शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
4
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
5
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
6
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
7
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
8
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
9
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
10
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
11
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
12
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
13
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
14
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
15
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
16
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
17
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
18
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
19
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
20
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?

वणीत व्यापाऱ्यांकडून तूर उत्पादकांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 22:22 IST

येथे खासगी व्यापाऱ्यांकडून तूर उत्पादकांची अक्षरश: लूट होत असून पाच हजार ६७५ रूपये हमी भाव असताना व्यापाऱ्यांकडून केवळ चार हजार ५०० ते चार हजार ८२५ रूपये प्रति क्विंटल दराने तुरीची खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.

ठळक मुद्देकमी भावाने खरेदी : उत्पादन ५० टक्क्यांनी घटले, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : येथे खासगी व्यापाऱ्यांकडून तूर उत्पादकांची अक्षरश: लूट होत असून पाच हजार ६७५ रूपये हमी भाव असताना व्यापाऱ्यांकडून केवळ चार हजार ५०० ते चार हजार ८२५ रूपये प्रति क्विंटल दराने तुरीची खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. असे असताना अद्याप नाफेडकडून तूर खरेदीसाठी कोणत्याही हालचाली दिसत नसल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने खासगी व्यापाºयांना तूर विक्री करावी लागत आहे.यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने शेती उत्पादनावर चांगलाच परिणाम झाला आहे. या परिसरात कापूस, सोयाबीन व तूर हे मुख्य पीक शेतकरी घेतात. मात्र अल्प पावसाचा या तिनही पिकांना चांगलाच फटका बसला. शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने तूर पिकाची लागवड केली. मात्र ५० टक्केपेक्षाही कमी उत्पादन झाले. त्यामुळे लागवडीचा खर्चही निघेनासा झाला आहे. अनेक शेतकऱ्यांची तूर काढणी झाली असून काही शेतकरी तूर काढणीत व्यस्त आहे. ज्यांची तूर काढणी झाली ते शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याने आपली तूर खासगी व्यापाºयांकडे घेऊन जात आहेत.शेतकऱ्यांची गरज हेरून व्यापाऱ्यांनी अक्षरश: लूट सुरू केली आहे. शासनाने पाच हजार ६७५ रूपये हमी भाव जाहीर केला असला तरी अद्याप नाफेडद्वारा खरेदी सुरू केली नाही. विशेष म्हणजे मागीलवर्षी डिसेंबर महिन्यातच तूर खरेदी सुरू करण्यात आली होती. शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदी केली जाईल, असे आश्वासनदेखिल शासनाने दिले होते. मात्र ते आश्वासन हवेत विरले. नाफेडने मधेच तूर खरेदी बंद करून टाकली. परिणामी मागीलवर्षी अनेक शेतकऱ्यांना कमी भावात व्यापाऱ्यांना तूर विकावी लागली.यंदाही हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या घरात तुरीचे पीक आले असले तरी नाफेडद्वारा तूर खरेदीच्या कोणत्याच हालचाली नाही. अद्याप शासनाकडून तूर खरेदीबाबत कोणतेही परिपत्रक आले नसल्याचे खरेदी-विक्री संघाकडून सांगण्यात आले. त्यामुळे आणखी १५ दिवस तरी नाफेडद्वारा खरेदी सुरू होण्याची शक्यता नाही. शेतकरी आर्थिक संकटात असल्याने ते खासगी व्यापाºयांकडे तूर विकत आहे. अनेक शेतकºयांना नाफेडच्या खरेदीची प्रतीक्षा असल्याने त्यांनी तूर घरातच ठेवली आहे.धुक्याने बसला तूर पिकाला फटकाडिसेंबर महिन्यात अवकाळी पावााने थैमान घातले. त्यादरम्यान जवळपास चार दिवस धुक्याचा प्रकोप होता. त्यामुळे त्याचा फटका तूर पिकाला बसला. तुरीची झाडे मोठ्या प्रमाणावर वाळली. शेंगा ज्या प्रमाणात भरायला हव्यात, त्या भरल्या नाहीत. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली.रानडुकरांचा धुमाकूळ सुरूचअनेक शेतकऱ्यांनी तुरीची कापणी करून शेतात ठेवली आहे. रात्रीच्यावेळी मात्र रानडुकरांचे कळप कापलेल्या तुरीवर ताव मारत आहेत. यामुळेही मोठे नुकसान होत आहे. डुकरांचा उपद्रव थांबविण्यासाठी शेतकऱ्यांकडून वेगवेगळे प्रयोग केले जात असले तरी त्यालाही ते जुमानत नसल्याने शेतकऱ्यांचा वैताग वाढला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी