शहरं
Join us  
Trending Stories
1
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
3
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
4
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
5
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
6
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
7
एकीकडे 'घरवाली' दुसरीकडे 'बाहेरवाली'; दोघींसोबत आनंदाने जगत होता तरुण अन् एक दिवस असं काही झालं... 
8
पितृपक्ष इंदिरा एकादशी २०२५: १० राशींवर श्रीहरी प्रसन्न, शिव-गौरी-लक्ष्मी कृपा; शुभ-लाभ-पैसा!
9
'क्रिस्टल ब्लॅक पर्ल' रंगात होंडा अमेझ भारतात लॉन्च; नव्या लूकमध्ये दिसते आणखी धासू!
10
बीचवर फिरायला गेलेल्या तरुणीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार; पोलिसांनी आरोपी कसे शोधले?
11
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
12
आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली...
13
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
14
'ओझेम्पिक टीथ' म्हणजे काय? वजन कमी करण्याच्या औषधाचा होतोय 'असा' दुष्परिणाम
15
Nupur Bora: नुपूर बोरा आहे तरी कोण? सहा वर्षात अनेक गैरव्यवहार, घरातही सापडलं मोठं घबाड!
16
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
17
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
18
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
19
बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला
20
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स

जीवनदायिनी वर्धा नदीच्या पात्राला डबक्याचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 22:02 IST

चंद्रपूर-यवतमाळ जिल्ह्याच्या सिमेवरून वाहणाºया जिवनदायीनी वर्धा नदीचा नैसर्गीक प्रवाह बंद झाल्याने गेल्या काही दिवसांपासून या नदीला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. परिणामी या नदीकाठावरील गावांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । भीषण पाणीटंचाई, नदीकाठच्या गावांना बसतोय फटका, मातीच्या ढिगाऱ्याने पात्र बुजले

म.आसिफ शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : चंद्रपूर-यवतमाळ जिल्ह्याच्या सिमेवरून वाहणाºया जिवनदायीनी वर्धा नदीचा नैसर्गीक प्रवाह बंद झाल्याने गेल्या काही दिवसांपासून या नदीला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. परिणामी या नदीकाठावरील गावांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.गंभीर बाब ही की, वर्धा नदीला लागून असलेल्या कोलार पिंपरी, तेलवासा, जुनाड या वेकोलिच्या खाणीतील मातीचे मोठमोठे ढिगारे अगदी नदीकाठावर टाकण्यात आल्याने वर्धा नदीचे संपूर्ण पात्रच बुजले आहे. परिणामी नदीचा प्रवाहदेखील बदलला आहे. याच कारणाने ही नदी कोरडी पडल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या नदीवरून सावर्ला, नायगाव, कोलार, जुनाड, पिंपळगाव, उकणी व वेकोलिच्या वसाहत असलेल्या प्रगतीनगर, भालर कॉलनी येथे पाणी पुरवठा होतो. परंतु वर्धा नदी कोरडी पडल्याने या गावांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. जुनाड व तेलवासा या खाणीतील मातीचे ढिगारे नदीच्या दोन्ही बाजूला अगदी लागून टाकण्यात आले आहे. परिणामी नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह समोर येण्यास अनेक अडचणी निर्माण होत आहे.सातत्याने वाहणारा नदीचा प्रवाह बंद झाल्याने भालर कॉलरी व प्रगतीनगर कॉलनीमधील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. जुनाड घाटावरील जॅकवेलपर्यंत पाणी पोहोचत नसल्याने पीसी मशीनद्वारे नाली खोदून नदीचे पाणी कॉलनीकडे नेण्यात येत आहे. वेकोलिच्या कोलार, जुनाड, चारगाव व नदीव जुनाड, या चार कोळसा खाणीतील ओव्हरबर्डनमुळे वर्धा नदीचे पात्र दिवसेंदिवस बुजत चालले आहे. वर्धा नदीच्या पात्रात अनेक ठिकाणी मोठमोठे दगड जमा झाले असल्याचे दिसून येत आहे.खाणीच्या पाण्यामुळे धोकावेकोलिच्या कोलार, जुनाड, उकणी, चारगाव, कुनाडा, माजरी या कोळसा खाणींचे पाणी थेट वर्धा नदीत जात असल्याने पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. गंधक, लोह, क्षार, कार्बन, शिसे, आदी घटक पाण्याद्वारे नदीपात्रात जात आहे. सध्या नदीपात्रात पाण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे हे पाणी आरोग्यासाठी धोकादायक मानले जात आहे. नियमानुसार उद्योगातील रसायनयुक्त पाणी थेट नदीमध्ये सोडत येत नाही. हा कायदेशीर गुन्हा ठरतो. परंतु कायद्याला न जुमानता रसायनयुक्त पाणी थेट नदीत सोडले जात असले तरी प्रदूषण विभाग मात्र वेकोलि किंवा अन्य उद्योगांच्या विरोधात कोणतीही कारवाई करताना दिसत नाही.रांगणा-भुरकीने तारलेवणी शहराला वर्धा नदीवरून पाणी पुरवठा होत असून रांगणा डोहातील पाणी ओढून ते ११ किलोमीटर अंतरावर असलेल्या वणी शहराला पुरविले जात आहे. विशेष म्हणजे रांगणा-भुरकी डोहात बारमाही पाणी असते. या डोहाचे पाणी कधीच आटले नाही. वणी नगरपरिषदेमार्फत या डोहावर कोट्यवधी रूपये खर्च करून पाणी पुरवठा योजना सुरू केल्याने यंदाचा उन्हाळा वणीकरांसाठी टँकरमुक्त ठरला असून त्यामुळे वणीकर जनतेमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Wardha Riverवर्धा नदी