शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीराव फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पुणे, मुंबईतून आलेल्या तीन हजार नागरिकांवर नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:01 IST

पुणे आणि मुंबईतून आतापर्यंत ३ हजार नागरिक जिल्ह्यात परतले आहेत. हा आकडा १० हजारांच्या आसपास जाण्याचा अंदाज आहे. शिक्षण आणि नोकरीच्या शोधात गेलेले हे नागरिक गावात परतत आहेत. आता त्यांनी इतरत्र न फिरण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या असून त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचे निर्देश पोलीस पाटलांना दिले आहेत. त्यांच्यावर २४ तास पाळत ठेवली जाणार आहे. त्यांच्यात कोरोनाचे लक्षण दिसले तर तत्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधण्याच्या सूचना आहेत.

ठळक मुद्देसंख्या दहा हजारांवर असण्याची शक्यता : ग्रामीण भागात शोध घेण्यासाठी दोन हजार पथकांची निर्मिती

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पुणे, मुंबईत कोरोनाचा फैलाव वाढला आहे. या भागातून आता नागरिकांचे लोेंढे स्वगृही यवतमाळ जिल्ह्यात परतत आहेत. या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसण्याची दाट शक्यता आहे. यामुुळे परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांवर पाळत ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी प्रशासनाला दिले आहे.पुणे आणि मुंबईतून आतापर्यंत ३ हजार नागरिक जिल्ह्यात परतले आहेत. हा आकडा १० हजारांच्या आसपास जाण्याचा अंदाज आहे. शिक्षण आणि नोकरीच्या शोधात गेलेले हे नागरिक गावात परतत आहेत. आता त्यांनी इतरत्र न फिरण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या असून त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचे निर्देश पोलीस पाटलांना दिले आहेत. त्यांच्यावर २४ तास पाळत ठेवली जाणार आहे. त्यांच्यात कोरोनाचे लक्षण दिसले तर तत्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधण्याच्या सूचना आहेत.त्या दृष्टीेने आरोग्य विभागाची यंत्रणाही सर्वेक्षणासाठी उतरली आहे. गावपातळीवर बाहेर ठिकाणावरून येणाºया नागरिकांची आकडेवारी गोळा केली जात आहे. आर्णीमध्ये दोन हजार ३३४ आणि महागाव तालुक्यात एक हजार ४४ नागरिकांची नोंद आरोग्य विभागाने केली आहे. यातील काही नागरिकांची आरोग्य तपासणी झाली आहे.आरोग्य विभागाने हाती घेतलेल्या सर्वेक्षणात आशा, अंगणवाडीताई, आरोग्य विभागाचे कर्मचारी आहेत. यासोबतच गावात कोण आले आणि त्यांच्या प्रकृती कशी आहे, यावर पोलीस पाटील पाळत ठेवणार आहे. त्याकरिता दोन हजार पथकांची निर्मिती केली आहे.सर्वेक्षणादरम्यान कोरोनाशी संबंधित ‘ट्रॅव्हल हिस्ट्री’ आढळल्यास तशा व्यक्तींची माहिती तत्काळ तालुका यंत्रणेकडे पाठविली जात आहे. अशा व्यक्तीशी वैद्यकीय अधिकारी संपर्क करतात आणि त्यांची तपासणी करून गावातच क्वारंटाईन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये तालुका स्तरावर आयसोलेशन वॉर्ड आणि फॅसिलेटेड क्वारंटाईन केंद्र तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी अशा व्यक्तींची व्यवस्था करण्यात येणार आहे. परदेशातून आले १६० नागरिकजिल्ह्यात परदेशातून आलेल्या नागरिकांची संख्या १६० झाली आहे. आता विमानसेवाच ठप्प झाल्याने ही संख्या सध्याच वाढण्याची शक्यता नाही. या सर्वांना आरोग्य विभागाच्या यंत्रणेने क्वारंटाईन केले आहे. त्यांच्या हातावर शिक्का मारण्यात आला आहे. परजिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.क्वारंटाईन नागरिकांची संख्या १०५ वरजिल्ह्यात क्वारंटाईन व्यक्तींची संख्या १०५ वर पोहचली आहे. आयसोलेशन वॉर्डातील ६ पैकी दोन व्यक्तींना आता सुटी देण्यात आली. तर आयसोलेशन वॉर्डात नव्याने दोन व्यक्ती समाविष्ट झाल्या आहेत. यामुळे आयसोलेशन वॉर्डातील व्यक्तींची संख्या पुन्हा सहावर पोहचली आहे. तीन पॉझिटिव्ह रूग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. तर ६२ व्यक्तींना घरी सोडण्यात आले आहे.४९ व्यक्तींवर फौजदारी कारवाईसंचारबंदीनंतरही गावात फिरणाऱ्या व्यक्ती आढळल्या. अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्तची दुकाने उघडल्या गेलीत. काही ठिकाणी दारू आणि खर्रा विक्री करताना व्यावसायिक आढळले. अशा ४९ व्यक्तींवर फौजदारी कारवाई करण्यात आली.संचारबंदी असूनही बाजारात गर्दीअत्यावश्यक वस्तू आणण्याच्या नावाखाली नागरिकांनी बाजारात गर्दी केल्याचे चित्र मंगळवारी पहायला मिळाले. दुपारपर्यंत हे चित्र कायम होते. दुपारनंतर पोलिसांनी अशा नागरिकांना चोप देणे सुरू केले. त्यानंतर बाजारपेठेतील गर्दी कमी झाली.प्रत्यक्ष दराच्या तीनपट अधिक एमआरपीकोरोनाच्या दहशतीमुळे मास्क, सॅनिटायझर विक्री वाढली असून काही ठिकाणी त्यातही लूट सुरू आहे. अनेक ठिकाणी सॅनिटायझरच्या बॉटलवर १७५ रुपये एमआरपी नमूद आहे. प्रत्यक्षात ही बॉटल अवघ्या ५० रुपयात विकली गेली. यावरून किंमतीच्या दोन ते तीनपट अधिक एमआरपी मालावर नमूद केली जात असल्याचे स्पष्ट होते. हे सॅनिटायझर बनावट तर नाही ना अशी शंकाही व्यक्त केली जाऊ लागली आहे. अनेक ठिकाणी सॅनिटायझरचा साठा संपला आहे. ही कृत्रिम टंचाई निर्माण केली गेली असण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या