शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

नजर अंदाज आणेवारी ५५ पैसे

By admin | Updated: November 6, 2014 02:21 IST

पुसद तालुक्यात गतवर्षीपेक्षाही पिकांची स्थिती अत्यंत वाईट आहे. असे असताना प्रशासनाने नवाच जावईशोध लावत नजर अंदाज आणेवारी ५५ पैसे दर्शविली आहे.

पुसद : पुसद तालुक्यात गतवर्षीपेक्षाही पिकांची स्थिती अत्यंत वाईट आहे. असे असताना प्रशासनाने नवाच जावईशोध लावत नजर अंदाज आणेवारी ५५ पैसे दर्शविली आहे. आणेवारी अधिक दर्शवून प्रशासनाने शेतकऱ्यांना आणखी दुबळे बनविल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकरी वर्गात उमटत आहे. सुधारित आणेवारी घोषित करून पुसद तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, त्याबरोबरच शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करण्याची मागणी होत आहे. तालुक्यात पिकांची स्थिती मागील वर्षाच्या तुलनेत २५ टक्केसुद्धा नाही. प्रशासनाने नुकतीच नजर अंदाज आणेवारी घोषित केली. त्यामध्ये ती ५५ टक्के एवढी दर्शविण्यात आली. शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीपासून वंचित ठेवण्याचा हा प्रशासनाचा डाव आहे. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा एकदा सर्वे करून सुधारित नजर अंदाज आणेवारी घोषित करावी, त्यामध्ये ही आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी राहणार असल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे. ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी निघाल्यास तालुका दुष्काळग्रस्त घोषित होवू शकतो. परिणामी शेतकऱ्यांनाही विविध योजना आणि कर्ज माफीचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे प्रशासनाने ५५ पैसे आणेवारी काढून मदतीची आशा धुसर केली आहे. परिणामी या आणेवारी संदर्भात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष उफाळला आहे. दुबार-तिबार पेरणीचे संकट ओढवले. त्यानंतर वातावरणातील बदल आणि उन्हाचा तडाखा यामुळे सोयाबीन आणि कपाशीची उतारी आली नाही. उत्पादनात मोठी घट झाल्याने बियाण्यांसाठी झालेला खर्चसुद्धा हाती येणार नसल्याचे चित्र संपूर्ण तालुक्यात आहे. नदी-नाले, तलाव, ओढे यांनी आतापासूनच तळ गाठायला सुरुवात केली आहे. काही गावांमध्ये तर आतापासूनच टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अत्यल्प पावसाने खरीप हंगामानंतर आता रबीही धोक्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. त्यात ५५ पैसे आणेवारी काढून प्रशासनाने शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचाच प्रकार केला असल्याच्या प्रतिक्रिया आता शेतकरी वर्गातून उमटत आहे. (प्रतिनिधी)