शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
4
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
5
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
6
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
7
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
8
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
9
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
10
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
11
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
12
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
13
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
14
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
15
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
16
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
17
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
18
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
19
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
20
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत

जीवनदायिनी वर्धा नदीच्या पात्राला डबक्याचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 22:02 IST

चंद्रपूर-यवतमाळ जिल्ह्याच्या सिमेवरून वाहणाºया जिवनदायीनी वर्धा नदीचा नैसर्गीक प्रवाह बंद झाल्याने गेल्या काही दिवसांपासून या नदीला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. परिणामी या नदीकाठावरील गावांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । भीषण पाणीटंचाई, नदीकाठच्या गावांना बसतोय फटका, मातीच्या ढिगाऱ्याने पात्र बुजले

म.आसिफ शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : चंद्रपूर-यवतमाळ जिल्ह्याच्या सिमेवरून वाहणाºया जिवनदायीनी वर्धा नदीचा नैसर्गीक प्रवाह बंद झाल्याने गेल्या काही दिवसांपासून या नदीला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. परिणामी या नदीकाठावरील गावांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.गंभीर बाब ही की, वर्धा नदीला लागून असलेल्या कोलार पिंपरी, तेलवासा, जुनाड या वेकोलिच्या खाणीतील मातीचे मोठमोठे ढिगारे अगदी नदीकाठावर टाकण्यात आल्याने वर्धा नदीचे संपूर्ण पात्रच बुजले आहे. परिणामी नदीचा प्रवाहदेखील बदलला आहे. याच कारणाने ही नदी कोरडी पडल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या नदीवरून सावर्ला, नायगाव, कोलार, जुनाड, पिंपळगाव, उकणी व वेकोलिच्या वसाहत असलेल्या प्रगतीनगर, भालर कॉलनी येथे पाणी पुरवठा होतो. परंतु वर्धा नदी कोरडी पडल्याने या गावांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. जुनाड व तेलवासा या खाणीतील मातीचे ढिगारे नदीच्या दोन्ही बाजूला अगदी लागून टाकण्यात आले आहे. परिणामी नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह समोर येण्यास अनेक अडचणी निर्माण होत आहे.सातत्याने वाहणारा नदीचा प्रवाह बंद झाल्याने भालर कॉलरी व प्रगतीनगर कॉलनीमधील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. जुनाड घाटावरील जॅकवेलपर्यंत पाणी पोहोचत नसल्याने पीसी मशीनद्वारे नाली खोदून नदीचे पाणी कॉलनीकडे नेण्यात येत आहे. वेकोलिच्या कोलार, जुनाड, चारगाव व नदीव जुनाड, या चार कोळसा खाणीतील ओव्हरबर्डनमुळे वर्धा नदीचे पात्र दिवसेंदिवस बुजत चालले आहे. वर्धा नदीच्या पात्रात अनेक ठिकाणी मोठमोठे दगड जमा झाले असल्याचे दिसून येत आहे.खाणीच्या पाण्यामुळे धोकावेकोलिच्या कोलार, जुनाड, उकणी, चारगाव, कुनाडा, माजरी या कोळसा खाणींचे पाणी थेट वर्धा नदीत जात असल्याने पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. गंधक, लोह, क्षार, कार्बन, शिसे, आदी घटक पाण्याद्वारे नदीपात्रात जात आहे. सध्या नदीपात्रात पाण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे हे पाणी आरोग्यासाठी धोकादायक मानले जात आहे. नियमानुसार उद्योगातील रसायनयुक्त पाणी थेट नदीमध्ये सोडत येत नाही. हा कायदेशीर गुन्हा ठरतो. परंतु कायद्याला न जुमानता रसायनयुक्त पाणी थेट नदीत सोडले जात असले तरी प्रदूषण विभाग मात्र वेकोलि किंवा अन्य उद्योगांच्या विरोधात कोणतीही कारवाई करताना दिसत नाही.रांगणा-भुरकीने तारलेवणी शहराला वर्धा नदीवरून पाणी पुरवठा होत असून रांगणा डोहातील पाणी ओढून ते ११ किलोमीटर अंतरावर असलेल्या वणी शहराला पुरविले जात आहे. विशेष म्हणजे रांगणा-भुरकी डोहात बारमाही पाणी असते. या डोहाचे पाणी कधीच आटले नाही. वणी नगरपरिषदेमार्फत या डोहावर कोट्यवधी रूपये खर्च करून पाणी पुरवठा योजना सुरू केल्याने यंदाचा उन्हाळा वणीकरांसाठी टँकरमुक्त ठरला असून त्यामुळे वणीकर जनतेमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Wardha Riverवर्धा नदी