्यांनी घटले, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : येथे खासगी व्यापाऱ्यांकडून तूर उत्पादकांची अक्षरश: लूट होत असून पाच हजार ६७५ रूपये हमी भाव असताना व्यापाऱ्यांकडून केवळ चार हजार ५०० ते चार हजार ८२५ रूपये प्रति क्विंटल दराने तुरीची खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. असे असताना अद्याप नाफेडकडून तूर खरेदीसाठी कोणत्याही हालचाली दिसत नसल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने खासगी व्यापाºयांना तूर विक्री करावी लागत आहे.यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने शेती उत्पादनावर चांगलाच परिणाम झाला आहे. या परिसरात कापूस, सोयाबीन व तूर हे मुख्य पीक शेतकरी घेतात. मात्र अल्प पावसाचा या तिनही पिकांना चांगलाच फटका बसला. शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने तूर पिकाची लागवड केली. मात्र ५० टक्केपेक्षाही कमी उत्पादन झाले. त्यामुळे लागवडीचा खर्चही निघेनासा झाला आहे. अनेक शेतकऱ्यांची तूर काढणी झाली असून काही शेतकरी तूर काढणीत व्यस्त आहे. ज्यांची तूर काढणी झाली ते शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याने आपली तूर खासगी व्यापाºयांकडे घेऊन जात आहेत.शेतकऱ्यांची गरज हेरून व्यापाऱ्यांनी अक्षरश: लूट सुरू केली आहे. शासनाने पाच हजार ६७५ रूपये हमी भाव जाहीर केला असला तरी अद्याप नाफेडद्वारा खरेदी सुरू केली नाही. विशेष म्हणजे मागीलवर्षी डिसेंबर महिन्यातच तूर खरेदी सुरू करण्यात आली होती. शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदी केली जाईल, असे आश्वासनदेखिल शासनाने दिले होते. मात्र ते आश्वासन हवेत विरले. नाफेडने मधेच तूर खरेदी बंद करून टाकली. परिणामी मागीलवर्षी अनेक शेतकऱ्यांना कमी भावात व्यापाऱ्यांना तूर विकावी लागली.यंदाही हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या घरात तुरीचे पीक आले असले तरी नाफेडद्वारा तूर खरेदीच्या कोणत्याच हालचाली नाही. अद्याप शासनाकडून तूर खरेदीबाबत कोणतेही परिपत्रक आले नसल्याचे खरेदी-विक्री संघाकडून सांगण्यात आले. त्यामुळे आणखी १५ दिवस तरी नाफेडद्वारा खरेदी सुरू होण्याची शक्यता नाही. शेतकरी आर्थिक संकटात असल्याने ते खासगी व्यापाºयांकडे तूर विकत आहे. अनेक शेतकºयांना नाफेडच्या खरेदीची प्रतीक्षा असल्याने त्यांनी तूर घरातच ठेवली आहे.धुक्याने बसला तूर पिकाला फटकाडिसेंबर महिन्यात अवकाळी पावााने थैमान घातले. त्यादरम्यान जवळपास चार दिवस धुक्याचा प्रकोप होता. त्यामुळे त्याचा फटका तूर पिकाला बसला. तुरीची झाडे मोठ्या प्रमाणावर वाळली. शेंगा ज्या प्रमाणात भरायला हव्यात, त्या भरल्या नाहीत. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली.रानडुकरांचा धुमाकूळ सुरूचअनेक शेतकऱ्यांनी तुरीची कापणी करून शेतात ठेवली आहे. रात्रीच्यावेळी मात्र रानडुकरांचे कळप कापलेल्या तुरीवर ताव मारत आहेत. यामुळेही मोठे नुकसान होत आहे. डुकरांचा उपद्रव थांबविण्यासाठी शेतकऱ्यांकडून वेगवेगळे प्रयोग केले जात असले तरी त्यालाही ते जुमानत नसल्याने शेतकऱ्यांचा वैताग वाढला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी