शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuwanshi: सोनमच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद
2
मुंबई मेट्रो- १ मार्गिकेवर तांत्रिक बिघाड, वर्सोवाकडे जाणारी वाहतूक रखडली, प्रवाशांचे हाल
3
इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हैफा बंदराचं मोठं नुकसान? अदानी समुहानं दिली अशी माहिती   
4
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
5
इराणने थेट अमेरिकन दूतावासावर डागली मिसाइल्स, इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये घबराट
6
'अनेक वेळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
7
G20 च्या पडद्यामागील हिरो अमिताभ कांत यांचा राजीनामा! ४५ वर्षांच्या सेवेला का दिली पूर्ण विराम?
8
संजय कपूर यांचा शेवटचा फोटो समोर, कॅप्टनसोबत हसताना दिसले; पोलो खेळतानाच गेला जीव
9
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
10
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
11
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
12
Monsoon Picnic: सध्या पावसाळी सहलीला जाताना जरा सांभाळूनच; वाचा 'ही' मार्मिक कथा!
13
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
14
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
15
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
16
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
17
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
18
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
19
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
20
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?

मानवाचे जगणे आनंदाच्या शोधासाठीच

By admin | Updated: November 16, 2016 00:30 IST

आनंद प्राप्तीची अपेक्षा आणि इच्छा ही आपल्या प्रत्येकातच विद्यमान असते. कारण आनंद हा मानवाचा मुलभूत स्वभाव आहे.

अरविंद देशमुख : निवृत्त अभियंता मित्र मंडळाची व्याख्यानमालायवतमाळ : आनंद प्राप्तीची अपेक्षा आणि इच्छा ही आपल्या प्रत्येकातच विद्यमान असते. कारण आनंद हा मानवाचा मुलभूत स्वभाव आहे. मानवाचे जीवन जगणे हे आनंदाच्या शोधासाठी केलेला प्रवास आहे, असे उद्गार प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख यांनी काढले. निवृत्त अभियंता मित्र मंडळाद्वारे आयोजित प्रबोधन व्याख्यानमालेत ‘कशासाठी...? आनंदासाठी!’ या विषयावर ते बोलत होते. निवृत्त अभियंता मित्र मंडळाचे अध्यक्ष गोपाळ भास्करवार अध्यक्षस्थानी होते. व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष सुभाष काळे, किशोर कावलकर, संयोजक प्रमोद देशपांडे आदी उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय किशोर इंगळे यांनी करून दिला. वसुधा पांडे यांनी स्वागतगीत सादर केले. किशोर कावलकर यांनी आभार मानले. संचालन निवृत्त अभियंता मित्र मंडळाचे सचिव वसंत पांडे यांनी केले.डॉ. अरविंद देशपांडे पुढे म्हणाले, सुखासाठी मानव सतत प्रयत्न करतो. परंतु प्रत्येकवेळी सुख मिळेलच याची शाश्वती नसते. सुख किंवा दु:ख याचा अधिक विचार न करता मानवाने आपली सहनशीलता वाढविली पाहिजे. एकदा सहनशीलतेमध्ये वाढ झाली की, आनंदाची मात्रा वाढू शकते. आनंद ही आंतरिक अवस्था असून बाह्य गोष्टीमुळे ही आंतरिक अवस्था भंग पावावयास नको, असे डॉ. देशमुख म्हणाले. बाहेरची परिस्थिती बिघडली तरी आंतरिक अवस्था मात्र कुठेही बिघडवू न देणारी अनेक थोर मंडळी भारतात होवून गेली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, विदर्भातील थोर संत गाडगेबाबा, सोपानदेव चौधरी, मोरारजी देसाई, प्राचार्य राम शेवाळकर ही काही उदाहरणे देता येतील. प्रतिकूल परिस्थितीतही आनंदाचा पोत सांभाळावा. जीवन जगताना आनंद घ्यावा आणि आनंद द्यावा. त्यासाठी आपल्या मनातील सुप्त महत्त्वाकांक्षा, अपेक्षा किंवा अनिष्ठ स्पर्धा आड येणार नाही याची काळजी घ्यावी, असे डॉ. देशमुख म्हणाले. मंडळाचे सहसचिव उत्तम राठोड यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. (वार्ताहर)