शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
2
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
4
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
5
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
6
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
7
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
8
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
9
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
10
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
11
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
12
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
13
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
14
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
15
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
16
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
17
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
18
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
19
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
20
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं

जिल्हाभर वृक्षारोपणाची लगबग

By admin | Updated: July 2, 2016 02:41 IST

शासनाच्या दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्हाभर शुक्रवारी वृक्षारोपण मोहिमेची लगबग दिसत होती.

प्रचंड प्रतिसाद : यवतमाळच्या जनकनगरीत मुख्य सोहळायवतमाळ : शासनाच्या दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्हाभर शुक्रवारी वृक्षारोपण मोहिमेची लगबग दिसत होती. विविध कार्यक्रमांचे आयोजन करून ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. जिल्ह्याचा मुख्य वृक्षारोपणाचा कार्यक्रम यवतमाळच्या जनकनगरीतील प्रस्तावित वन उद्यानात पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत पार पडला. यवतमाळ जिल्ह्यात १५ लाख ५० हजार वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट आहे. यासाठी गत महिन्याभरापासून सामाजिक संघटनांच्या माध्यमातून प्रशासन जनजागृती करीत आहे. शुक्रवारी या मोहिमेला यवतमाळातून प्रारंभ झाला. येथील जांब मार्गावरील जनकनगरीत वनविभागाच्या प्रस्तावित वन उद्यानात पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी खासदार भावना गवळी, आमदार मदन येरावार, आमदार डॉ. अशोक उईके, पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, मुख्य वनसंरक्षक वसंत गुरमे, जिल्हा परिषदेच्या सभापती लता खांदवे, उपवनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुळकर्णी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुरेश शहापुरकर, सामाजिक वनिकरणचे उपसंचालक एम.आर. चेके उपस्थित होते. यासोबतच दारव्हा येथील वन उद्यान, दारव्हा तालुक्यातीलच देऊळगाव राजा, दिग्रस तालुक्यातील भवानी टेकडी, लोहारा एमआयडीसी येथे वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपणासाठी जिल्हाभर विविध सामाजिक संघटना पुढे आल्या होत्या. शाळा, महिाविद्यालये, सामाजिक संघटना, एनसीसीचे विद्यार्थी, महिला, पुरूष स्वयंस्फुर्तीने सहभागी झाले होते. पुसद शहरात सायकल रॅली काढून जनजागृती करण्यात आली. शुक्रवारी जिल्हाभरात किती वृक्षांची लागवड झाली, हे कळू शकले नाही. परंतु १५ लाखापेक्षा अधिक वृक्ष लागवड होण्याची शक्यता आहे. (नगर प्रतिनिधी)